Sunday, 31 May 2020

*दानशूर,कर्तृत्वान,कुशल,राज्यकर्ती धाडसी स्त्री-अहिल्याबाई होळकर*

 Date: 30 May 2020

*दानशूर,कर्तृत्वान,कुशल,राज्यकर्ती धाडसी स्त्री-अहिल्याबाई होळकर*

      इतिहासाच्या पानांमध्ये एक सुवर्णाक्षरी पान म्हणजे दानशूर,कर्तुत्वान आणि कुशल राज्यकर्ती स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर होय.त्यांचा जन्म ३१ मे १७२५ अहमदनगर जिल्ह्यातील चौंढी या छोट्याशा गावात झाला.धनगर समाजात जन्माला आलेल्या अहिल्याबाई चे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेरावाशी झाला. त्यांना दोन अपत्ये झाली. मुलगा मालेराव व मुक्ताबाई ही कन्या... खंडेराव यांचा कुंभारी येथे लढाईत मृत्‍यू झाला. अहिल्याबाईंना वयाच्या २८ व्या वर्षी वैधव्याला  सामोरे जावे लागले.प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या पण सासरे मल्हारराव होळकरांनी "प्रजाहितासाठी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य तुम्हाला सांभाळायची आहे" असे म्हणल्यामुळे त्यांचा मान राखला व राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले.मल्हाराव ज्यावेळी मोहिमेवर जात तेव्हा अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोखपणे राखीत असत.
          मल्हाराव होळकर यांना पेशव्याने इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती.दौलतीचा कारभार मोठा होता पण १७६६ मध्ये मल्हाररावांचे निधन झाले.त्यामुळे आलेल्या अहिल्याबाईवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. पुढे २८ वर्षे राज्य कारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला.अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ⇨ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
        अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी ⇨ शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने आहिल्याबाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.
अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
            अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.
             राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या.जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
        आहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
        अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली.अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.
मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते.महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
      अशा महान कर्तबगार धाडसी स्त्रीव्यक्तीमत्वाला मानाचा मुजरा... विनम्र अभिवादन....

लेखिका/कवयित्री
©️®️कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम...

उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहातील तंत्रस्नेही शिक्षिकांनी तयार केलेलीऑनलाइन चाचणी सिरीयल भाग 3

 *उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची चाचणी सिरीयल... work from home ....*
 
🌹 *भाग ३*🌹

*उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची चाचणी सिरीयल... work from home ....*
 
🌹 *भाग ३*🌹

*101) योगिता लोखंडे*

https://forms.gle/u4VrADzJQwd1uydo7

*102)उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/k7hgoswsNXFLAVL26

*103)गायत्री शिंदे*

https://forms.gle/zVNdzcYbxtWaD1G69

*104)उषा ढेरे, बीड*

https://forms.gle/Cp4VNfuKrQ5JSLXs6

*105)Urmila Lasurkar https://forms.gle/atf4bEro7Nya1Vn5A


*106)https://forms.gle/uAgvd6iGnEWtAKPm8

*107)उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/wurYoWwGtKX1HiyS8

*108) मिनाक्षी नागराळे वाशिम*

https://forms.gle/wy2qvaz9KXqJffD57

*109) चंदा श्रीराम वानखडे वाशिम https://forms.gle/nWLsquaLuFHbDYLP8

*110)उषा ढेरे बीड*

https://forms.gle/G279rxnB4CTR5aBh7


*111) मिनाक्षी नागराळे, वाशिम*

https://forms.gle/kwgUdfgYr9JMVRH19

*112)भावना पाटील*
https://forms.gle/ZPTVZCeGAwHbNpLy6

*113)प्रतिभा पगारे*
 
https://forms.gle/dxEcpb2vfPeEpMEn6

*114)हेमा यादव*
https://forms.gle/bgCNdRvjA9JYKX7f9


*115) साधना पवार*
https://forms.gle/u8zJCgfwqCNKXABE6

*116) मीनाक्षी नागराळे, वाशिम*
 *वासाची किंमत-इयत्ता-३री*

https://forms.gle/5vZPYTfG4czUCecy8

*117)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/sgAPLpKfCer4Ry12A

*118) *सोनाली साळुंखे,जळगाव* 
https://forms.gle/YUpaQ2k5A8PtH1jQ6

*119)*हेमा यादव*
https://forms.gle/xKZaKY8A6NmbQqWu8

*120)https://docs.google.com/forms/d/16EKbmJ9hKnxKpGB-54Gk-pH_MUmR_mlMBMTBmUcWJd8/edit संगीता किसन तांबे मुंबई


