Friday, 31 December 2021

जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन




 

Tuesday, 28 December 2021

वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन

 *वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन*

      महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे सादरीकरण दिनांक 21 डिसेंबर रोजी रिसोड रोड, लाखाळा वाशिम. येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान डॉ.ज्ञानेश्वर नागरे (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम) मार्गदर्शक डॉ.सुलक्षणा पवार मॅडम (अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक नवोपक्रम), परिक्षक श्री शिवशंकर मोरे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री जगदीश करडे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री रोकडे सर (प्राचार्य शिवाजी अध्यापक विद्यालय वाशीम) यांनी जिल्ह्यातील नवोपक्रम स्पर्धेतील पात्र शिक्षकांच्या सादरीकरणाच्या परीक्षणाचे काम पाहिले. 
          सन 2021- 22 या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे याकरिता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यातील  नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्याकडून राज्यातून उपक्रमशील शिक्षकांकडून नवोपक्रम शासन स्तरावर मागवले जातात. नवनवीन उपक्रम व शिक्षकांची कल्पकता या नाविन्यपूर्ण उपक्रमातून दिसून येते. अशा उपक्रमांची यादी राज्यस्तरावरून (SCERT)पुणे यांच्याकडून डाएट कडे येते. यात प्रथम फेरीत निकषानुसार स्पर्धेचे आयोजन वाशिम येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातून प्राथमिक गटांमध्ये एकूण 13 व माध्यमिक स्तर एक असे 14 नवोपक्रम सादर झाले होते. पहिल्या फेरीची निवड होऊन प्राथमिक गटातून सात शिक्षक व माध्यमिक गटातून एका शिक्षकाची निवड झाली. यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये एकूण आठ शिक्षकांच्या नवोक्रमाचे पीपीटी द्वारे सादरीकरण झाले. त्यामध्ये पाच मुद्यांना धरून सात मिनिटांमध्ये सादरीकरण करावयाचे होते. परीक्षकांनी गुणांकन करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
               प्राथमिक गटातून श्री.रंजीत जाधव, मानोरा यांनी प्रथम मानांकन प्राप्त केले तर वाशिम पंचायत समिती मधील आरती गंगावणे यांनी दुसरा आणि मीनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कारंजा येथील कु. नीता तोडकर व मुरलीधर जाधव कारंजा यांना उत्तेजनार्थ मानांकन मिळाले. माध्यमिक गटातून संजय धांडे, रिसोड यांनी प्रथम मानांकन मिळवले.  प्रज्ञा देवळीकर कारंजा व संध्या पिंजरकर, मंगरूळपीर यांनी सहभाग घेतला. सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि जिंकलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
          जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव केंद्र तोंडगाव पंचायत समिती वाशिम येथे कार्यरत असलेल्या मिनाक्षी नागराळे या त्यांच्या शाळेत अनेक उपक्रम राबवत असतात.याही वर्षी त्यांनी गणित विषयावर आधारित नवोपक्रम SCERT pune यांच्याकडे सादर केला होता.या उपक्रमाचे सादरीकरण २१डिसेंबर रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे आयोजित करण्यात आले होते.त्यात मिनाक्षी नागराळे वाशिम यांच्या उपक्रमास तृतीय मानांकन मिळाले.स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.गट शिक्षणाधिकारी मा.राजेंद्र शिंदे साहेब व केंद्रप्रमुख विलास गोटे सर,शाळेचे मुख्याध्यापक रामकिसन वाकुडकर सर व केंद्रातील तसेच वाशिम पंचायत समिती मधील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश सुर्वे (जिल्हा समुपदेशक डायट वाशिम) यांनी केले तर तंत्रज्ञान टेक्निकल श्री विश्वंभर आळणे (विषय सहाय्यक डायट ) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विलास कडाळे (अधिव्याख्याता )स्वाती ढोबळे (डायट, वाशिम)श्रीमती संजीवनी दारोकार (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) श्रीमती स्मिता इंगळे (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) आदींनी अथक परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन श्री.विश्वंभर आळणे सरांनी मानले. सर्व विजयी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Friday, 3 December 2021

बापलेकीच्या वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वात्सल्यसूक्त*

*बाप-लेकीच्या वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वात्सल्यसूक्त*

