*स्पर्धेसाठी वीररस काव्य*
*विषय-शूर संभाजी*
पराक्रमी,शूरवीर
सईबाईचे संभाजीपुत्र
स्वराज्याचे वारसदार
जाणिले बारकावे युध्दनितीसुत्र....
सईबाईचे पोटी
जन्मला वीर
थरारली धरणी
किल्ले पुरंदर.......
वयाच्या नवव्या वर्षी
लिहीला ग्रंथ महान
नाव तयाचे "बुधभुषण"
होते चौदा भाषांचे ज्ञान......
बालपणापासून घेतले
युध्दनितीचे धडे
नावं ऐकता शंभुचे
लागे शत्रूही धडधडे....
केली फितुर स्वकियांनी
पकडून दिले शंभूना
पराक्रमी धर्मवीर त्यांनी
नमविले शत्रूंना.......
औरंगजेबाला कोडे पडले
कसे नमवावे शंभूना
बांधीले साखळदंड
छावा शंभू काही वाकेना......
हालहाल करून मारू लागले
रोज एक शिक्षा देवू लागले
वाघाचं काळीज शंभुचे सिंहाची छाती
नाही विव्हळले नाही कण्हनले .....
लालभडक तप्त सळया
शंभुच्या डोळ्यात घातले
जीभ कापली,हात कापले
चामडी सुध्दा सोलले....
सोडला अखेरचा श्वास पण
नाही आपला धर्म बदलला
अपार छळले माझ्या शंभूना
पण शंभू नाही नमला शत्रूला.....
शौर्य,पराक्रम गाजविला
माझ्या शूरवीर शंभुराजांनी
महाराष्ट्राचा धगधगता सुर्य
अमर इतिहासाच्या पानोपानी .....
*कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
9767663257
एकदम भारी.... ✌️
ReplyDelete