Showing posts with label पुरस्कार. Show all posts
Showing posts with label पुरस्कार. Show all posts

Friday, 31 December 2021

जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन




 

Tuesday, 28 December 2021

वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन

 *वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन*

      महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे सादरीकरण दिनांक 21 डिसेंबर रोजी रिसोड रोड, लाखाळा वाशिम. येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान डॉ.ज्ञानेश्वर नागरे (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम) मार्गदर्शक डॉ.सुलक्षणा पवार मॅडम (अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक नवोपक्रम), परिक्षक श्री शिवशंकर मोरे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री जगदीश करडे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री रोकडे सर (प्राचार्य शिवाजी अध्यापक विद्यालय वाशीम) यांनी जिल्ह्यातील नवोपक्रम स्पर्धेतील पात्र शिक्षकांच्या सादरीकरणाच्या परीक्षणाचे काम पाहिले. 
          सन 2021- 22 या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे याकरिता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यातील  नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्याकडून राज्यातून उपक्रमशील शिक्षकांकडून नवोपक्रम शासन स्तरावर मागवले जातात. नवनवीन उपक्रम व शिक्षकांची कल्पकता या नाविन्यपूर्ण उपक्रमातून दिसून येते. अशा उपक्रमांची यादी राज्यस्तरावरून (SCERT)पुणे यांच्याकडून डाएट कडे येते. यात प्रथम फेरीत निकषानुसार स्पर्धेचे आयोजन वाशिम येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातून प्राथमिक गटांमध्ये एकूण 13 व माध्यमिक स्तर एक असे 14 नवोपक्रम सादर झाले होते. पहिल्या फेरीची निवड होऊन प्राथमिक गटातून सात शिक्षक व माध्यमिक गटातून एका शिक्षकाची निवड झाली. यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये एकूण आठ शिक्षकांच्या नवोक्रमाचे पीपीटी द्वारे सादरीकरण झाले. त्यामध्ये पाच मुद्यांना धरून सात मिनिटांमध्ये सादरीकरण करावयाचे होते. परीक्षकांनी गुणांकन करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
               प्राथमिक गटातून श्री.रंजीत जाधव, मानोरा यांनी प्रथम मानांकन प्राप्त केले तर वाशिम पंचायत समिती मधील आरती गंगावणे यांनी दुसरा आणि मीनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कारंजा येथील कु. नीता तोडकर व मुरलीधर जाधव कारंजा यांना उत्तेजनार्थ मानांकन मिळाले. माध्यमिक गटातून संजय धांडे, रिसोड यांनी प्रथम मानांकन मिळवले.  प्रज्ञा देवळीकर कारंजा व संध्या पिंजरकर, मंगरूळपीर यांनी सहभाग घेतला. सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि जिंकलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
          जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव केंद्र तोंडगाव पंचायत समिती वाशिम येथे कार्यरत असलेल्या मिनाक्षी नागराळे या त्यांच्या शाळेत अनेक उपक्रम राबवत असतात.याही वर्षी त्यांनी गणित विषयावर आधारित नवोपक्रम SCERT pune यांच्याकडे सादर केला होता.या उपक्रमाचे सादरीकरण २१डिसेंबर रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे आयोजित करण्यात आले होते.त्यात मिनाक्षी नागराळे वाशिम यांच्या उपक्रमास तृतीय मानांकन मिळाले.स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.गट शिक्षणाधिकारी मा.राजेंद्र शिंदे साहेब व केंद्रप्रमुख विलास गोटे सर,शाळेचे मुख्याध्यापक रामकिसन वाकुडकर सर व केंद्रातील तसेच वाशिम पंचायत समिती मधील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश सुर्वे (जिल्हा समुपदेशक डायट वाशिम) यांनी केले तर तंत्रज्ञान टेक्निकल श्री विश्वंभर आळणे (विषय सहाय्यक डायट ) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विलास कडाळे (अधिव्याख्याता )स्वाती ढोबळे (डायट, वाशिम)श्रीमती संजीवनी दारोकार (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) श्रीमती स्मिता इंगळे (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) आदींनी अथक परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन श्री.विश्वंभर आळणे सरांनी मानले. सर्व विजयी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Saturday, 16 October 2021