         आपण आजपर्यंत आई मुलींच्या नात्यावर अनेक कविता वाचल्या. मायलेकींचे ही भरपूर साहित्य प्रकाशित झाले पण बाप लेकीच्या कविता प्रथमच माझ्या वाचनात आल्या. दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्रात दररोज बाप लेकीच्या कविता प्रकाशित व्हायच्या आणि मी त्या दररोज आवर्जून वाचायचे. प्रत्येक कविता काळजाला स्पर्शून जायची आणि लेकीविषयीचे प्रेम उत्कट व्हायचं.साहित्याचे गाढे अभ्यासक कवी, लेखक प्रकाश जडे सर यांच्या बापलेकीवरच्या कविता खरच बाप-लेकीचे नाते किती अतूट असते हे सांगून जातात. लेकीने बापाच्या गळ्याला मारलेली मिठी तीच लेक सासरी जाताना बापाच्या जीवाची होणारी घालमेल कळते. हे सारे प्रकाश जडे यांच्या कवितेत आविर्भूत आहे. प्रत्येक कविता वाचताना अंतकरण भरून येते आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन जातात.
        सोलापूर जिल्ह्याचे कवी प्रकाश जडे यांचा वात्सल्यसूक्त  या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिगंबर दगडू भगरे यांनी जानेवारी २०२१ मध्ये प्रथमावृत्ती प्रकाशित केली असून मुखपृष्ठावर बापलेकीचा हात धरून चाललेले  पाठमोरी असलेले बोलके चित्र काव्यसंग्रह वाचण्याची उत्कंठा वाढवते.मलपृष्ठावर महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगरच्या डॉक्टर श्रुतीश्री वडगबाळकर यांनी पाठराखण केली आहे. पहिल्या पानावर लेकीने बापाला मारलेली घट्ट मिठी चित्र प्रणोती पोद्दार यांनी रेखाटलेली मनाला अधिक भावून जाते. या पुस्तकाचे मुल्य केवळ 120 रुपये असून यातली प्रत्येक कविता काळजाला भिडणारी आहे.
      साहित्याचे गाढे अभ्यासक व स्वाभिमानी छावा या दैनिक वृत्तपत्राचे सहसंपादक, संवेदनशील मनाचा कवी प्रकाश जडे यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.हाडाचा शिक्षक असल्यामुळे त्यांना अनेक साहित्यिक व शैक्षणिक आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्री प्रकाश जडे सर खरं तर विज्ञानाचे विद्यार्थी असून ते साहित्याचे वारकरी पण आहेत.ते आपल्या कवितेतून अधिक उत्कटपणे व्यक्त होतात.वात्सल्यसूक्त या काव्यसंग्रहात एकूण 52 कविता एकाच विषयावर आहेत. बाप लेकीच्या नात्याला शब्द फुलांनी फुलवीत नात्यांची घट्ट वीण एकेका ओळींमधून गुंफीत जाणारा कवी म्हणजे प्रकाश जडे सर होय.
        लेकी विना 
       का घर असते?
       निरर्थक होते 
       जिणे बापाचे...!!

       अगदी कमी शब्दात भावपूर्ण, अर्थ गर्भित, सखोल अर्थ दडलेल्या वरील ओळीतून बापाचा लेकीसाठी तुटणारा जीव, लेकीवरचे अतोनात प्रेम, उत्कट प्रेमभावना, वात्सल्याचा निर्मळ झरा, शब्दांशब्दांतून पाझरतो आहे. संवेदनशील मनाचा कवी प्रकाश जडे सर लेकीविना घर घर राहात नाही. ज्या घरात लेक नाही त्या बापाचे जगणे निरर्थक होते. त्या बापाच्या जीवनाला काही अर्थच नाही लेक वंशाची पणती असते. माहेर आणि सासर अशा दोन्ही घरात प्रकाश देणारी लेक बापाचा जीव की प्राण असते. लेक बापाच्या आयुष्याची कविताच असते असे कवी वरील ओळीतून व्यक्त होतात.

              लेक म्हणजे
               उंबराचं फूल
               नुसतीच
               भूल ....!

                लेक माझी
                लाखात एक 
                काळजात मेख 
                सोनियाची...!!

                आईची
                 येता सय
                 लेक होते 
                 माझी माय....!!

