Thursday, 29 July 2021

ओ चे शब्द

 ओ चे शब्द




सेतू अभ्यासक्रम 45 दिवस

 सेतू अभ्यासक्रम 45 दिवस 

इयत्ता दुसरी




सेतू अभ्यासक्रम 45 दिवस 

इयत्ता 3 री





सेतू अभ्यासक्रम 45 दिवस 

इयत्ता 4 थी










Wednesday, 28 July 2021

meenakshinagraleblogspot.com: ऐ चे शब्द

meenakshinagraleblogspot.com: ऐ चे शब्द:  ऐ चे शब्द

ऐ चे शब्द

 ऐ चे शब्द




सुखदुःखाच्या वाटा म्हणजे बाभळीचा काटा

 *सुखदुःखाच्या वाटा म्हणजे - बाभळीचा काटा*

       प्रत्येक मनुष्य सुखासाठी झटत असतो आणि सुख शोधत असतो.सुखाच्या एका क्षणाची आतुरतेने वाट पाहात असतो. खरंतर सुखाचा मार्ग खूप खडतर असतो त्यातून ही स्वतःच्या जिद्दीने, प्रयत्नाने, दुःखाचे काटे तुडवित, अपयशाचे अडथळे खात शेवटी सुखा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी, गझलकार,गायक, शिक्षक असणारे विजय वडवेराव यांचा काव्यसंग्रह "बाभळीचा काटा" नुकताच वाचनात आला. अतिशय देखणे मुखपृष्ठ माय चुलीवर भाकरी थापत आहे. समोर लहान मुल अंगात फक्त चड्डी घालून माय समोर बसले आहे. त्याची गरीबी जणूकांही मुलाच्या अंगाला बाभळीच्या काट्यांप्रमाणे टोचत आहे. असे सुंदर मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून परीस पब्लिकेशन यांनी याची प्रथमावृत्ती १० ऑक्टोबर २०१९ रोजी प्रकाशित केली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १५० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता जीवनाशी समरस होत काळजाला भिडणा-या,अडथळे ओलांडून यशाकडे नेणा-या आहेत. या काव्यसंग्रहाची पाठराखण लोककवी प्रशांत मोरे यांनी केली आहे.
          स्वतःच्या जीवनावर अत्यंत प्रेम करणारा, गरिबीचे चटके अतिशय जवळून सोसणारा, सुखदुःखाच्या वाटा तुटवित यशाचा मार्ग शोधणारा,झोपडपट्टीत राहून सुद्धा आकी व आबा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतून तळमळून अभ्यास करून शिक्षकी पेशात पदार्पण करणारा, हाडाचा पण संवेदनशील मन असणारा कवी विजय वडवेराव यांचा हा दुसरा कवितासंग्रह आहे. यापूर्वी त्यांचा "वेशीवरचा दगड" हा काव्यसंग्रह महाराष्ट्रात बऱ्यापैकी नावारूपाला आला आहे. "बाभळीचा काटा" हा कविता संग्रह म्हणजे वेदनादायी अनुभूतीचे भकास माळरान त्यातच एक नाजूक  रंगीबेरंगी फुलबाग सुद्धा आहे.
    
              तू गं गुलाबाच फूल 
              मी गं बाभळीचा काटा 
               माझं जगणं फाटकं
               तुझ्या मखमली वाटा...

                तुझं पिढ्या न पिढ्याचं
                बागायती गं शिवार
                माझ्या गावकुसापोटी
                सदा भुकेचं निखारं

             वरील ओळीतून कवी प्रियेसीला आपल्या परिस्थितीची जाणीव करून देत आहे. गुलाबाचं फुल सर्वांनाच आवडतं पण त्याचे काटे कोणालाच आवडत नाहीत त्यामुळे कवी आपल्या काव्यातून प्रियेसीला म्हणतो तू गुलाबाचे फुल आहेस तर मी बाभळीचा काटा आहे. माझं जगणं फाटकं आहे. माझी परिस्थिती नाजूक आहे. तुझ्या जीवनाची मखमली वाट आहे. तू पिढ्यानपिढ्या गर्भश्रीमंत आहेस. तुझ्या शेतात बागायती शिवार आहे. तर माझं घर गावकुसाबाहेर आहे.त्यात भुकेचे निखारे आहेत. आणि तेच माझं वास्तव आहे. मनापासून प्रेम करणार्‍या वेड्या मनाच्या कवीला गरीब श्रीमंतीची दरी दिसते. आणि हळव्या मनाचा कवी आपल्या शब्दात मांडताना दिसतो आहे.