*121)श्रीमती आम्रपाली टेंकाळे,हिंगोली
https://forms.gle/k8K2gauoA2v4fPbY7


*122)कु.अर्चना वैद्य वाशिम
https://forms.gle/9xRffgr2FPu8cHwg9


*123) मिनाक्षी नागराळे, वाशिम*
http://online.fliphtml5.com/kspr/duyf/

*124)मेघा जाधव, वाशिम*
https://forms.gle/fBB2twBrb7v5EEon8
*125)  मेघा जाधव,वाशिम https://forms.gle/PhTNpVt8riRqhkEP8                 
 *126)देशमुख शोभाताई अहमदनगर* 
 https://forms.gle/bPj2NFCY16NmRgLw7

*127) मिनाक्षी नागराळे वाशिम*

https://forms.gle/iZFnHFbAwUpvL5Kp8

*128)https://forms.gle/q8Z9fkyRSyRLrMWn7
*योगिता लोखंडे जळगाव*

*129)https://forms.gle/PJyq4Ak8QL4YiPvM9
*अनुपमा अरुणकुमार यादव*

*130)https://forms.gle/TmfRb3mhDG2ECtsY6देशमुख शोभाताई अहमदनगर 

*131)उज्ज्वला फटांगरे 
https://docs.google.com/forms/d/1XgrU5-XUb36jB8fz6O_LB0hEDPp1KEc6qDUKoZYUQMk/edit

*132)उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/UmfFB4Kjoqzd7ggV7

*133)मिनाक्षी नागराळे, वाशिम*

https://forms.gle/8CDG8DsRRJ3PjoKR9

*134) उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/9hL1PQALU7CRbFBS8
*135) योगिता लोखंडे जळगाव*
https://forms.gle/oa5mb1PoTW5ZAidF9


*136) उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/! 

137) प्रतिभा पगारे

इयत्ता - ३ री
विषय - भाषा
https://forms.gle/rEEBZgARefCKFnuZ8

138) https://forms.gle/vsFtuYjviMnr8WDY8

Urmila Lasurkar 
Z.P. Primary school Sutarkhede, Taluka: Chandwad, Dist: Nashik.

139:-) *राणी जगदाळे, सातारा* 

https://forms.gle/dCFG82b8GGprXt2X9

140) *yogita lokhande*Jalgaon
https://forms.gle/Ztit6fZXmQgFdj

141) सौ.हेमा यादव
https://forms.gle/Qp91AZ5yiYYDLCRQ8

     १४२)सौ.वैशाली भोईर
https://docs.google.com/forms/d/1P5nCFuG234CZJYm_iEn10CEEJOQWKz51AQ2uqcfKX-A/edit

143)   जयश्री भड, कारंजा https://forms.gle/98mtKxbisYH93b7L8  

144) सुनिता शिरसाठ https://forms.gle/Xoryu9Cx3ChdBGZx9 

(145) वंदना देवकर ,हिंगोली https://forms.gle/tvbL7MAZgEjEsYPw5 

(146)वंदना देवकर(ढोकणे) https://forms.gle/stDNWRSWodoQxqLS7

148)*योगिता लोखंडे जळगाव*
https://forms.gle/XXSDn9viEJkCeUsr7  

(149) श्रीमती वंदना देवकर,ढोकणे ,हिंगोली https://forms.gle/iSyjRotSRzrho8
qw6 

*150)सुनिता शिरसाठ* https://docs.google.com/forms/d/1YRcSaqE2Pa_LC-DSEEXTDj2m4agjXu0P-kLb9wZPDiI/edit

Thursday, 28 May 2020

बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार...

लोकसहभागातून बदलले कोकलगाव जि.प.शाळेचे रूपडे...

सावित्री वंदना( प्रार्थना)

 Date: 26 May 2020

*सावित्री वंदना(प्रार्थना)*

या चला सावित्रीला
वंदुया चला....वंदुया चला...धृ !!

शिक्षणाची होती जिद्द
बांधली निश्चयाची गाठ
प्लेगबाधित मुलीला वाचविण्यासाठी
दिली त्यांनी आपली पाठ.....

हो ओ हो...S s s
या चला सावित्रीला.....१!!

ज्ञानाची भूक भागविण्यासाठी
काढल्या मुलीसाठी शाळा
ज्ञानज्योत पेटविण्यासाठी
स्वत: आधी शिकली शाळा....

हो ओ हो s s s
या चला सावित्रीला......२!!

ज्ञानामृत पाजण्यासाठी
शेण खरकटे झेलली
ज्योतीबाच्या संगतीने
ज्ञान धनुष्य पेलली

हो ओ हो...s. S.  S
या चला सावित्रीला.....३!!

