Date: 1 Dec 2019
*स्पर्धेसाठी*
*विषय- चालू राजकीय घडामोडी*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*राजकारणाचे डावपेच, साऱ्यांनी आता ओळखले*
*दोन महिने चालले, राजकारणाची डाळ शिजवले...!!*
*पुन्हा येईन.... पुन्हा येईन म्हणतच डौलाने आले*
*विश्वासाचा पत्ता अजितदादा एकदम गुल झाले.....!!*
*राष्ट्रपती राजवट होती, झाली राज्यात लागू*
*मंत्रिपदासाठी भुकेजलेले खुर्ची लागले मागू......!!*
*एके दिवशी सकाळीच, झाला एक गौप्यस्फोट*
*दोघांच्या भांडणात मग, तिसऱ्याचाच झाला स्फोट....!!*
*जनता बिचारी पहाटे पहाटे खळबळून सारी उठली*
*जो तो टिव्ही समोर, मोाईलवरही पाही बातमी कुठली...!!*
*त्या दिवशीचा पेपर सुध्दा झाला त्या दिवशीच जुना*
*साऱ्या मंत्र्यांनी लोकशाहीला लावला ना चुना......!!*
*एकमेकांचे दुश्मन, गळ्यात गळे टाकू लागले*
*खोटे खोटे हसु शपथ घेताना मग वाकू लागले....!!*
*जनता सारी बिचारी गेली हो पार गोंधळून*
*खोटे गुन्हे बाजुला करत, अजित दादा आले वळून....!!*
*कसला तो गनिमी कावा, कसा कळेल जनतेला*
*उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन जागले ममतेला....!!*
*शेवटी एक निर्णय झाला, रडक्यांचे ही डोळे पुसले*
*स्वार्थासाठी जगणारे नेते, लोकही मग मनात हसले....!!*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*©®कवयित्री- मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✒✒✒✒✒✒✒✒✒