                कानी तव्याच्या गाताना 
                माय भाकरीच गाणं 
                 साऱ्या घराच्या भुकेचं 
                 झुले चुलीला तोरण

                 जीव लावाया पिठाला 
                 तिनं सारता काकण 
                  उभ्या आभाळात घुमे
                  तीच भाकरी थापणं....!!

           ग्रामीण भागातली माय चुलीवर जेव्हा भाकरी थापते तेंव्हा तिच्या हातातील काकणाचा आवाज भाकरीच गाणं गातो.साऱ्या घराच्या भुकेचं तिच्या चुलीला तोरण जणू लावला आहे.भाकरी करताना माय पीठ मळताना तिने पिठाला किती जीव लावलेला आहे. तिच्या हातातल्या काकणाला मागे सारत आवाज आणि तीच भाकरी थापणं आभाळात घुमत आहे. एका एका भाकरीसाठी माय किती हाताला चटके  जणू तिच्या हातावर गोंदन केल्याप्रमाणे तरीही अख्ख्या जगाची भूक भागविण्यासाठी माय भाकरी थापत राहते अशी माईचं व भाकरीचं गाणं व ऋण व्यक्त करणारी कविता वाचकाच्या अंतर्मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. संवेदनशील मनाचा कवी विजय वडवेराव यांची प्रत्येक कविता सुखदुःखाची सरमिसळ आहे. त्यात आनंद, दुःख, वेदना विरह,त्याग इत्यादी स्पष्ट दिसतो.

         बाप माझा हाय विठू 
          माई रखुमाई खरी 
          पांडुरंगा सांग मग 
          मी का पहावी पंढरी? 

           कसा राबतोय माझा 
           बघ बाप हा शिवारी 
           टपटप घाम वाजे 
           जसा मृदूंग गाभारी....!!

           आई वडिलांवर अतोनात प्रेम करणारा कवी विजय वडवेराव स्वतः च्या बापाला विठ्ठलाच्या रूपात पाहतो. माझा बाप विठू आहे. आणि माझी आईच रखुमाई आहे. माझ्या घरीच विठ्ठल रुख्माई असताना मी पंढरीला का जावं? असा खडा सवालही त्यांनी वरील ओळीतून व्यक्त केला आहे. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून देवाने घरातच देवासमान आई-वडील प्रत्येकाला दिले आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देवाची खोटी भक्ती करणाऱ्या ढोंगीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन कवी विजयरावांनी कवितेच्या माध्यमातून घातले आहे. माझा बाप शेतात कसा राबराब राबतो. कष्ट करतोय. माझ्या बापाच्या घामाचा टपटप आवाज विठ्ठलाच्या गाभाऱ्यात मृदंग वाजल्याप्रमाणे वाजतो आहे. साऱ्या जगाचा देव जरी पंढरपूरचा पंढरी असेल पण माझा देव माझ्या घरी आहे. माझा बाप स्वतः उपाशी राहून जगाला भाकरी देतो. अशा शब्दांत आपल्या अंतर्मनातील भावना कवीने व्यक्त केल्या आहेत.

          वेदनेच्या चिखलात 
          मूळ धरते कविता 
          ज्याचं काळीज जिवंत 
          त्याला कळते कविता....!!

         वरील ओळीतून कविता म्हणजे काय असते? कविता म्हणजे फक्त अक्षरे किंवा शब्दच नाहीत तर जेंव्हा मनुष्याला खूप दुःख होते, वेदना होते, तेव्हा कवितेचा आपोआप जन्म होतो. त्याच्या हृदयात कविता जन्माला येते. आणि त्याचं काळीज जिवंत आहे. त्यालाच ती कविता कळते. संवेदनशील मनाचा व्यक्तीलाच कवीच्या भावना सहज कळतात. जेंव्हा आपले नातेवाईक, सगेसोयरे सर्वांनी साथ सोडतात तेंव्हा कवीच्या सोबत कविता सुद्धा वनवास भोगले सारखी जगते. जर एखादा कवी एकटा पडला असेल तर त्या कवीला जीव कविता लावते. आणि त्याच्या अंगाखांद्यावर छान कविता खेळते. असे इतकं कवितेचे अनन्यसाधारण महत्त्व कवीच्या जीवनात आहे.
         निसर्ग सौंदर्य, सौंदर्यदृष्टी, साद घालणारा हळवं मन, सखी, प्रियेसी, आई-वडील, सुख-दुःख, गंधाळली रात, कवीनं भोगलेला वनवास, पाऊस, पौर्णिमेचा चंद्र, चांदण्या, बापाचा विरह, शेतकऱ्यांचे दुःख, कष्ट, बळीराजाचचे दुःख हे सार कवी विजय वडवेराव यांनी आपल्या काव्यातून मुक्तपणे तर काही गेय प्रकारात हळुवारपणे व्यक्त केले आहे. त्यामुळे विजय रावांची प्रत्येक कविता काळजाचा ठाव घेत पुढे जाते. गरिबीचे चटके भोगणारा कवी विजय वडवेराव यांनी अपार मेहनत, जिद्द, कष्ट, शिकण्याची हौस, गरिबी, दुःख हे सारे सोबतीचे प्रवासी घेऊन शिक्षक, गायक, कवी, लेखक ते गझलकार पर्यंतचा सारा प्रवास सुखदुःखाच्या वाटा तुडवित उदयाला आला आहे. "बाभळीचा काटा" प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच हा कवितासंग्रह आहे. कवी विजय वडवेराव यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समीक्षिका /लेखिका/शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता.जि. वाशिम
मो.9767663257