तुझ्यामुळेच माते
उघडला तिसरा डोळा
तुझ्यामुळेच सावित्रीआई
फुलला शिक्षणाचा मळा...!!

हो ओ हो....s....s....s
या चला सावित्रीला.........४!!

*स्वरचित प्रार्थना*
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे,*
*जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव,वाशिम*

स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन...

"स्वराज्याचे मावळे" या काव्यसंग्रहाची महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद...

Sunday, 24 May 2020

कर्तव्यनिष्ठ पराक्रमी योद्धा सरसेनापती बाजी पासलकर....यांचा स्मृतिदिन२४ मे

Date: 23 May 2020

*कर्तव्यनिष्ठ, पराक्रमी योध्दा सरसेनापती बाजी पासलकर*

          छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्यांपैकी एक मावळा म्हणजे शूर वीर बाजी पासलकर हे होय.१२मावळा पैकी एक मोसे खोऱ्यातील ८४ खेड्याचे राजे होते. स्वराज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले. बाजी पासलकर हे हे मावळ खोऱ्याचे वतनदार निगुडे -मुसे गावापासून ते सांगरून- डावजेपासून धामण -ओव्होळ पर्यंतचा भाग ८४ खेडे यांच्या अखत्यारीत होती. अत्यंत शूर वीर असलेले बाजी पासलकर न्यायदान उत्तम करीत असत. तंटे सोडविण्यात अत्यंत हुशार होते. 
         विजापूरच्या आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सन १६४८ साली फत्तेखानास धाडले होते.फत्तेखानाने बेलसर येथे तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळ जवळील सुभानमंगळ वर हल्ला करून तो किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपती शिवरायांनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसर छावणीवर गेले. अचानक हल्ला करून त्यानी खानाच्या सैन्याची कत्तल केली. व पुरंदर चा पायथा गाठला.फत्तेखानाचा सरदार मुसेखानाने पुरंदरवर हल्ला केला. पुरंदरला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्यांचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले.फत्तेखानाचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. अखेरीस गोदाजीच्या वाराने फत्तेखानाच्या छाताडाचा वेध घेतला. आणि खान खाली कोसळला. लढताना एक घाव बाजी पासलकरांच्या    पाठीमागून त्यांच्या समशेर धारी उजव्या हातावर झाला. अपार वेदना होत असतानाही बाजी वार करणा-यांचा प्रतिकार करीत होते. तेवढ्यात गनिमांची तलवार बाजी च्या छातीवर पडली. पासष्ट वर्षांचे बाजी पडले.
           कावजी मल्हारला हे समजताच वाऱ्याच्या वेगाने सासवडला धावले.आपल्या धन्याची जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दुःखाची जात एकच होती. पुरंदर किल्ला येईपर्यंत बाजींनी आपल्या शिवरायांना पाहण्यासाठी व अखेरचे शब्द बोलण्यासाठी श्वास रोखून ठेवला होता. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला -गोमातेला  बघताच धावत सुटते. तसे राजे पालखी कडे धावले. शिवाजी महाराजांनी बाजीच्या डोक्याखाली आपली मांडी लावली. आणि मगच स्वामीनिष्ठ निष्ठावंत पराक्रमी बाजींनी आपला प्राण सोडला.तो दिवस म्हणजे २४ मे १६४९ होय.मराठ्यांनी स्वराज्याचा रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर यांसारखा वीर रणी पडला.
         बाजी पासलकर यांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. बाजी पासलकर यांची समाधी पुण्यातील सासवड येथे आहे.अशा या थोर पराक्रमी योद्ध्याला मानाचा मुजरा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन....
       जय जिजाऊ जय शिवराय....


लेखिका/कवयित्री
कू.मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम

एका विषाणूने काय शिकवलं?

कर्तव्यनिष्ठ पराक्रमी योद्धा सरसेनापती बाजी पासलकर...

Saturday, 23 May 2020

कर्तव्यनिष्ठ, पराक्रमी योद्धा सरसेनापती बाजी पासलकर....