       वरील ओळीतून लेक म्हणजे उंबराचं फूल नुसतीच भूल अशी मनाला भुरळ पाडणाऱ्या ओळी बापावरुन जीव ओवाळून टाकणाऱ्या लेकीची महती कवी विशद करण्याचा प्रयत्न करतो. लाखात एक जणू सोन्याची मेख अशा सुवर्णमयी शब्दांमध्ये लेकींच्या नात्याला गुंफणारा कवी प्रकाश जडे यांचे लेकीवरचे अतोनात प्रेम दिसून येते. आईची आठवण येता क्षणी लेक माझी माय होते. खरोखर लेकीचे निरागस प्रेम ज्याला लेख आहे. त्याला चांगल्या प्रकारे अनुभवता येते. मी आज पर्यंत मायलेकी वरच्या अनेक कविता वाचल्या, लिहिल्या पण आहेत पण बाप लेकी वरच्या कविता  प्रकाश जडे सरांचे लेकीवरचे प्रेम, त्यांच्या  कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत. स्पर्श करणा-या आहेत.बापलेकी वरच्या कविता माझ्या प्रथमच वाचनात आल्या असल्यामुळे लेक नसल्याची हुरहूर स्वस्थ बसू दिली नाही. वात्सल्यसूक्त बाप-लेकीचे नाते दृढ करणारा कवितासंग्रह माझ्या मनाला खूप भावला सर्व रसिक वाचकांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह...

           लेक आपली असली तरी 
           लेकीचं घर आपलं नसतं
           बऱ्याच वेळा 
           लेकीचे घर लेकीच नसतं...!

           आपल्या अंगणातील वेल 
            दुसऱ्याच्या बांधावर
            मोहरताना, फुलताना, फळताना
            दुरूनच पाहायचे असते
            कधी डोळ्यांचे बांध फुटले तरी
            मनाचे बांध रेटता येत नाहीत 
            मागे-पुढे..!!

        लहानपणी बाबांच्या अंगाखांद्यावर खेळणारी लेक कधी मोठी होते बापालाच कळत नाही. तिच्या नाजूक पैंजणाचा आवाज, तिचे बोबडे बोल, बाप काळजात साठवून ठेवतो. एक दिवस प्रत्येक लेकीला तिच्या नवऱ्याच्या घरी जावं लागतं पण जेव्हा लेक सासरी जाते तेव्हा ती परक्याची होते.तिचं घर आपलं नसतं. बऱ्याच वेळा लेकीचं घर लेकीचं नसतं. बापाच्या घरासारखी सत्ता नवऱ्याच्या घरी नसते वडिलांच्या घरासारखं स्वातंत्र्य नसतं. प्रत्येक गोष्टीवर मर्यादा येतात हे वास्तव.  प्रकाश जडे सर आवर्जून सांगितल्याशिवाय राहत नाही. आपल्या अंगाणातील वेल दुसऱ्याच्या बांधावर मोहरताना, फुलताना, फळताना लेकीला बापाने दुरूनच पाहावा लागते. ती माहेरी आली तरी दोन दिवसाची पाहुणी म्हणूनच येते. आणि चिमणी सारखी परत उडून जाते. बापाच्या डोळ्याचे बांध फुटले तरी बापाच्या मनाचा बांध काही अडवता येत नाही. बापाला सर्वात जास्त त्रास लेक बापाचं घर सोडून जाते तेंव्हा होतो. बाप आतल्याआत रडत असतो. त्याला मोठ्यांनीही रडता येत नाही कारण तो बाप असतो. लेकीचा आधारवड असतो. 
       वात्सल्यसूक्त हा आगळावेगळा बाप लेकीच्या नात्यावर प्रकाश टाकणारा प्रकाश जडे सर यांचा कवितासंग्रह वाचकाच्या थेट काळजाला भिडणारा आहे. प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे वाचले वात्सल्यसूक्त होय.
          कवी प्रकाश जडे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Thursday, 21 October 2021

गोंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी मा.राजेशजी खवले साहेब यांचे समाजासाठी करू काही या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान

