Thursday, 27 November 2025
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभरून नावजी येथे संविधानदिन विविध उपक्रम घेऊन साजरी...
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जामरुन नावजे येथे प्रभात फेरी काढू संविधानाची प्रस्ताविका म्हणण्यात आले त्यानंतर संविधानावर आधारित संविधान गीत विद्यार्थ्यांनी सादर केले त्याचबरोबर संविधान चित्रकला स्पर्धा आणि उद्देशिका लेखन स्पर्ध घेण्यात आली. संविधान दिन मोठ्य उत्साहात साजरा करण्यात आला.२६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Sunday, 5 October 2025
*सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदान करणारी मनाने चिरतरूण असणारी शिक्षिका -चंदा वानखेडे*
*सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदान करणारी मनाने चिरतरूण असणारी शिक्षिका -चंदा वानखेडे*
आजच्या धावत्या युगात आपण पहातो मला वेळ नाही,मला खूप कामं आहे,मला आता काम होत नाही, मला सुट्टी पाहिजे होती,या कामातून स्वतः साठी वेळच मिळत नाही,नोकरी करून कंटाळा आला आहे,आता मला वयानुसार कामं होत नाही,सेवानिवृतृत झाल्यावर देवदेव करायचं,आता काय सेवा संपली हरिनाम करायचं,सेवा संपली आता सुखाचा संसार करूया,नोकरीवर असल्याने कुटुंबाला वेळच देता आला नाही. अशी एक नाही तर हजार कारणं पुढं करणारी लोकं आपण पहातो.पण या सगळ्या निगेटिव्ह विचारांना थारा न देणारी अशीच एक ध्येयवेडी शिक्षिका आहेत त्या म्हणजे सौ.चंदा वानखेडे मॅडम.चला आज पाहूया त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह विचार त्यांच्या कार्याची ओळख.
सौ चंदा वानखेडे मॅडम या सेवेमध्ये शिक्षिका म्हणून 1990 साली लागल्या.सेवानिवृत्तीवेळी मॅडम अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा साखरा येथे कार्यरत होत्या.३१ जुलै २०२५ मध्ये त्या सेवावृत्त झाल्या.सतत हसरा चेहरा, चेहरा पाहिल्यावर अजूनही वाटत नाही की त्या सेवानिवृत्त झाल्या असतील इतकी चकाकी. नाहीतर काही लोकं सतत उदासीन असतात.सेवा निवृत्तीनंतरही गोरगरिबांच्या लेकरांना उदात्त हेतूने शिकवणाऱी मंडळी शोधणं म्हणजे हातात कंदील घेऊन सुई शोधल्यासारखं आहे.अशी ध्येयवेडी मनाने चिरतरूण असणारी शिक्षिका -चंदा वानखेडे मॅडम यांनी सेवानिवृत्त होत असताना त्यांच्याकडे जो वर्ग तोच वर्ग कन्टीन्यू करत आजही सेवासंमाप्तिनंतर अविरत सेवा देत आहेत.त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
मी माननिय शिक्षणाधिकारी ससाणे साहेबांच्या कार्यशाळेमध्ये सहज मॅडमला भेटले आणि सहजच विचारले की 'अरे मॅडम तुम्ही तर रिटायर्ड झाल्या ना.मग तुम्ही इथं कसं काय? मॅडमनी हसून उत्तर दिलं मला घरी करमत नव्हतं म्हणून मी पुन्हा शाळेत जायला लागले.आजच्या काळात एक मिनिटही दुसऱ्याला न देणारी लोकं आहेत.विचारपूस, चौकशी तर सोडाच पण वाशिम जिल्ह्यातली मला आवडलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे अधिका-यापासून ते शिक्षकांपर्यंत सर्वजण महिला शिक्षिकेचा खूप आदर करतात.( काही अपवाद वगळता) सौ चंदा वानखेडे मॅडमचा करारी बाणा म्हणा किंवा कार्याप्रती असलेली निष्ठा ही लक्षात येते.अशा शिक्षिकेला सर्व्हिसमध्ये खूप हसतमजेत आनंदाने कार्य करताना मी बघितलंय जेंव्हा मला समजलं की मॅडमने सेवानिवृत्ती नंतरही शाळा सुरूच ठेवली तेंव्हा खरंच मॅडम बद्दल खूप अभिमान वाटला.