 Date: 23 May 2020

*कर्तव्यनिष्ठ, पराक्रमी योध्दा सरसेनापती बाजी पासलकर*

          छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्यांपैकी एक मावळा म्हणजे शूर वीर बाजी पासलकर हे होय.१२मावळा पैकी एक मोसे खोऱ्यातील ८४ खेड्याचे राजे होते. स्वराज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले. बाजी पासलकर हे हे मावळ खोऱ्याचे वतनदार निगुडे -मुसे गावापासून ते सांगरून- डावजेपासून धामण -ओव्होळ पर्यंतचा भाग ८४ खेडे यांच्या अखत्यारीत होती. अत्यंत शूर वीर असलेले बाजी पासलकर न्यायदान उत्तम करीत असत. तंटे सोडविण्यात अत्यंत हुशार होते. 
         विजापूरच्या आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सन १६४८ साली फत्तेखानास धाडले होते.फत्तेखानाने बेलसर येथे तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळ जवळील सुभानमंगळ वर हल्ला करून तो किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपती शिवरायांनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसर छावणीवर गेले. अचानक हल्ला करून त्यानी खानाच्या सैन्याची कत्तल केली. व पुरंदर चा पायथा गाठला.फत्तेखानाचा सरदार मुसेखानाने पुरंदरवर हल्ला केला. पुरंदरला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्यांचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले.फत्तेखानाचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. अखेरीस गोदाजीच्या वाराने फत्तेखानाच्या छाताडाचा वेध घेतला. आणि खान खाली कोसळला. लढताना एक घाव बाजी पासलकरांच्या    पाठीमागून त्यांच्या समशेर धारी उजव्या हातावर झाला. अपार वेदना होत असतानाही बाजी वार करणा-यांचा प्रतिकार करीत होते. तेवढ्यात गनिमांची तलवार बाजी च्या छातीवर पडली. पासष्ट वर्षांचे बाजी पडले.
           कावजी मल्हारला हे समजताच वाऱ्याच्या वेगाने सासवडला धावले.आपल्या धन्याची जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दुःखाची जात एकच होती. पुरंदर किल्ला येईपर्यंत बाजींनी आपल्या शिवरायांना पाहण्यासाठी व अखेरचे शब्द बोलण्यासाठी श्वास रोखून ठेवला होता. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला -गोमातेला  बघताच धावत सुटते. तसे राजे पालखी कडे धावले. शिवाजी महाराजांनी बाजीच्या डोक्याखाली आपली मांडी लावली. आणि मगच स्वामीनिष्ठ निष्ठावंत पराक्रमी बाजींनी आपला प्राण सोडला.तो दिवस म्हणजे २४ मे १६४९ होय.मराठ्यांनी स्वराज्याचा रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर यांसारखा वीर रणी पडला.
         बाजी पासलकर यांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. बाजी पासलकर यांची समाधी पुण्यातील सासवड येथे आहे.अशा या थोर पराक्रमी योद्ध्याला मानाचा मुजरा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन....
       जय जिजाऊ जय शिवराय....


लेखिका/कवयित्री
कू.मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम

Sunday, 17 May 2020

उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील शिक्षिका भगिनींनी फक्त पाच दिवसांत १०० ऑनलाईन टेस्ट निर्मिती केली....

 Date: 16 May 2020

*राज्यस्तरीय उपक्रमशिल व तंत्रस्नेही समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची ऑनलाईन चाचणी सिरीयल... work from home साठी सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त...*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*१)शीला आळसपुरे*

https://forms.gle/3rnQ4bLmkqi7dnu88

*२)माधवी सातुनकर*

https://forms.gle/GcphEVY9JiAsP2qs5

*३)प्रतिभा पगारे*
https://forms.gle/rEEBZgARefCKFnuZ8

*४)टेकांळे ए.ए.*

https://forms.gle/oZfnjA4rRfLwFb3t8

*५)रेणुका काटकर*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeFPAtacuwO8fyJI-ibTIF1Udl5jXas6qjxT9iS78HxgJOlHA/viewform?usp=sf_link

*६)जया कुलथे*

https://forms.gle/ePcurwaZhhb6Cy1R9

*७)प्रिती रामढवे*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdDG60A_3zA8npFsmlJ3-B8BfdFWJkkOapVIIj8xqJRqbNSUg/viewform?usp=sf_link

*८)जया कुलथे*

https://forms.gle/Yq3Aq3wrzFz71UL58

*९)सुचीता कुलकर्णी*

https://forms.gle/z44ZdwgNpMpqis3g8

*१०)प्रतिभा पगारे*

https://forms.gle/PP8xtGZijp3WptfFA

*११) मिनाक्षी नागराळे*
 https://forms.gle/TXdcYMJw1r5YDfdYA

*१२)सोनाली साळुंखे

https://forms.gle/jP2hyutL6qok79REA

*१३)*उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/P6yuNYAcAKq9FQ339

*१४)भावना पाटील 

https://forms.gle/D9ydzTHsE4DAwW2P6

*१५)सोळसे मनिषा*

https://docs.google.com/forms/d/1BDLZgsnzxU9VgIwgqglp3CwhB_YLkBPfzbW8T3e8UZs/edit