 https://youtu.be/h9O1rJ6UBsM

Saturday, 16 October 2021

मिनाक्षी पांडुरंग नागराळे कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

जगातल्या अनमोल रत्नांपैकी एक रत्न म्हणजे क्रांतीरत्न


*जगातल्या अनमोल रत्नांपैकी एक रत्न म्हणजे क्रांतीरत्न होय*

     स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,ज्ञानाचा दीप लावणाऱ्या क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आलेख जगाला एक महाग्रंथाची ओळख करून देणारा (संदर्भग्रंथ )महाग्रंथाची निर्मिती प्रेरणा राजेश खवले यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक,लेखक, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे चालवलेला उपक्रम म्हणजे क्रांतिरत्न जगातल्या अनमोल रत्ना पैकीच एक रत्न होय.
       शिक्षणाचे बीजारोपणपन करणारे फुले दांपत्य यांचे कार्य आद्वितीय आहे. 'फुले असुनी काठी वेचिले' या उक्तीप्रमाणे आयुष्यभर इतरांसाठी झटणारे,त्याग,समर्पण करणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्रातून १९४ लेखकांनी लिहिलेले लेख या महा ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत.या ग्रंथाचे प्रकाशक वर्षा चिमणकर अकोला, मुद्रक- सुरज कार्ड, नागपूर, मुखपृष्ठ सचिन थेटे, रेखाचित्र रवींद्र शिरसागर यांची आहेत. या ग्रंथाचे मार्गदर्शक विश्वनाथ शेगावकर (आय.ए.एस.से.नि.) तथा प्रधान सचिव तामीळनाडू व अशोक गेडाम (उपजिल्हाधिकारी) सेवानिवृत्त हे आहेत तर निर्मिती मंडळ प्रकाश अंधारे( विशेष कार्यकारी अधिकारी) प्रताप वाघमारे (तहसीलदार )नागपूर, विजय लोखंडे (तहसीलदार आकोला ) अतुल दोड (खनिकर्म अधिकारी औरंगाबाद )राहुल तायडे (तहसीलदार नांदुरा) विनय गोसावी (उपजिल्हाधिकारी जळगाव) इ. आहेत.१००० पानांचा महाग्रंथ तयार करण्यासाठी एका प्रतिसाठी आठशे रुपये खर्च हा फक्त छपाईसाठी लागला आहे. प्रत्येक घरातली स्त्री शिकली पाहिजे म्हणून आयुष्यभर त्याग करणाऱ्या फुले दांपत्याच्या कार्याची माहिती येणाऱ्या पिढीला माहित होण्यासाठी प्रत्येक घरात हा महाग्रंथ असला पाहिजे. हा महाग्रंथ येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरणार आहे.या ग्रंथाच्या मुख्य संपादक डॉक्टर पुष्पा तायडे, सहसंपादक डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ. सतीश पावडे, डॉ.चंद्रकांत सरदार, सतीश दामोदर , प्रकाश अंधारे आहेत. फुले दाम्पत्याने दांभिक रुढी परंपरेला छेद देऊन, अंधश्रद्धेची मूठमाती करून, सत्यशोधक समाजाची स्थापना करून, बाल हत्या, बालविवाह प्रतिबंधक कायदा करून, विधवांना स्वावलंबनाचे धडे गिरवायला शिकवून, विधवांचे केशवपन थांबवून, स्त्रियांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत करून, शिक्षणाचे ध्येय साध्य करण्याकरिता संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याकरता या ग्रंथाची निर्मिती झाली. त्यामुळे क्रांतिरत्न हे जगातील अनमोल रत्न पैकी एक रत्न आहे असे म्हणावे लागेल. या महान ग्रंथनिर्मितीस अनेक मंत्री, खासदार, आमदार व अनेक विद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाचे कुलगुरू इत्यादी जणांच्या शुभेच्छा  लाभल्या आहेत. महाराष्ट्रातील थोर प्राध्यापक, लेखक,कवी,पत्रकार, शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्कृष्ट लेख निवडून घेतले आहेत या ग्रंथांमध्ये सुरुवातीला महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम व सावित्रीआईचा संपूर्ण जीवनक्रम दिलेला आहे. त्यानंतर लेखकांची अनुक्रमणिका यादी देण्यात आली आहे.
          स्त्री शिक्षणाचे आद्यजनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्री आईची खंबीर साथ होती म्हणून फुले दाम्पत्यांने समाजातल्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत यासाठी अहोरात्र मेहनत करून अनेक समाजोपयोगी कामे केलीत. अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली.समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण हेच ध्येय गाठले. समाजातल्या स्त्रिया शिक्षित करण्यासाठी अनेक अन्याय सहन केले पण आपल्या मार्गांवरून तसूभरही हलले नाहीत. विधवा पुनर्विवाह घडवून आणले, विधवा केशवपन,बाल प्रतिबंधक कायदा बनवला.  विधवा आत्महत्या थांबवून, शंभर विधवा गरोदर मातांची बाळंतपणे स्वतःच केलीत. इतकेच नाही तर प्लेगच्या साथीमध्ये अनेकांना जेवण मिळत नव्हते तेंव्हा स्वतः अन्नछत्र चालवले. अशा महान क्रांतीज्योतीस खरं तर भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यायला हवा आहे पण ती एक शोकांतिकाच ठरली आहे. आज सावित्री ज्योतिबा मुळेच अनेक स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेताना दिसत आहेत. क्रांतिरत्न या महान ग्रंथामुळे समाजाला व येणाऱ्या भावी पिढीला एकाच ठिकाणी फुले दाम्पत्यांच्या कार्याची ओळख एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडेल यात शंकाच नाही. या महान ग्रंथ निर्मिती साठी झटणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे  मनापासून अभिनंदन... आज पर्यंत सावित्री- ज्योती यांच्या जीवनावर आधारित १००० पानांचा  महाग्रंथ कुठेही प्रकाशित झाला नाही. या ग्रंथाची द वर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे. त्यासाठी सर्व टीमचे अथक प्रयत्न चालू आहेत. असा महान ग्रंथ प्रत्येक घरातल्या प्रत्येकाकडे असायलाच हवा. महाराष्ट्रात ११ एप्रिल २०२१  रोजी या ग्रंथाचे १३१ ठिकाणाहून एकाचवेळी प्रकाशन होणार आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा....!!
            ग्रंथ हवा असल्यास मा. प्रकाश अंधारे सर यांच्याशी खालील नंबर वर संपर्क साधू शकता
मोबाईल नंबर- 8484906992
     क्रांतिरत्न म्हणजे सावित्रीआई आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आलेख जगासमोर मांडणारा एकमेव महाग्रंथ होय.