चंदा वानखेडे मॅडमकडून ही गोष्ट खरंच खूप शिकण्यासारखी आहे.नोकरी तर सर्वजणच करतात पण काहीजण सेवाव्रत साफल्यम म्हणल्यासारखे सेवेला जेंव्हा व्रत समजतात तेंव्हा खरच मला नाही वाटत की यानंतर कोणते व्रत करण्याची गरज आहे.आजच्या काळात मी अशीही मंडळी पाहिलीय जी सेवेत असतानाच साईड बिझनेस त्यांचे सुरू आहेत. हे बोलून मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत परंतु ही वस्तुस्थिती आहे.आणि आजच्या वस्तुस्थितीवर सहसा कुणी भाष्य करायला तयार होत नाही. का? तर संबंध खराब होतील.पण चांगले कार्य करणाऱ्या लोकांना तरी कुणी चांगलं म्हणत नाही.सेवा निवृत्ती नंतर जर एखादी महिला सेवा व्रत करत असेल कुठलीही आर्थिक मोबदला न घेता घरची सर्व कामं या वयात आटोपून जर पुन्हा नव्याने शाळेत ज्ञानदान करत असेल तर ती खरी सावित्रीची लेक आहे.अशा लेकीचं कौतुक करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
चंदा वानखेडे मॅडमच्या या निर्णयाला पाठबळ देणारे त्यांचे पती खरोखर त्यांचे मनापासून कौतुक करायला हवे.आणखी एखादा पती म्हणला असता बसं झालं मॅडम आता घरादारांकडे बघा...स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारी माणसं जिथे असतात तिथे प्रगती झाल्याशिवाय राहत नाही.चंदा वानखेडे मॅडम म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. नोकरीला लागल्यानंतर मॅडमनी बी.ए.पूर्ण केलं,कुटुबाची जबाबदारी पार पाडत, नवनवीन अन्नपदार्थ बनवण्यापासून ते संगीत, गायन,वाचन, रांगोळी अशा अनेक कला जपत आता जे घरी बसून आराम करण्याच्या वेळेत मोफत सेवा म्हणण्यापेक्षा ज्ञानदान करत आहेत.अशा या सावित्रीच्या लेकीचं मनापासून कौतुक व आभार.मॅडमच्या विचारांना सलाम करते आणि थांबते.त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.अशीच उर्जा ,निरोगी आयुष्य मॅडमला लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
लेखिका
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा
जांभरूण नावजी
Sunday, 3 August 2025
सोडू नये निती (अभंग क्र.५६)
*सोडू नये निती(अभंग क्र.५६)*
कधी माणसाने | सोडू नये निती |
लोकांस प्रचिती | असतेच || १||
वंशावळ खोटी| खोटेची करिती |
जगा दाखविती | मोठेपण || २ ||
जग हे शहाणे | ओळखती सारे |
हव्यासाचे वारे | सुटलेले || ३||
शहाण्याला असे | शब्दांचा मार |
मुर्खाचा बाजार | मांडलासी || ४ ||
काय तुझी निती | केलास कचरा |
माणूस ना बरा | दिसलासी || ५ ||
आपुल्या हाताने | दगड घातला |
मनात सलला | आंतरीक || ६ ||
खोटेपण दिसे | लोकं ही हुशार|
मानवा लाचार | का झालास || ७ ||
अतिहव्यासाचे | रे दुष्परिणाम |
करी घामाघाम | निर्लज्जास || ८ ||
सत्याचे हे सार | सत्य जिंकतसे
नाही लपतसे | खोटेपण || ९ ||
केवढी फजिती | गध्याची होतसे |
लालसा दिसते | गाढवाला || ९ ||
गाढवास काय | गुळाची ती चव |
नाही काय भेव | आंतरिचे || २० ||
तुझे मन ग्वाही | तूच आहे चोर |
परि शिरजोर | ठरलासी || ११ ||
एकदिन ऐसा | उगवेल खास|
सत्याचीच आस | दिसेलगा || १३||
नियतीचा खेळ | आज ना उद्याला |
साथ दे न्यायाला | राहशील || १४ ||
जैसी रे करणी | वैसी रे भरणी |
डोळा येई पाणी | कळेलच || १५ ||
शब्दांचा हा मार | मुर्खास कळेना |
वळता वळेना | बुध्दीलाही || १६ ||
मिनू म्हणे आता | हो बाई सावध |
सत्याचा गे वध | होत असे || १७||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
Friday, 27 June 2025
कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव व नवांगतांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने मिरवणूक कढत वाजतगाजत,नाचत धम्माल मिरवणूक काढण्यात आली.
कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मातीशी नाळ जोडत पारंपारिक पद्धतीने केला प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा प्रवेशोत्सव व नवांगतांचे स्वागत महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीने बैलगाडी मध्ये चिमुकल्या मुलांनख बसवून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.सर्वप्रथम लहानग्या दाखलपात्र मुलांना शाळेच्या गेटवरच कुंकुमतिलक लावून त्यांचे औक्षण करून डोक्यावर बर्थडे टोपी घालून प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढून,सर्वत्र फुगे लावून सर्जाराजा ची बैलजोड बैलगाडीला जुंफण्यात आली.संपुर्ण बैलगाडी फुग्यांनी सजवून बैलगाडी मध्येच दाखलपात्र विद्यार्थी बसवून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.विशेष म्हणजे विद्यार्थीप्रिय असणाऱ्या शिक्षिका नागराळे मॅडम या सुध्दा बैलगाडी बसल्या होत्या त्यांनासुद्धा बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.मिरवणुकीत गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.बैलजोडी ज्या शेतकरी बांधवांनी दिली होती त्यांना शाल व श्रीफळ देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री रामकिसन वाकुडकर सर यांनी सत्कार केला.त्यांनंतर शाळा समितीचे अध्यक्ष डॉ दिनेश काळबांडे व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,मोफत पुस्तके,मोफत मसालेभात आणि जिलेबीचा खाऊ वाटप करण्यात आले.दाखलपात्र चिमुकल्यांची बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सर्व गावकऱ्यांना मोहित करणारे व शाळेविषयी गावाविषयी आपुलकी वाटणारे वातावरण निर्मिती झाली.आगळ्यावेगळ्या पध्दतीने आनंदोत्सव व प्रवेशोत्सव साजरा केल्याबद्दल गावकऱ्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.