*१६) अनिता जाधव*
https://forms.gle/KiN8zdSRzjQKjs5m9

*१७)अर्चना वैद्य*
https://forms.gle/35YSkx3f16hKQUjR6

*१८) सुनिता जाधव*

https://docs.google.com/forms/d/1ZN--CIBV_Me575nQp50Dg7TrXOzKpAehJQt82k42BGI/edit

*१९) मिनाक्षी नागराळे* 
(जुनी नाणी ओळखा)

https://forms.gle/LzQobgJPMzUpXERv9

*२०) सुनिता पवार*

https://docs.google.com/forms/d/11l1wwTEilmKek28BgsVI9Fwgc

*२१)योगीता लोखंडे*
https://forms.gle/JJqry5JoVBqfGk7t9

*२२) सोनाली साळुंखे*
https://forms.gle/8gmiErzafWrbDdzZA

*२३)उषा ढेरे*
https://forms.gle/unS5SCxgGxoARemv9

*२४)भावना पाटील*

https://forms.gle/kMkzrmZbNz1dQe7u9

*२५)साधना पवार*

https://forms.gle/KqM8rhSo4U7zdLvY9

*२६)राणी जगदाळे*

https://forms.gle/8nyPLa7Wx2Zocqaq6

*२७)ज्योती परदेशी*

https://forms.gle/jgqWHdmZX7rXXK2H7

२८) *सोनाली* *साळुंखे* 

https://forms.gle/8gmiErzafWrbDdzZA

२९) *आशा कोवे*

https://forms.gle/vpnrr5X1chwdbb4K8

*३०)अर्चना वैद्य*
https://forms.gle/B8fP7kYhrqBeSGce9

*३१)जया कुलथे*
https://forms.gle/TvHH3YYN8wTTPc256

*३२)उज्जवला फटांगरे*
https://docs.google.com/forms/d/14El-269ydqUH_jkUafCIEp1r0UP4g6fmM7iL4Zf69Kg/edit

*३३)वंदना देवकर*
https://forms.gle/4mEbKPucCsQKoYjh7

*३४)हेमलता यादव*
https://forms.gle/w3wkvGwT4TiZkygb6

*३५)अर्चना पवळे*
https://forms.gle/CRgtzF4ncCSpYnJH8

*३६) आम्रपाली दातार*
https://forms.gle/Me13u1vRc5nVez3d8

*३७) सुचिता कुलकर्णी*
https://forms.gle/rTpSHyMWEbbokWq67

*३८)नेहा मांडवगडे*
https://forms.gle/zMeFFgvk7SSBhW3z8

*३९)भावना पाटील*
https://forms.gle/oTv67E7z1nqRqdu86


*४०)चंदा ढोले*

https://forms.gle/4UXpE4E92bPLiXNGA

*४१)जयश्री भड*

https://docs.google.com/forms/d/1ZN--CIBV_Me575nQp50Dg7TrXOzKpAehJQt82k42BGI/edit

*४२)गायत्री शिंदे*

https://docs.google.com/forms/d/1yBCqiqfC-TTopnsHbmhWfpm1m5MpvSMXnBWtu3wom4U/edit?chromeless=1

*४३)उषा ढेरे*
https://forms.gle/P6yuNYAcAKq9FQ339

*४४)आम्रपाली गडदणे*

https://forms.gle/dBaLR2mhqu5MMizY8

*४५)सुचीता कुलकर्णी*

https://forms.gle/nQXzJFkoGHrgPS7X9

*४६)नेहा मांडवगडे*
https://docs.google.com/forms/d/1aro8YeRjinUJyhNrl8PPB54VGF7OQiHlLHrHWRYorLw/edit

*४७)वंदना देवकर*

https://docs.google.com/forms/d/1iz0gUrvpnwW4oyuULPmCfNKnMdsUtgRGYxRkk1MSHa0/edit

*४८)भावना पाटील*
https://forms.gle/1wNo2TLDEvyZ3vf79

*४९)सोनाली साळुंखे*

https://forms.gle/WEgefkjX5GsSvspm8

*५०) मिनाक्षी नागराळे*

https://forms.gle/521ZmRcFTdpN4H6G6

*५१)ज्योती परदेशी*

https://forms.gle/521ZmRcFTdpN4H6G6

*५२)प्रिती रामढवे*

https://forms.gle/zVeMBJhyS6WYi2Dc7
*५३)शोभा दळवी*

https://forms.gle/KzA5FdbwWNRmvDhQ8

*५४) मिनाक्षी नागराळे,वाशिम*

https://forms.gle/jXUTqrSuAX9RFd3GA

*५५) श्रीमती उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/vvJZZB9LdpDxJzJp8