      कलेक्टर ते तहसीलदार
      यांनी केले अथक प्रयत्न
      साऊज्योतिस अभिवादन करण्या
       निर्मिले महाग्रंथ क्रांतिरत्न....!!

समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Sunday, 19 September 2021

सामाजिक अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे मी संदर्भ पोखरतोय


*सामाजिक अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे मी संदर्भ पोखरतोय*

       समकालीन वास्तवात सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक अंगाला भेटणार्‍या निरनिराळ्या अवस्थांच्या कविता काळजाला स्पर्श करतात तेव्हा मानवी मन अस्वस्थ होऊन जातो अशाच कवितांचा काव्यसंग्रह म्हणजे अमरावती जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी पवन नालट यांचा मी संदर्भ व करतोय हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन पुणे यांनी पहिली आवृत्ती 1 फेब्रुवारी 2019 रोजी प्रकाशित केली असून प्रस्तावना दगो काळे यांची लाभली आहे या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर माणसाच्या मनाचा पक्षी अनेक जाणिवांचा अर्थ शोधणारा नावाला साजेसे संदर्भ पोखरणारा आहे या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 280 रुपये असून त्यातल्या सर्वच कविता सामाजिक राजकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
           कवी पवन नालट यांच्या सर्वच कविता माणसाला विचार करायला लावणारे आहे सामाजिक-राजकीय ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे आहे ती शिक्षणव्यवस्थेतील भीषण विदारक ्पष्ट करणार्‍या आहेत राजकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत वास्तवाच्या जाणिवेतून अस्तित्वाचा अर्थ शोधणारे आहेत कवी पवन नालट यांच्या सर्वच कविता मुक्तछंदात असल्यातरी सुंदर व अर्थ शोधणाऱ्या आहेत माणसाला एक माणूस म्हणून विचार करायला लावणारे आहे.

            मी संदर्भ पोखरतोय
            माझ्या मनाचा 
            असंख्य विचारांचा 
             संदिग्धतेचा
             मी निरभ्र होतोय 
             निर्विकार होतोय 
             तळ शोधतोय
             न जमणाऱ्या 
             तडजोडीचा....!!

        असंख्य विचारांचा, संदिग्धतेचा संदर्भ शोधणारा कवी पवन नालट संदर्भ शोधता शोधता निरभ्र होतोय.निर्विकार होतोय, तळ शोधत राहतोय न जमणाऱ्या तडजोडीचा त्यासाठी तो राबतोय,करपतोय, हरवतोय,जगतोय एखाद्या श्वापदाच्या सारखा. वरवर दिसणारी शांतता कवीला स्वस्थ बसू देत नाही कवीच्या आत मध्ये वादळ उठलेले आहे. त्याला कुठला संदर्भ लागत नाही त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न आहेत. जाणिवांच्या विळख्यात कवी जाळं विनतोय.न  उमजणाऱ्या संदर्भाचे. संवेदनाहीन भावविश्वाची कारणमिमांसा वरील ओळींतून कवी करण्याचा प्रयत्न करतो.