Friday, 13 June 2025
ऐक आतला आवाज
ऐक आतला आवाज( १३/६/२०२५)
ऐक आतला आवाज
तुला पटलं तेच कर
सांगणारे सांगत असतात
तू सुखाची ओंजळ भर....!!
एका कानाने घे ऐकून
दुसऱ्या कानाने दे सोडून
तुझ्या अंतर्मनाला पटलं तर
तू कर तुझे दोन्ही हात जोडून....!!
चांगलेभले तुला कळतेच
पण जशास तसे वागू नको
तु तुझे चांगले कर्म करत रहा
वेड्यांच्या नादी तु लागू नको....!!
प्रामाणिक रहा तू स्वतःशी
डागेलपणा तू करू नको
इथल्या इथेच आहे सारे
तू तुझा गर्व दाखवू नको....!!
क्षणभंगुर हे जीवन वेड्या
आनंदाने शिक जगायला
इथे रोज नवीन लढाई आहे
तू ही शिक आता लढायला....!!
काळानुसार नाती बदलतात
जग हे स्वार्थी आहे माणसा
तुझ्या आतला आवाज ऐक
तू चांगल्या मार्गाने चाल माणसा...!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
Thursday, 10 April 2025
महाराष्ट्र राज्य शासनाच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये (२०२३) मिनाक्षी नागराळे यांना १७ पुरस्कार,१७ आणि ८१ हजाराचा धनादेश बक्षिस स्वरूपात देण्यात आले...
Tuesday, 4 March 2025
इतक्या क्रुरपणे कुणाला मारायचं असतं का?
इतक्या क्रूरपणे कुणाला मारायचं असतं का?(कविता मनातली)
इतक्या क्रुरपणे कुणाला मारायचं असतं का? || धृ||
एक चापट मारली म्हणून
हत्याच करायची असते का?
घाणेरड्या राजकारणासाठी
इतक्या क्रूरपणे मारायचं असतं का?
आका,बोका,खंडण्या काय चाललंय?
माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात
अहो लाज वाटली पाहिजे थोडी तरी
स्वतःच्या स्वार्थासाठी मग
वडिलांचं छत्रच उडवायचं असतं का?
राजकारणी सगळेच एका माळेचे मणी
गरीबाला कोणी आहे का धनी?
अन्यायाला प्रतिकार केला म्हणून
जिवानिशी उडवायचं असतं का?
एका आईच्या पोटचा गोळा होता
एका मुलीच्या आधारस्तंभ होता
असं किड्या मुंग्यावानी कुणी दिवसाढवळ्या
उचलून नेऊन हत्या करतं का?
इतक्या निर्दयीपणे कुणी कुणाला मारतं का?
काय चूक होती त्या निष्पाप जिवाची?
इमानदारी तुमच्या आडवं येते का?
राजकारण्यांच्या वरहस्ताशिवायं
सांगा हे सगळं घडतं का?
संतोष देशमुखांना मारून
दोन महिने होतायेत
अजूनही सरकारला मोबाईल
सापडत नाहीयेत
सापडला मोबाईलातला डेटाच उडतो का?
देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून अचानक
माणसाच्या काळजाचा चुकतोय ठोका
कायद्याने फासावरती लटकवा दोषींना
जे कुणी असतील मास्टर माईंड आका बोका..
कायदा,संविधान,सर्व हाती घेत चाललेत
जनतेचे सेवकच आता दादा बनायलेत
आपल्याच भाकरीवर आपलीच पोळी शेकायलेत
आता जनतेनेच न्याय मागायचं का?
एक चापट मारली म्हणून हत्याच करायची असते का?
कवी,लेखक, आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ
पत्रकार, कधी उठवणार आहेत तुमचा आवाज?
इतकं सारं महाराष्ट्रात घडूनही
उघड्या डोळ्यांनी बघायचं का?
उघड्या डोळ्यांनी बघायचं का?
कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.
Tuesday, 4 February 2025
नवनीत कडून मिनाक्षी नागराळे आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित...
नवनीत कडून मिनाक्षी नागराळे सन्मानित.... वाशीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथील आदर्श शिक्षिका महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत
Subscribe to:
Posts (Atom)