ऐ चे शब्द

https://drive.google.com/file/d/1anWNMzKxqci8l4GGKxNxP3FRDVZsrl22/view?usp=drivesdk

Tuesday, 27 July 2021

http://generated.picgifs.com/generated/textgen/202107/picgifs-34-98e719ef43079e36829d3adcb698044c8099f040.gif

  1.  http://generated.picgifs.com/generated/textgen/202107/picgifs-34-98e719ef43079e36829d3adcb698044c8099f040.gif

 <h1><font color="#00FF00" size="+2"><marquee bgcolor="#000000"   scrollamount="3">मिनाक्षी पांडुरंग नागराळे</marquee></font></h1>

Saturday, 24 July 2021

सेतू चाचणी (पहिली चाचणी)

 https://drive.google.com/file/d/1_eoV2T7HwJwgp5kOy-hoZ5pOOBQoq27d/view?usp=drivesdk

इ पासून सुरू होणारे शब्द

 https://drive.google.com/file/d/1ZvzR4iOpCkNVbLgTn7W3EP-YqRjrn0pd/view?usp=drivesdk

आ चे शब्द

 https://drive.google.com/file/d/1_csXSfHrQwu3ep_j_5XRpH_IThTZ7k3x/view?usp=drivesdk

ई चे शब्द

 https://drive.google.com/file/d/1ZlQkwWrK_PyDQCg3tW4B4sK3Mo2myhzI/view?usp=drivesdk

Friday, 23 July 2021

इ चे शब्द

 https://drive.google.com/file/d/1ZvzR4iOpCkNVbLgTn7W3EP-YqRjrn0pd/view?usp=drivesdk

meenakshinagraleblogspot.com: इयत्ता पहिली साठी अंक ओळख... सर्व व्हिडिओ

meenakshinagraleblogspot.com: इयत्ता पहिली साठी अंक ओळख... सर्व व्हिडिओ:  https://youtu.be/H6kK5sWtbtg 🎯 *इयत्ता पहिलीसाठी चित्ररूप न्यू अॅनिमेशन व इफेक्ट्ससह शैक्षणिक विडीओ मालिका* असे अनेक शैक्षणिक विडीओ पाहण्य...

अर्थपूर्ण वाक्य तयार करा

 https://drive.google.com/file/d/1ZZLXXxsDq0vpowLgYxGv-s1R0p3-PHxy/view?usp=drivesdk

ऊ चे शब्द

 https://drive.google.com/file/d/1ZXyVSXgI3K2jnb8jXj32e9WPGoj4Ce6N/view?usp=drivesdk