मिनाक्षी पांडुरंग नागराळे कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

Saturday, 18 September 2021

वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

*वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*

  जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव ता.जि.वाशिम येथील आदर्श शिक्षिका मीनाक्षी पांडुरंग नागराळे यांना रयतेचा कैवारी शैक्षणिक डिजिटल दैनिक वृत्तपत्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त "राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने" १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले आहे.
     त्याचबरोबर त्यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले असून दप्तर मुक्त शाळा,गोष्टीचा शनिवार, तंबाखू मुक्ती साठी बाबास पत्र लिहा, तंबाखूजन्य पदार्थाची होळी, पक्षी वाचवा उपक्रम तसेच शैक्षणिक pdf, PPT, flipbook तयार करणे आणि राज्यभरातील शिक्षिकांना 'उपक्रमशील व तंत्रस्नेही' व्हाट्सअप समूहाद्वारे लॉकडाउन काळामध्ये ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करणे व लॉकडाऊन काळात हजारो शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती करून युट्युबवर प्रसारित करीत शाळा बंद पण शिक्षण आहे सुरू या सदराखाली महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर लॉकडाउन काळात माजी विद्यार्थ्यांकडून जे नोकरीवर लागले आहेत अशा विद्यार्थ्याकडून जिल्हा परिषद शाळेचे ऋण व्यक्त करण्याकरता लोकसहभाग गोळा करून शाळेची उत्कृष्ट रंगरंगोटी केली आहे. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांचे साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रात नाव कमावले आहे. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यातले व जिल्ह्यातले विद्यार्थ्यांचे पहिले काव्यसंग्रह 'उमलती फुले' स्वखर्चाने प्रकाशित केले असून त्यांचे 'चिमणी पाखरं' आणि स्वराज्याचे मावळे हा ऐतिहासिक काव्यसंग्रह शालेय शिक्षण सचिव नंदकुमार साहेब, खासदार भावना गवळी, आमदार पाटणी,आमदार अमित झनक व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब (स्वराज्यरक्षक मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता )यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहेत. स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.त्यांचे अनेक लेख व जवळपास ४० पुस्तकावरची समीक्षेने, कविता, महाराष्ट्राच्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्याची दखल घेत रयतेचा कैवारीच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे आणि सेवानिवृत्त प्राचार्य बी.बी. जाधव यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार निलेश लंके, राजूदास जाधव, अमृत बांगर, गोपीनाथ जगताप, रामदास रहाणे, परसराम निखाडे, संगीता नरवाडे, रेतीचा कैवारीचे मुख्य संपादक शाहू संभाजी भारती आदींची उपस्थिती होती.
       मिनाक्षी नागराळे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ व मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने शिक्षण वर्गाकडून तसेच माजी शिक्षणाधिकारी अंबादास मानकर गट शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे केंद्रप्रमुख विलास गोटे जिजाऊ ब्रिगेड, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना वाशिम तसेच मराठा सेवा संघाचे वाशिम जिल्हा सचिव नारायणराव काळबांडे व सर्व शिक्षक वृंदाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Wednesday, 8 September 2021

मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे कोवीड योध्दा म्हणून सन्मानित...

*मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे सन्मानित*

          मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त वाशिम येथील सर्कीट हाऊसमध्ये कोवीड १९ च्या काळात सेवा करणारे डॉक्टर्स,नर्स, पोलीस,शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांना कोरोना योध्दा म्हणून ग्रंथ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकराव महाले, उद्घाटक आमदार अॅड किरणराव सरनाईक, प्रमुख अतिथी आमदार अमित झनक बाबाराव पाटील खडसे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश अहेर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद वानखेडे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष माधवराव अंभोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.राजुभाऊ चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष सौ.संजिवनीताई बाजड,मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव शिवश्री.नारायणराव काळबांडे, नागेश काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम यांना सन्मानित करण्यात आले.त्यांनी कोरोना काळात लोकवर्गणीतून शाळा रंगरंगोटी केली.तसेच विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करून ऑफलाईन शिक्षण दिले.'शाळा बंद शिक्षण आहे सुरू' या सदराखाली अनेक शैक्षणिक पिडीएफ,पी.पीटी,फ्लीपबुक ची निर्मिती केल्याबद्दल 'कोवीड योध्दा' म्हणून मिनाक्षी नागराळे वाशिम यांना मराठा सेवा संघातर्फे प्रमाणपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाबळे सर यांनी केले,तर आभार शिवश्री नारायणराव काळबांडे यांनी मानले.या कार्यक्रमास जिल्ह्यातील  प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिष्ठित डॉक्टर्स, पोलिस,नर्स, पत्रकार, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,शिक्षक आदि उपस्थित होते.

Sunday, 4 April 2021

वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांना ऑथर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित...