*५६) मिनाक्षी नागराळे,वाशिम*

https://forms.gle/tupSQnyVj8XbjUY59

*५७)Ujjwala Phatangare*
 
https://docs.google.com/forms/d/1ltibc5kMgATaephiMDKE7o5zF7V9ajm4kE8VN_84xPg/edit

*५८ )आम्रपाली गडदणे,पुसद*

https://forms.gle/gCbFeGMYVjUm8tQR7


*५९)प्रतिभा पगारे*
https://forms.gle/H6uPdMfSN4Yejmy48

*६०) संगीता किसन तांबे*

https://docs.google.com/forms/d/13fj1OyD0oyE9k5PhtvjPtUhi3nCGO6u24nyud6IO10o/edit

*भाग 2*

61)नेहा मांडवगडे*

https://docs.google.com/forms/d/1cws0OrZW4ZwAvc7KDWn9SucDz6ZfsMHfLaY-Yo1uZ7A/edit

*६२)उज्जवला फटांगरे*

https://docs.google.com/forms/d/1Qb3CWbS9QiYGIkhSoIixhqvCDsIEUioibCCwvDsiy8I/edit

*६३) वैशाली यादव*

https://forms.gle/VWQWEFNfuNTGEPCn8

*६४)भावना पाटील*
https://forms.gle/CA7TyHFGJZtSc4go8

*६५) सुनिता पवार*

https://forms.gle/w1qwAXkUAsHLsESt8

*६६) मिनाक्षी नागराळे, वाशिम*

 https://forms.gle/QPi5iktBuDR19uTa7

*६७)अनिता जाधव*

https://forms.gle/yCE5MWufFFfNqnEX6

*६८)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/3fgc3yAtVWbGuAf89

*६९)उज्ज्वला फटांगरे 
https://docs.google.com/forms/d/1VoHlZiyuNamIY5dKNCaqwcj6BDSKvg3eZO92idxQPcw/edit

*७०)निता मनवर*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfR63EpSkuz-RY-XWuxNhdQ9Y4BYMyzJdwJG2_Ljj--lJNuiQ/viewform

*७१)सुवर्णा पाटोळे*

https://docs.google.com/forms/d/13LkHmwE97yB1TGt657bl1I2PHhonwsW4ouUFM8AHlBg/edit


*७२) योगिता लोखंडे*
https://forms.gle/58e9FxpjZJeJpbj97


*७३) सुनिता जाधव*
https://forms.gle/PeyFrpujhGqYmuBM8


*७४)उज्ज्वला फटांगरे 
https://docs.google.com/forms/d/1chipFucz9PaZREc05e8qb68y4amFPs62HfSIxYUKjDs/edit


*७६)गायत्री शिंदे*
https://docs.google.com/forms/d/1Yo0VhuZ4T2hsgDPcy2C_gQHKV-V9Rv-ZwojDzqRwpzA/edit?chromeless=1


*७६)नेहा मांडवगडे*
https://forms.gle/B5nRquM41ZEWybob6


*७७) मिनाक्षी नागराळे, वाशिम*

https://forms.gle/rv5UVt9d1881ULXX8


*७८)उज्ज्वला फटांगरे 

https://docs.google.com/forms/d/1Q1xvslb4I7Ndui8Gtbap_yx95uM2S-Zm7sRoP4obgpg/edit

*७९)वंदना देवकर*

https://forms.gle/vjghd4uRkdLv3rb98

*८०)सरदार सर*

https://forms.gle/rMLsR6vP7Lad2QeQ8

*८१)मेघा जाधव*

https://forms.gle/esHdsoDdMnsf5fFP7

*८२)प्रिती रामढवे*

https://forms.gle/wGHx7Y6TedFJ2vrJ6

*८३)*हेमा यादव*   
https://forms.gle/qjiMGKtPCGbwHU7QA


*८४)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/ZaaCLsSRb1jPXT7w7


*८५) *श्रीमती सोनाली* *साळुंखे,जळगाव* 

https://forms.gle/U5scsYXgydpGWLLf7

*८६) उज्ज्वला फटांगरे 

https://docs.google.com/forms/d/14rgAtzgh1eUuih4AfSIv4kh1JvJgdCvLA2BP8QuyaOA/edit

