कवयित्री मिनाक्षी नागराळे यांच्या चिमणी पाखरं व उमलती मुले या जिल्ह्यातील पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले मोठ्या थाटामाटात....
शिक्षणाधिकारी मानकर साहेब यांच्या हस्ते होणार प्रकाशन
वाशिम तालुक्यातील उकळी पेन केंद्रशाळे अंतर्गत असलेल्या जि.प. शाळा सुकळी येथील कवयित्री असलेल्या सहायक शिक्षीका मिनाक्षीताई नागराळे यांच्या बालकांच्या भावविश्वाशी संबंधीत ' चिमणी पाखरं ' व ' उमलती फुले ' या काव्यसंग्रहांचे प्रकाशन कार्यक्रम सोमवारी ११ मार्च रोजी वाशिम येथील लाखाळा परिसरातील केमीस्ट भवनमध्ये दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले होते.उमलती फुले या बालकविताचे प्रकाशन संपादिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे मॅडमनी करून जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह म्हणून सुकळी शाळेने मानाचा तुरा रोवला आहे...
लहान लहान विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे कविता करू शकतात याचा उत्तम नमुना म्हणजे उमलती फुले....
जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अशोकराव महाले राहणार असून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर साहेब यांच्या हस्ते काव्यसंग्रहांचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस नारायणराव काळबांडे चित्रपट निर्माता तथा साहित्यीक सत्येंद्र राऊत, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संजीवनीताई बाजड व प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती आर.एच.वाघ, सुरेश सरनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक परसराम भोयर, सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक संजय डवरे, उकळी पेन केंद्राचे केंद्रप्रमुख नामदेव सरदार, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव बोरकर, साहित्यीक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काळे, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलासराव सोळंके, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख विलास गोटे, साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर महाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष देवबा शिंदे, अजिंक्य प्रकाशनच्या संचालक अॅड. जयमाला भगत, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तराव इढोळे, युक्टा जिल्हाध्यक्ष दिपक जावळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष शत्रुघ्न गवळी, केंद्रप्रमुख शेषराव गोटे, रामेश्वर दंडे, ज्ञानेश्वर भोयर, बापूराव महाले, दिलीपराव गवई, अ.भा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय मनवर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद घुगे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक नागेश कव्हर, केशवराव वाबळे, नारायणराव सरनाईक, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष मंचकराव तायडे, वऱ्हाडी कवि भारत लादे आदीे उपस्थित होते...
विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर करून मोठ्या माणसाला विचार करायला लावले.तंबाखू सोडा ही कविता...व्यसनानी कसा घात होते हे सांगून गेली....
मिनाक्षी नागराळे मॅडम या संवेदनशील शिक्षिका व आदर्श कवयित्री असल्याने हे शक्य झाले असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी मा.मानकर साहेब यांनी सांगितले....
No comments:
Post a Comment