 *वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांना स्टोरी मिररचा ऑथर ऑफ द इयर 2020 या पुरस्काराने सन्मानित*

          लाखो वाचक असलेल्या वेबसाईट वर भारतातून लाखो वाचक,लेखक सहभागी होत असतात.स्टोरी मिरर या वेबसाईटवर लेखकाला हवे तसे कथा,कादंबरी, कविता,क्योट्स असे लिखाण करण्यासाठी एक मुक्त अशी हक्काची जागा आहे.मिनाक्षी नागराळे यांनी 2020 या वर्षात या साईटवर अनेक कथा,कविता,क्योट्स मराठी भाषेमधून लिहीलेल्या आहेत.आजपर्यंत त्यांनी स्टोरी मिरर चर्या अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.अनेक पुस्तके बक्षिसही मिळाली आहेत.अनेक व्हॉव्हचर त्यांना मिळाले आहेत.त्यांचे साहित्य हजारो लोकांची पसंतीस उतरले आहे.स्टोरी मिररच्या माध्यमातून साहित्याचा प्रवास सुखद न नवनवीन स्पर्धेच्या माध्यमातून घेतल्याने लेखकाला नविन उर्जा मिळते.असं त्या सांगतात..
         बेस्ट ऑथर ऑफ द इयर 2020 च्या पुरस्काराच्या मानकरी वाशिम जिल्ह्यातील मिनाक्षी पांडुरंग नागराळे (जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव ता.जि.वाशिम) यांनी लिखाणात वर्षभर सातत्य ठेवून भारतातून एडीटर चॉईस व लोकांनी दिलेल्या वोटींमध्ये मराठी भाषेमधून दुसरे स्थान पटकावले आहे.आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.परंतू हा पुरस्कार भारतातून असल्याने मराठी भाषेबद्दलचे त्यांचे प्रेम,मराठीचा गोडवा त्यांच्या नसानसांत भिनला आहे.मराठीवरचे प्रेम दिसून येते.सतत लिहीते राहण्याची जिद्द, आणि वाचकांच्या पसंतीस उतरलेले त्यांचे साहित्य याला न्याय देण्यासाठी,त्यांचा सन्मान करण्यासाठी स्टोरी मिरर या वेबसाईटवरून प्रमाणपत्र व ट्रॉफी पोस्टाने पाठवून मिनाक्षी नागराळे यांना सन्मानित करण्यात आले आहे....
          मिनाक्षी नागराळे या तंत्रस्नेही एक आदर्श शिक्षिका आहेत.शाळेत त्यांचे अनेक उपक्रम सतत राबवित असतात.लॉकडाऊन काळातही त्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून जि.प.शाळा.कोकलगाव या शाळेचा कायापालट केला.तसेच त्यांच्यावर लॉकडाऊन काळातील हिरोईन या सदराखाली पत्रकार गजानन धामणे यांनी स्टोरी लिहून प्रकाशित केली. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक,साहित्यीक,व सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असतात.स्टोरी मिररचा भारतातला मराठी भाषेचा सर्वोच्च सन्मान वाशिम जिल्ह्यातील मिनाक्षी नागराळे यांना मिळाल्यामुळे सर्व साहित्यीक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे....

राज्यस्तरीय निरजा काव्य स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला...!!

 *राज्यस्तरीय निरजा काव्य स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला*
------------------------------------------
      1 मार्च 2020 ला नीरजा चा 4 था वाढदिवस व नीरजा काव्य समूहाचा 3  रा वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय नीरजा रचना स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. या स्पर्धेचे असामान्य महत्त्व आहे.' झेप  नीरजेची ' या विषयावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. नीरजा समूहातील अनेक कवी या स्पर्धेत सहभाग घेतला. नवीन काव्य प्रकार असून सुद्धा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हातील कवींनी सहभाग घेऊन विजेते ठरले. विजेत्यांना सन्मान चिन्ह तर उत्तेजनार्थ कवींना सन्मान पत्र देण्यात आले. 2017 पासून समूहाचे काव्य संग्रह प्रकाशन सोहळा व कवी संमेलन मोठ्या उत्साहाने घेण्यात येतो पण कोरोना संकटामुळे 2020 ला घेण्यात आले नाही. त्यामुळे विजेत्यांचे सन्मान चिन्ह घरपोच पाठविण्यात आले.त्यामधे सर्वोत्कृष्ट कवयित्री.मा.लीना साकरकर,कारंजा जिल्हा वाशिम,उत्कृष्ट कवयित्री.मा.मेधा देसाई ,(पुणे ),प्रथम कवयित्री. मा.ऊर्मी घरत, (पालघर), द्वितीय कवयित्री.मा.शामला पंडित,पुणे तर तृतीय सन्मान कवयित्री.मा.मिनाक्षी नागराळे,वाशिम यांना प्राप्त झाले असून सर्वांचे सन्मान मा. प्रशासक नरेन्द्र गुरुदास कन्नाके, वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने सन्मान पूर्वक घरपोच पाठविण्यात आले आहे.समूहात वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. विजेत्यांना सन्मान पूर्वक ई प्रमाणपत्र दिले जाते.रोज उपक्रम असतो त्यावर अनेक कवी आपली नीरजा सेंड केल्या जातात.आलेल्या नीरजा वर रोज मार्गदर्शन केले जाते. कोरोणा काळात सुध्दा सर्वांचे नीरजा घेऊन स्पंदन नीरजा ई दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यात आले.यामुळेच समूहात एक वेगळा आनंद मिळतो.तसेच लिहिण्याची ऊर्जा प्राप्त होते. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन .पुढील काळात असेच यश संपादन करावे अशी मा.दुर्गा देशपांडे ,मुंबई,मा.गीता केदारे मुंबई, मा.शितल मोतेवार,नागपूर,या सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन केलेले आहे.