*८७) मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*

https://forms.gle/QJdd8H411rj6Lp2w5


*८८)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/evdCZCi9JJWy5jBB7

*८९) *श्रीमती सोनाली* *साळुंखे,जळगाव* 
https://forms.gle/uxFL1QSLzdJZzJAS8

*९०)श्रीमती वंदना देवकर* हिंगोली  https://forms.gle/hr2enMU8i65SMm9s7

*९१) श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/x1Zb3M53Mqo5bN3QA

९२) *सौ.हेमा यादव*
https://forms.gle/RG5PUTmgXRwdxNPA6
९३) *सौ. हेमा यादव*

https://forms.gle/uiXjkMHpgStAuMP66

*९४) उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/z14vTVYi7dVBQ4Mz8

९५) *गायत्री शिंदे,जळगाव*
https://forms.gle/kUD3Ji8gQx572nXJ‌8

*९६)वंदना देवकर*
https://forms.gle/zGLmGYetCjWAST9h9

*९७)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/xDAxGkjZuGU3hPU69

*९८)*आम्रपाली गडदणे ,पुसद*
https://forms.gle/GFfBn2mdLaTgN6Fb9

*९९)*शैला अळसपुरे*

https://forms.gle/WSUMKZkRmnsGfMds8   
                          
*१००)जयश्री भड*                                                  https://forms.gle/pmNNvaKmG3oYTxLq9


*उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुह,*
*समुहप्रमुख-मिनाक्षी नागराळे*

Sunday, 3 May 2020

१मे महाराष्ट्रदिन ई विशेषांक-समीक्षण....कु.मिनाक्षी नागराळे(आदर्श शिक्षिका/कवयित्री)

 
*समिक्षण*
*१ मे महाराष्ट्रदिन ई विशेषांक चला घडवूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र समीक्षण*