आ पासून सुरू होणारे शब्द

Wednesday, 14 July 2021

बोलक्या जगातील सामाजिक जाणिवा मांडणारा काव्यसंग्रह म्हणजे शब्दफुलांची शिदोरी

*बोलक्या जगातील सामाजिक वेदना मांडणारा काव्यसंग्रह म्हणजे-शब्दफुलांची शिदोरी* माणसांच्या जगात माणूस शोधणारा कवी संतोषकुमार उईके, चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या निलसनी पेडगावचे रहिवाशी असून गरिबीने पीचलेल्या कुटुंबात जन्माला आल्यामुळे लहानपणापासूनच आई-वडिलांचे काबाडकष्ट बालवयात बघणारे, शेतमजुरी, मोलमजुरी करणे, विटा बनविणे, तेंदूपत्ता तोडणे ही सगळी कष्टाची कामे करत शिक्षणाची जिद्द अंगी धरून यशाच्या मार्गाने जाताना गरिबीचे चटके सहन करत खूप सार्‍या वेदना समस्या हाल-अपेष्टा पिळवणूक दडपशाही अशा संकटाचा सामना करत शिक्षकी पेशात पदार्पण करून बोलक्या जगातील सामाजिक वेदना मांडणारा काव्यसंग्रह शब्द "फुलांची शिदोरी" सामाजिक जाणिवा वर प्रकाश टाकणारा काव्यसंग्रह जन्मास घातला आहे. "शब्दफुलांची शिदोरी" या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे असून प्रकाशक राजेश बहाळे शब्दजा प्रकाशन, अमरावती यांनी प्रकाशित केले असून याची प्रथम आवृत्ती एप्रिल 2019 ला प्रकाशित झाली आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मडावी सर यांनी दिली असून पाठराखण ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची लाभली आहे. यातल्या सर्वच कविता दर्जेदार असून लाखमोलाच्या आहेत. सामाजिक वास्तव मांडणा-या आहेत. अनेक कविता या वृत्तपत्रे,साप्ताहिके, मासिके इत्यादी मधून प्रकाशित झालेल्या व जनसामान्यांच्या दाद मिळालेल्या आहेत. कवी संतोषकुमार उईके यांच्या कविता झाडीबोली साहित्य झाडीपट्टीतील माणसांची जगणं मराठीचा पदर संगतीला घेऊन ताठ मानेने विद्रोह करीत जगासमोर यायला घाबरत नाहीत. आदिवासी कविता क्रांती घेऊन फुलणारी, वास्तव जगासमोर सांगणारी, जंगलातल्या व्यथा मांडणा-या सामाजिक आणि मानवतेचे गुणगाण गाणारी आहे. कवी संतोषकुमार उईके हे हाडाचे शिक्षक तर आहेतच पण त्याचबरोबर समाजाच्या अनेक अंगाचा विचार करत "शब्दफुलांची शिदोरी" हा काव्यसंग्रह जन्मास घालणारे, सामाजिक समस्येची जाणीव असणारे, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे, निसर्गाच्या प्रेमात पडणारे, माणसांचा रंगढंग ओळखणारे, माणसांच्या जगात माणूस शोधणारे, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पोसणारे, शब्दांचे शस्त्र घेऊन विद्रोह करणारे,अन्यायाचा प्रतिकार करणारे, सामाजिक भान असणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे कवी संतोष कुमार उईके आहेत. समाज उध्दारा | काव्याचीच साथ | सज्ज राहो हात | लढण्यास || वरील अभंगाच्या ओळीतून कवी संतोषकुमार उईके म्हणतात की शब्दांच्या माध्यमातून समाजाचा उद्धार करू शकतो. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज इत्यादी थोर संतांनी आपल्या शब्दांच्या जोरावर समाजाचा उद्धार केला आहे. भरकटत चाललेल्या लोकांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी शब्दांचे शस्त्र वापरून वार केला आहे. त्याप्रमाणेच कवी संतोषकुमार सुद्धा काव्याच्या माध्यमातून समाजाचा उद्धार करण्यास निघाले आहेत. त्यासाठी कवीचे हात लढण्यासाठी सदैव सज्ज आहेत. त्यासाठी शब्दांची शिदोरी त्यांच्यासोबत आहे. बोटांमधील अंगठ्यांनी काळ बदलवता येते का? खरंच ते घातल्याने संकट आपले टळते का ? हातावरच्या रेषा का भविष्य घडवले असते तर गरिबांचे हात कोरडेच राहिले असते....!! वरील ओळीतून संतोषकुमार उईके यांनी अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली आहे. आजच्या विज्ञानवादी युगामध्ये बरेच लोक बोटात वेगवेगळ्या ग्रहांच्या अंगठ्या, पायात हातात काळा दोरा बांधलेले दिसतात.