Monday, 29 March 2021

पुरस्कार

Saturday, 13 March 2021

meenakshinagraleblogspot.com: सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्का...

meenakshinagraleblogspot.com: सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्का...: सर फाऊंडेशन चे वाशीम जिल्हा नारीशक्ति सन्मान पुरस्कार जाहीर कारंजा  - स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व म...

सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर...

सर फाऊंडेशन चे वाशीम जिल्हा नारीशक्ति सन्मान पुरस्कार जाहीर
कारंजा  - स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त वाशीम जिल्ह्यातील आठ  कर्तृत्ववान शिक्षिकांचा जिल्हास्तरीय नारीशक्ति सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे,अशी माहिती वाशीम जिल्हा महिला समन्वयक  
कु.नीता तोडकर खाडे
व जिल्हा समन्वयक  गोपाल खाडे व विजयकुमार रौराळे यांनी दिली.लवकरचं कोव्हिड परिस्थितीचा  विचार करुन नियम पाळुन पुरस्काराचे  ऑनलाइन वितरण होणार आहे. शिक्षिका म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन,सामाजिक कार्यातील सहभाग व कोविड काळातील योगदान याचा विचार करुन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.यावर्षीच्या वाशीम जिल्हा पुरस्कार विजेत्या
मंजुषा लहाबर कारंजा,मिनाक्षी नागराळे वाशिम
,प्रा.सविता मोरे मंगरुळपीर,
उषा हाडे रिसोड,
आश्विनी कुलकर्णी मानोरा,
गीता खंदारकर मालेगांव,
नीशा खुमकर कारंजा,
व श्वेता पळशीकर वाशिम
यांची निवड झाली आहे. ही निवड वाशीम जिल्हा महिला समन्वयक  
कु.नीता तोडकर खाडे व जिल्हा समन्वयक गोपाल खाडे व विजयकुमार रौराळे
यांनी ह्या निवडसमितीत काम पाहले. निवडीबद्दल सर फाऊंडेशनचे महिला राज्य समन्वयक सौ. हेमा शिंदे(वाघ),  राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

Friday, 17 July 2020

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांची लॉक डाऊन काळात भरीव कामगिरी....



उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी नागराळे  यांची लॉकडाऊन काळात भरीव कामगिरी

लॉकडाऊनमधील हिरो
मीनाक्षी नागराळे

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांना अपार मेहनत घ्यावी लागते. प्राथमिक शिक्षणाचा बेस पक्का झाल्यानंतर तो विद्यार्थी भविष्यात कुठेच मागे राहत नाही. त्यामुळे प्राथमिक शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रचंड कष्ट घेतात. मात्र,  यातही काही शिक्षकांचे कार्य ठळकपणे दिसून पडते. ज्या शाळा आदर्शवत ठरतात,  त्या शाळांच्या आदर्शत्वामागे त्या शाळेतील शिक्षकांचे असणारे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. अशाच एक  आदर्श शिक्षिका आहेत की,  ज्यांनी ज्या ज्या  शाळांवर ज्ञानदान केले,  त्या शाळांचे रुपडे बदलण्यासह विद्यार्थ्यांनाही सुसंस्कारित करून सोडले आहे. एवढेच काय तर प्राथमिक शाळेतील मुलांचा एक बालकाव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित केला. विद्यार्थ्यांसाठी अविरत काहीतरी करण्याचा ध्यास घेतलेल्या ह्या शिक्षिकेने लॉकडाऊन काळातील वेळही सत्कर्मी लावला आणि आपल्या शाळेच्या भिंतींना बोलके करून शाळेचे रूपडे पालटवले.  तसेच आपल्यासारख्याच राज्यभरातील शिक्षिकांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देत “ई ” शिक्षणाचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले. लॉकडाऊन काळातील प्रत्येक दिवस आपल्या शैक्षणिक कार्यास समर्पित करून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.  मीनाक्षी पांडुरंग नागराळे असे त्यांचे नाव.