      एक मे महाराष्ट्र दिन जसा महाराष्ट्राची कीर्ती सांगणारा, निर्मिती सांगणारा,व कामगार दिन म्हणून साजरा होणारा दिवस.. तसाच महाराष्ट्रातल्या तळागळातील ग्रामीण भागातील सर्व शिक्षिका भगिनींना एकत्र ठेवून त्यांचे शब्द,भाव, उपक्रम, गीत, लेख एका विशेषांकात प्रस्थापित करणारा हा विशेषांक आहे. हा ओन्ली सुपर ॲक्टिव शिक्षिका समूहाचा खास उपक्रम आहे... महाराष्ट्र दिन विशेषांक हा ई स्वरूपात 1 मे 1920 रोजी विशेषांक प्रकाशन सोहळा ओन्ली सुपर अॅक्टीव्ह समूहात आनंदात पार पडला...
     या विशेषांकाचे मुखपृष्ठ फार बोलके व नावाला साजेसे असेच आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी अहोरात्र झटणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनांशी, शत्रूंशी कशी टक्कर देऊन महाराष्ट्र वाचवला.. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र व कामगार दिनाच्या स्टॅच्यू घेतला आहे. त्यामध्ये चला घडवूया  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे ध्येय घेतले आहे. तर राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाचा लोगो ज्यात सावित्रीचा फोटो आहे. तो आणखीनच उठावदार दिसत आहे.
       *संपादक सुदाम दादा साळुंके सर आहेत.मुखपृष्ठ व सजावट उमेश साळुंखे यांनी केली आहे त्यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात आलेला हा विशेषांक शिक्षिका भगिनी साठी सुखाची पर्वणीच ठरली आहे*  तरीसुद्धा साळुंके दादा यांचे ब्रिद  *"ज्ञान-मान-सन्मान"*  या उक्तीप्रमाणे राज्यातल्या सर्व शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी ई साहित्याची निर्मिती केली. करुणाताई गावंडे, वैशाली भामरे,रेखा शिंदे यांनी सहकार्य केले. नाशिकच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली झनकर मॅडम यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं जग ठप्प असताना ओन्ली सुपर एक्टिव शिक्षिका समूहाचा मराठी मातीला मानवंदना देण्यासाठी हा अनोखा उपक्रम सर्वांना दिशादर्शक असाच आहे.
        मा.पोपटराव काळे,शिवाजी नाईकवाडे, साहेबराव शिंदे,दिलीप ढेपले साहेब यांच्या शुभेच्छा लाभले आहेत. यात 24 लेख व 23 कविता प्रकाशित आहेत. श्रीमती उषा ढेरे यांची महाराष्ट्र भूमी हा पोवाडा मराठी मातीला साज चढवणारा आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या भूमिकेत पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे? हे प्रतिभा राऊत यांच्या लेखातून महत्त्व कळते. तर जया कुलथे यांची आई वरची रचना मातेचा गोडवा भरते. गुंफा कोकाटे यांचा टाळेबंदी  हा लेख माणसातला माणूस जागे करतो. वासंती कोंडाळे यांची महाराष्ट्राची महानता ही कविता काळजाला स्पर्शून जाते. तर  *मीनाक्षी नागराळे* (अर्थात माझी) ही कविता विज्ञानाची सांगड घालणारी व कवितेचे गुढ उकलते.अंजू जोशी यांचा लेख आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात कम्प्युटरचे महत्त्व विशद करतो धनश्री गांगुर्डे यांचा सावित्रीबाई फुले लेख विज्ञानाची महती सांगतो.
         मीनाक्षी काटकर यांची महाराष्ट्र गीत ही कविता थोर वीरांची महती सांगते *शेख नजमा यांची मंगेश शिष्यवृत्ती*  हा लेख वडिलांचे छत्र हरवलेल्या मंगेश ची यशोगाथा काळजाला स्पर्श करणारी आहे तर सुनीता इंगळे यांची पुस्तक कविता पुस्तकाचे महत्त्व विशद करून जाते. मानवी मनामध्ये विचारांचा कहर कसा चालतो? ही कल्पना झाल्टे यांची कविता सांगून जाते. मनीषा कुलकर्णी यांचा लेख समूहाचे महत्व विशद करणारा आहे.तर रांगोळ्या, स्केच, चित्र,शुभेच्छा यांनी आणखीन साज चढला आहे.उर्मिला लासूरकर वर्षा भोळे यांच्या महाराष्ट्राची यशो गाथा सांगणाऱ्या कविता आणखीन भर टाकतात. शोभा दळवी व मंगला अनासपुरे यांच्या शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज कशी ठरते हे सांगतो आहे.छाया कांबळे, सुनिता वावधाने यांनी महाराष्ट्राची महती काव्यातून सांगितली आहे.ओंकारेश्वरी खडसे ह्या चिमुकल्या विद्यार्थिनीने "ओ "ची गंमत आपल्या काव्यातून सांगितली आहे. मनीषा शेजोळे यांनी काव्यातून महाराष्ट्राचे गुणगान गायले आहे.तर रेखा शिंदे यांचा लेख गुरुजींचे महती सांगतो.
        श्री अनुज ढुमणे यांनी लेखातून त्यांचे उपक्रमशील शाळेचे दर्शन घडवले आहे.कविता पुदाले यांनी व मंगला बोपचे यांनी महाराष्ट्राची महती काव्यातून रचली आहे. *मधुकर माळी व सुदाम साळुंखे सर निर्मित शाळा अॅप ची माहिती व डाऊनलोड क्यू आर कोड सहित विद्यार्थी व शिक्षकांसाठी देण्यात आलेला आहे.* वैशाली भामरे यांचा लेख कोरोना जनजागृती करतो आहे. नीलिमा चिंचकर यांचा वेबसाईट पर्यंतचा प्रवास लेखाद्वारे मांडला आहे. स्मिता नवघरे व छाया कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्र गौरव गाथा काव्यातून व्यक्त केली आहे. सुनिता इंगळे यांनी स्टडी फ्रॉम होम चे महत्व विशद केले आहे. योगिता कोठेकर व कल्पना झाल्टे यांनी सावित्रीचे महत्त्व विशद केले आहे. प्रतिभा साळुंके यांनी महाराष्ट्राची प्रश्नमंजुषा तयार केली आहे. हे खेमनकर -कोरडकर यांनी मूल्य शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. *करुणा गावंडे यांचे उपक्रम गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी पडणारे आहेत.*  शितल मापारी, चित्ररेखा जाधव,अरुण पवार, वंदना कोषटवार यांनी पालकांना मुलांना खेळू द्या असे आवाहन केले आहे. तर सुरेखा ढोले यांचे बडबड-गीताने साद घातली आहे. स्मिता नवघरे यांनी क्रांती सूर्याला वंदन काव्यातून केले आहे.  *संपादक श्री सुदाम साळुंखे यांच्या आठवणीतील शाळा प्रवास सुंदरपणे शब्दबद्ध केला आहे.*
      शेवटी डिजिटल गॅलरी मध्ये वेगवेगळे ॲप्स बालभारती पुस्तके व राज्यातल्या आदर्श तंत्रस्नेही शिक्षक शिक्षकांचे ब्लॉग व त्यांचे Qr code च्या स्वरूपात दिली आहे. कोणत्याही Qr code ला टच केले की त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा एका सेकंदात पाहायला मिळतो. असे मलपृष्ठ अति महत्त्वाचे आहे.तसेच शेवटचे पान खूप महत्त्वाचे व जपून ठेवून उपयोगी पडणारी असेच आहे. एकूण 66 पानांचे हे महाराष्ट्र दिन विशेषांक प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने राज्यातल्या इतर शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाचे एक पानच व तंत्रस्नेही ची जणू खाणच म्हणावी लागेल. या पहिल्या ऑनलाईन ई विशेषांकासाठी खूप खूप शुभेच्छा.....



*समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
*जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव*
*ता.जि.वाशिम...*
*मो.९७६७६६३२५७*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~