खरंच अशा अंगठ्या, गंडेदोरे घातल्याने काळ बदलतो का ? खरंच असे गंडेदोरे बांधल्याने अंगठ्या घातल्याने माणसावरचे संकट टळते का? हातावरच्या रेषांनी जर माणसांचे भविष्य घडवले असते तर गोरगरिबांच्या हातावरच्या रेषा कोरड्याच राहिल्या असत्या का ? गोरगरिबांना कशाला इतके कष्ट आणि श्रम करावे लागले असते असा खडा सवाल हातावरच्या रेषा दाखवून भविष्य पाहणाऱ्या भोंदू बाबांच्या नादी लागून अंगठ्या घालणाऱ्या लोकांना कवी संतोष कुमार उईके यांनी केला आहे. जगी नाही जादू | नाही भूतबाधा तरी लोक गधा | बनतात || भूतपिशाच्च हे | मानवाचे खूळ मेंदूवर धूळ | बसलेली || या जगात जादू नाही. भोंदूबाबांनी आपले स्वतःचे पोट भरण्यासाठी खोटा चमत्कार करून जगाला भुलवतात भूतबाधा जादूटोणा करणे वगैरे काही नसतं तरी लोकं गाढवासारखे का वागतात ? हे भूत पिशाच्चे भोंदूबाबाने माणसाच्या डोक्यात घातलेलं खूळ आहे. कारण माणसाच्या मेंदूवर धूळ बसलेली आहे. माणूस खोट्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला लागला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कवी संतोषकुमार उईके यांच्या विचारावर नरेंद्र दाभोळकर,पानसरे,कलबुर्गी यांच्या विचारांचा प्रभाव वरील अभंगाच्या ओळी ओळीतून दिसून येतो. कवडीमोलाने धान्य,व्यापाराला विकले मी कर्ज फेडता फेडता, पूर्ण आहे थकलो मी....!! तरी कर्ज काही केल्या, नाव संपाचे घेईना पाटलाच्या कर्जातून, काही सुटका होई.....!! शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतात राब राब राबून, सावकाराचे कर्ज काढून शेतात बियाणे पेरतो. त्यात वेळेवर पाऊस येत नाही. कसेबसे आलेच धान्य तर व्यापारी कवडी मोलाने विकत घेतो. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी बनतो. कर्जावर कर्ज काढतो आणि फेडता फेडता थकून जातो. कर्ज संपता संपत नाही. पाटलाच्या कर्जातून सुटका होत नाही. त्यामुळे एक दिवस शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतो आणि स्वतःची जीवन यात्रा संपवितो. संवेदनशील मनाचे कवी संतोषकुमार उईके यांनी वरील ओळीतून शेतकऱ्याचं जगणं-मरणं व्यक्त केले आहे. संवेदनशील मनाचा कवी संतोष कुमार उईके यांनी समाजातील वास्तव आपल्या कवितेतून मांडले आहे. आज हुंडाबळी कायदा होऊनही आजही हुंड्यासाठी मुलींना त्रास दिला जातो. कितीतरी मुली जाचाला कंटाळून आत्महत्या करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. प्रत्येक मुलीच्या बापाने मी हुंडा देणार नाही. हुंडा घेणार नाही अशी भूमिका ठामपणे बजावली पाहिजे. विवाहितेचा छळ या काव्यातून हुंडाविरोधी शब्दरूपी तक्रार कविने केली आहे. प्रत्येक पालक जागृत व्हावा यासाठी संवेदनशील व योग्य विषयाला कवींनी हात घातला आहे. कवी संतोषकुमार उईके यांच्या सर्वच कविता या वास्तववादी व निरपेक्ष आहेत. विज्ञानवादी दृष्टिकोन मांडणाऱ्या आहेत. अंधश्रद्धेला मूठमाती देणा-या आहेत. सामाजिक समस्यांची पोल खोलणा-या आहेत. भ्रष्टाचार विरोधात लढणा-या आहेत. अनाथाबद्दल कळवळा असणाऱ्या बळीराजाची व्यथा मांडणाऱ्या आहेत. गरिबीची जाण सांगणाऱ्या, स्त्री-पुरुष समानता दर्शविणाऱ्या आणि स्वच्छतेची कास धरणाऱ्या, संताचा महिमा सांगणाऱ्या व माय मराठीची गोडी असणाऱ्या, झाडीपट्टीला न्याय देणाऱ्या व आदिमानवाला आत्मभान जागे करायला लावणाऱ्या, पोलिसांचे कर्तव्य सांगून, बहिणीवर अपार माया करणाऱ्या, बहिणीची महती सांगणाऱ्या, माय-मातीची ओढ लावणा-या या सर्वच कविता थेट काळजाला भिडणा-या आहेत. सर्वांनी आपल्या संग्रही ठेवावा असाच हा "शब्दफुलांची शिदोरी" हा काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहात एकूण 83 कविता माणसातला माणूस शोधायला लावणा-या आहेत. कवी संतोषकुमार उईके यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका /कवयित्री मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे जि.प. प्राथ.शाळा कोकलगाव ता. जि. वाशिम मो.9767663257

माझे पुरस्कार....