वाशिम तालुक्यातील आणि विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असणार्‍या कोकलगाव या गावातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या सहाय्यक शिक्षिका आहेत. त्यांचे मूळ गाव लातूर असले तरी, त्यांच्या  नोकरीची सुरुवातच वाशिम जिल्ह्यातून झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दगड आणि शेणाचा मारा सहन करून मुलींना शिक्षित केल्याची घटनाच नागराळे मॅडमची प्रेरणा असल्याने त्यांनी नोकरीच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे ठरविले होते. त्या १४ वर्षांपूर्वी सध्या कार्यरत असलेल्या कोकलगावच्या जिल्हा परिषद शाळेत पहिल्यांदा रुजू झाल्या होत्या. तेथे चार वर्षे ज्ञानदान केल्यानंतर त्यांची वाशिम तालुक्यातीलच सुकळी या गावात बदली झाली. सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन इतर शिक्षकांच्या मदतीसह लोकसहभागातून या गावची शाळा डिजिटल केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रचंड मेहनत घेतल्याने त्यांचे विद्यार्थी ठळकपणे झळकत होते. आपल्या कवयित्रीपणा आणि साहित्यकलेच्या प्रभावामुळे त्यांचे तिसरी,  चौथीतील विद्यार्थीही काव्यरचना करते झाले होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रचनांचा आणि बालविद्यार्थ्यांचा पहिलावहिला बालकाव्यसंग्रह “उमलती फुले” हा ग्रंथ प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी याच शाळेत पार पाडले. तब्बल नऊ वर्षे सुकळी या गावात ज्ञानदान केल्यानंतर गतवर्षी त्यांची पुन्हा सुरुवातीच्या शाळेत म्हणजेच कोकलगाव येथील जि. प. शाळेत बदली झाली.

येथे आल्यानंतर त्यांना या शाळेची दुरावस्था तसेच गावकऱ्यांची शाळेबद्दल असलेली अनास्था स्वस्थ बसू देत नव्हती. या शाळेला अत्याधुनिक करत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पालकांनी या शाळेत आपली मुले टाकण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी पाऊल उचलले, पुढाकार घेतला. त्यानंतर गावातील शिक्षणप्रेमींना प्रोत्साहित करण्याचे काम सुरू केले.  म्हणतात ना, “इच्छा तेथे प्राप्ती” या उक्तीनुसार नागराळे मॅडमच्या शाळेसंदर्भातील तळमळीमुळे गावातील शिक्षणप्रेमी युवकांनी या शाळेकडे विशेष लक्ष घालून गावात शाळा बचाव समितीच्या माध्यमातून काही पैसा उभा केला. आणि शाळेच्या रंगरंगोटी ला सुरुवात झाली. त्यानंतर कळकट मळकट दिसणार्‍या शाळेच्या भिंती सुंदर रेखाटन चित्रांनी खुलून दिसू लागल्या. अश्याप्रकारे  या शाळेचे रुपडे बदलण्याच्या कामाला गती येताच कोरोना या  महामारीचा राज्यात शिरकाव झाला आणि लॉकडाऊन सुरू झाले. मात्र, नागराळे मॅडम यांनी  पुढाकार घेत सुरू केलेले शाळेच्या रंगरंगोटीचे काम सुरूच ठेवले.  आणि महिना दोन महिन्यात शाळेला एक नवा आयाम दिला.  पेंटिंग काम करणाऱ्या पेंटरला योग्य मार्गदर्शन करून शाळेच्या प्रत्येक भिंतीला बोलके केले, आणि लॉकडाऊन काळातही आपले कर्तव्य चोखपणे बजावले.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी पालकांचा “माझी जि प शाळा” हा व्हाट्स अँप ग्रुप तयार केला आणि शैक्षणिक बाबींची माहिती देत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू ठेवले. जे आजही अव्याहतपणे सुरू आहे. एप्रिल महिन्यात
त्यांनी तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन मुलांना कसे शिकवावे . याचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभरातील शिक्षिकांचा “राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका” हा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. स्वतः ॲडमिन होऊन त्यांनी राज्यभरातील शिक्षिकांना सहभागी करून घेत एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी चार वेळा ऑनलाइन तंत्रस्नेही कार्यशाळा घेतली. या माध्यमातून "ई"  शैक्षणिक साहित्य निर्मिती, ऑनलाईन चाचण्या कशा करणे, क्लिप बुक चा वापर, व्हिडिओ निर्मिती अशा विविध प्रकारांचे ऑनलाईन प्रशिक्षण त्यांनी  दिले. या कार्यशाळेत सहभागीतांची स्पर्धा घेत त्यांनी प्रमाणपत्रेही दिलीत. नागराळे मॅडम यांनी यापूर्वीही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतांनाचे शेकडो प्रकारचे विविध उपक्रमशील व्हिडिओ  आपल्या यु ट्युब  चॅनल प्रकाशित केले आहेत. त्यांचे “मीनाक्षी पी नागराळे” या नावाचे यूट्यूब चॅनल असून या चॅनल वर त्यांनी संगितमय पाढे म्हणतांनाचा  विद्यार्थ्यांचा टाकलेला व्हिडिओ तब्बल ३३  लाख लोकांनी आजवर पाहिला आहे. हा "यु ट्युब"  क्षेत्रातील विक्रमच म्हणता येईल. या व्हिडिओ मुळे त्यांचे नावलौकिक संपूर्ण राज्यभर आहे.
त्या कवी आणि साहित्यिक सुद्धा आहेत. आजवर त्यांची चिमणी पाखरे, उमलती फुले, आणि स्वराज्याचे मावळे हे काव्यसंग्रह प्रकाशित असून थोर क्रांतिकारक आणि माणुसकीचा झरा हे दोन ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांना कवी म्हणून तीन पुरस्कार तर आदर्श शिक्षिका म्हणून १८ पुरस्कार मिळाले आहेत. ऑनलाइन स्पर्धेतील प्रमाणपत्र तर १ हजार  च्याही वर त्यांना मिळाली आहेत. लॉकडाऊन काळात त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधा, शिक्षिकांची ऑनलाईन तंत्रस्नेही कार्यशाळा घेण्यासह विविध विषयांवर ३० लेख प्रकाशित केले आहेत. अशाप्रकारे शिक्षण क्षेत्रात अत्युच्च आदर्श ठरणारे कार्य नागराळे मॅडम यांच्या हातून होत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा त्यांनी घेतल्यामुळे विद्यार्थीच नव्हे तर एक संस्कारक्षम पिढी घडविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.

नागराळे मॅडम यांचे वडील शेतकरी होते. त्यांना दोन भाऊ आहेत. त्यांचे दहावीचे शिक्षण झाल्यानंतरच त्यांचे लग्न झाले होते. मात्र, विवाहानंतर अवघ्या चार वर्षांनंतरच त्यांच्या पतींचे निधन झाले होते. त्यावेळी त्यांना एक मुलगा झाला. पतीच्या निधनानंतर त्यांनी खचून न जाता आपल्या मुलाला वडिलांकडे ठेवून बारावीचे शिक्षण घेऊन नंतर डी एड पूर्ण केले. आणि शिक्षकाच्या नोकरीसाठी त्या पात्र ठरल्या. पुढे त्यांनी शिक्षकी नोकरी करतांनाच एम ए ची पदवी प्राप्त केली. आज त्यांचा मुलगा वैभव हा बी ए एम एस हे डॉक्टरकिचे शिक्षण घेत आहे. त्याला पुढे एम डी करण्यासह एम पी एस सी किंवा यु पी एस सी ची तयारी करून  अधिकारी बनविण्याचा त्यांचा मानस आहे. अशाप्रकारे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देत एक आदर्श शिक्षिका म्हणून आपल्या कार्याचा आमिप ठसा उमटविनाऱ्या  मीनाक्षी नागराळे मॅडम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे असून कौतुकास पात्र ठरणारे आहे. त्यांच्या या एकूणच कार्यासह त्यांनी लॉकडाऊन काळात केलेल्या विशेष कार्याची आम्ही प्रकर्षाने दखल घेतली आहे. त्यांचे हे कार्य आमच्या “लॉकडाऊनमधील हिरो” या सदरासाठी पात्र ठरले असले तरी त्यांना आम्ही महिला भगिनी  या नात्याने “लॉकडाऊनमधील हीरोईन” म्हणून संबोधत आहोत. त्यांच्या या एकूणच कार्यास आम्ही “दै. सिटीन्यूज सुपरफास्ट” च्या वतीने मानाचा मुजरा करत आहोत. सॅल्युट करत आहोत.

गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम...

Monday, 22 June 2020

सावित्रीच्या ख-या वारसदार...

 *सावित्रीच्या खऱ्या वारसदार*

कार्येषु दासी करणेषु मंत्री
रुपेषु लक्ष्मी क्षमाया धरित्री
भोज्येषु माता शयनेषु रभ्भा
षटकर्मयुक्ता कुलधर्मपत्नी
    कार्यप्रसंगात मंत्री, गृह कार्यात दासी भोजन बनवताना माता, रती प्रसंगात  रंभा, लक्ष्मीच्या रूपात धर्मकार्यासाठी अनुकूल क्षमा करताना धरतीप्रमाणे असे स्त्रियांचे वर्णन संस्कृत पुराणात केलेले आहे. पण आता एकविसाव्या शतकात याहीपुढे जाऊन स्त्रिया प्रत्येक क्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत.अगदी आकाशाला सुद्धा गवसणी घातली आहे. अशाच आहेत आमच्या उपक्रमशील व तंत्रस्नेही समूहाच्या शिक्षिका. शाळेत जाऊन फक्त मुलांना शिकविणे एवढेच आपले काम नसून, आपल्या पुढे असणारे चिमुकले बालक हे या देशाचे आधारस्तंभ आहेत असा विचार करून त्यांना घडवण्यासाठी त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. सतत नावीन्याचा ध्यास आणि माझ्यातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना कसे देता येईल याचा विचार त्या करतात. गेली दोन महिने मी या व्हाट्सअप समूहाला  जोडले गेले यातील प्रत्येक शिक्षिके मध्ये वेगळेपण दडले आहे.
         समूह प्रशासिका आहेत कु. मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे ज्या स्वतः उपक्रमशील शिक्षिका सोबतच उत्तम कवयित्री, लेखिका व तंत्रस्नेही सुद्धा आहेत. त्यांची अनेक पुस्तके व कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कोरोना काळात त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या जीवनावर 'थोर क्रांतिकारक' नावाचे पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये असे क्रांतिकारक की जे समाज व शासनाकडून उपेक्षित राहिले आहेत, अशांची नोंद त्यांनी या पुस्तकात घेतली आहे. तसेच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांसोबत आपल्या सर्वस्वाचे बलिदान करणारे मावळे यांच्या जीवनावर 'स्वराज्याचे मावळे' नावाचा काव्यसंग्रह त्यांनी लिहिला या काव्यसंग्रहाची महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. स्वराज्यातील मावळ्यांच्या जीवनावर अशा प्रकारचा हा पहिलाच ऐतिहासिक काव्यसंग्रह आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. 
  
 14 मे पासून त्यांच्या मार्गदर्शनात समूहातील इतर शिक्षिका यांनी मिळून अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. 'जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे 
शहाणे करूनी सोडावे सकलजन'
या उक्तीप्रमाणे या सर्व शिक्षिका इतर मैत्रिणींना आपल्या जवळचे ज्ञान वाटण्याचे काम करतात. यामध्ये

1ब्लेंड कोलाज-मीनाक्षी नागराळे

2 ऑनलाइन टेस्ट तयार करणे-सोनाली साळुंखे

3 फ्लिप बुक तयार करणे-सुचिता कुलकर्णी

4 पोस्टर तयार करणे गायत्री शिंदे

5 पीडीएफ तयार करणे-सोनाली साळुंखे

6 फेसबुक वरील व्हिडीओ डाऊनलोड करणे-सुनीता पवार

7 लोगो तयार करणे-मीनाक्षी नागराळे
अशाप्रकारे विविध विषयावरील सात कार्यशाळा त्यांनी घेतल्या. लॅाकडाऊन मुळे सर्व मंडळी घरात बसून कंटाळले आहेत पण या सर्व शिक्षिका रोज नवनवीन शिकतात व शिकवतात. कार्यशाळेची वेळ तीन ते पाच च्या दरम्यान ठेवतात म्हणजेच घरातील सर्व कामे आटोपून यांना कार्यशाळेला हजर होता येईल. प्रत्येकीच्या   मागे घरातील भरपूर काम आहे. सुट्टी असल्यामुळे सर्व मंडळी घरी, विविध पदार्थ बनवून सर्वांना खाण्यासाठी देणे ,कामवाल्या बाया बंद असल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे. हे सर्व करून उरलेल्या वेळेमध्ये काही तरी नवीन शिकण्याचा ध्यास खरंच कौतुकास्पद आहे. कार्यशाळेच्या नंतर दोन-तीन दिवसातच त्या कार्यशाळेत झालेल्या विषयावर एक स्पर्धा आयोजित करतात. नंतर दोन-तीन दिवसांमध्ये त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करणे, सर्व विजयी व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देणे हे सर्व नियोजन करण्यासाठी त्यांचा कितीतरी वेळ यासाठी त्या खर्ची घालतात.सर्वजणी ठरलेल्या वेळी ऑनलाईन येऊन प्रशस्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम सुद्धा पार पाडतात. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे नियोजित करतात. सर्वांचे टाळ्या वाजून स्वागत करतात. सावित्रीचा फोटो गृप वर टाकतात.लगेच फोटोला हार घालतात. सर्वजणी टाळ्या वाजवतात प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या सखीला पेढा किंवा स्वीट पदार्थ पाठवतात. हे सर्व पाहताना मला फार मज्जा वाटते. किती उत्साहाने  करतात हे सर्व. याबरोबरच उन्हाळाभर रोज विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास घेणे व होमवर्क देणे हे काम सुद्धा त्यांचे सुरूच आहे गुगल फॉर्म वर अनेक टेस्ट सोडवायला त्यांनी दिलेले आहेत. होमवर्क पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल वरच व सन्मानचिन्ह सुद्धा पाठवतात.म्हणजे स्वतः सतत बिझी व विद्यार्थ्यांनाही सतत बिझी ठेवतात. यापैकी अनेक शिक्षिकांचे युट्युब चॅनल सुद्धा आहेत स्वतःच्या शाळेचे ब्लॉग सुद्धा त्यांनी बनवलेले आहेत, भरपूर व नवनवीन  उपक्रम राबवतात. बऱ्याच शिक्षिका लेखिका, कवयित्री व विविध पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत स्त्रियांबद्दल ची लोकांची धारणा होती की स्त्रियाच स्त्रियांना मागे ओढतात पण हे चुकीचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी ज्या उदात्त हेतूने मुलींच्या शिक्षणासाठी  सर्वस्व अर्पण केले, त्याचे सार्थक होत आहे असे वाटते. शिक्षकांच्या तुलनेत शिक्षिका या जास्त प्रयत्नशील व कृतीशील आहेत सतत नवनवीन प्रयोग करणे ज्ञानरचनावाद, हसत खेळत शिक्षण, या ना त्या मार्गाने विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी त्या प्रयत्न करतात .ज्याप्रमाणे आई ही पहिली गुरु असते त्याप्रमाणे शिक्षिका गुरु आणि आई अशा दोन्ही भूमिका निभावत असतात व विद्यार्थ्यांना परिपूर्ण करतात. या समूहातील शिक्षका महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातील आहेत. सांगली, सातारा, सोलापूर, जळगाव नाशिक ,अमरावती, वाशिम अशा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या सर्व शिक्षिका एकत्र येऊन आपल्या ज्ञानाचा वसा एकमेकींना देत  आहेत हेच तर अपेक्षित होते सावित्रीबाईंना.

'हमे भी हवा के साथ चलना आ गया
हमे भी रुख बदल ना आ गया
हमे जो ठोकर लगी रस्ते मे
जमाने को संभलना आ गया
रहो होशियार अब दरिया की मॊजो
किनारो को भी उछलना आ गया'
मैत्रिणींनो सलाम तुमच्या कार्याला.

*सौ.हर्षा अविनाश पसारकर*
*प्राचार्य विठाबाई पसारकर विद्यामंदिर केकत उमरा*
*जि .वाशिम*

Thursday, 28 May 2020

स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन...

Saturday, 16 March 2019

जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह प्रकाशन करून सुकळी शाळेने रोवला मानाचा तुरा.....

कवयित्री मिनाक्षी नागराळे यांच्या चिमणी पाखरं व उमलती मुले या जिल्ह्यातील  पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले मोठ्या थाटामाटात.... 

शिक्षणाधिकारी मानकर साहेब यांच्या हस्ते होणार प्रकाशन

वाशिम तालुक्यातील उकळी पेन केंद्रशाळे अंतर्गत असलेल्या जि.प. शाळा सुकळी येथील कवयित्री असलेल्या सहायक शिक्षीका मिनाक्षीताई नागराळे यांच्या बालकांच्या भावविश्वाशी संबंधीत ' चिमणी पाखरं ' व ' उमलती फुले ' या काव्यसंग्रहांचे प्रकाशन कार्यक्रम सोमवारी ११ मार्च रोजी वाशिम येथील लाखाळा परिसरातील केमीस्ट भवनमध्ये दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले होते.उमलती फुले या बालकविताचे प्रकाशन संपादिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे मॅडमनी करून जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह म्हणून सुकळी शाळेने मानाचा तुरा रोवला आहे...
     लहान लहान विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे कविता करू शकतात याचा उत्तम नमुना म्हणजे उमलती फुले....

जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अशोकराव महाले राहणार असून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर साहेब यांच्या हस्ते काव्यसंग्रहांचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी  गजानन बाजड, मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस नारायणराव काळबांडे चित्रपट निर्माता तथा साहित्यीक सत्येंद्र राऊत, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संजीवनीताई बाजड व प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती आर.एच.वाघ, सुरेश सरनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक परसराम भोयर, सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक संजय डवरे, उकळी पेन केंद्राचे केंद्रप्रमुख नामदेव सरदार, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव बोरकर, साहित्यीक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काळे, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलासराव सोळंके, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख विलास गोटे, साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर महाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष देवबा शिंदे, अजिंक्य प्रकाशनच्या संचालक अॅड. जयमाला भगत, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तराव इढोळे, युक्टा जिल्हाध्यक्ष दिपक जावळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष शत्रुघ्न गवळी, केंद्रप्रमुख शेषराव गोटे, रामेश्वर दंडे, ज्ञानेश्वर भोयर, बापूराव महाले, दिलीपराव गवई, अ.भा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय मनवर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद घुगे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक नागेश कव्हर, केशवराव वाबळे, नारायणराव सरनाईक, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष मंचकराव तायडे, वऱ्हाडी कवि भारत लादे आदीे उपस्थित होते...
     विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर करून मोठ्या माणसाला विचार करायला लावले.तंबाखू सोडा ही कविता...व्यसनानी कसा घात होते हे सांगून गेली....
      मिनाक्षी नागराळे मॅडम या संवेदनशील शिक्षिका व आदर्श कवयित्री असल्याने हे शक्य झाले असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी मा.मानकर साहेब यांनी सांगितले....