              मी जगतोय स्वातंत्र्यात 
              बघतोय गुलामी 
              स्वातंत्र्याची 
              मला नाही हक्क 
              इथल्या व्यवस्थेविरूध्द बोलण्याचा 
              तरी मी अभिव्यक्तीच्या 
             अधिकाराची मालकी 
            खिशात घेऊन फिरत असतो 

         आज स्वातंत्र्य मिळून सुद्धा गुलामी भोगत आहेत काहीजण इथल्या व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही. इथल्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही आणि बोललं तर संध्याकाळपर्यंत बोलणारा जिवंत राहील याची गॅरंटी नाही तरीसुद्धा अभिव्यक्त होण्यासाठी गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी कवी अधिकारांची मालकी खिशात घेऊन फिरतो. लोकांचा प्रामाणिकपणा मोजत असतो. तिथल्या अर्थकारणाशी, समाजकारणाची, संस्कृतीशी शब्दरूपाने शस्त्र उठवत लेखणीच्या माध्यमातून कवितेच्या रूपाने व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत असतो. कारण कवीने अजून आत्म्याचा लिलाव केला नाही एकमेकांचा चोंमडेपणा करणाऱ्या भ्रष्टाचार उराशी कवटाळून माणुसकीचा खोटा आव आणणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध कवी पवन नालट वरील ओळीतून प्रहार केल्याशिवाय रहात नाही.

              कवीला लावता येत नाही
              संवेदनाच नेलपॉलिश
              शिवता येत नाहीत 
              उसवलेल्या काळजाचे टाके
              कपाळावर लावता येत नाही 
              आंदोलनाचा काळा बुक्का 
               तो वैशाख नसतो 
                तो श्रावण नसतो
                तो नसतो भैरवीतली आर्तता 
                व्यवस्थेच्या पायातले साखळदंड 
                शब्दांतून शस्त्र 
                पेरणारा कवी 
                मातीतून महावस्त्र देत असतो
                मानवतेच्या आरस्पानी देहाला....

           कवी कसा असावा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे कवी पवन नालट होय.कवीचं काळीज किती संवेदनशील असतं.कवी विद्रोही असतो.कवी संवेदनशील असतो. कवी अन्यायाविरुद्ध शब्दाच्या शस्त्राने प्रहार करणारा असतो. कवी वैशाख किंवा श्रावण नसतो. कवी व्यवस्थेच्या पायातील साखळदंड शब्दांचे शस्त्र करून पेरणारा,मातीतून महावस्त्र कवी मानवाला देत असतो. असा गहन अर्थ असणार्‍या, मानवाच्या थेट काळजाला भिडणार्‍या कविता कवी पवन नालट यांच्या आहेत.
        मी संदर्भ पोखरतोय या काव्यसंग्रहात एकूण ६० कविता माणसाच्या मेंदू वरची मरगळ झटकणा-या, माणसाला विचार करायला लावणार्‍या,व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणाऱ्या, भ्रष्ट, लाचारी,गरिबी, गुलामीची चिरफाड करणाऱ्या, शब्दाशब्दांतून विद्रोह करणार्‍या,स्पष्टवक्त्या आहेत. प्रत्येक कवीने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह मी संदर्भ पोखरतोय हा आहे. शब्द न शब्द थेट काळजाला भिडणारा आहे.
       कवी पवन नालट यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!
       पुस्तक मागवण्यासाठी कवीचा मो.नं ९९६०३९०७५३

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

Saturday, 18 September 2021

वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

*वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*

  जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव ता.जि.वाशिम येथील आदर्श शिक्षिका मीनाक्षी पांडुरंग नागराळे यांना रयतेचा कैवारी शैक्षणिक डिजिटल दैनिक वृत्तपत्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त "राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने" १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले आहे.
     त्याचबरोबर त्यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले असून दप्तर मुक्त शाळा,गोष्टीचा शनिवार, तंबाखू मुक्ती साठी बाबास पत्र लिहा, तंबाखूजन्य पदार्थाची होळी, पक्षी वाचवा उपक्रम तसेच शैक्षणिक pdf, PPT, flipbook तयार करणे आणि राज्यभरातील शिक्षिकांना 'उपक्रमशील व तंत्रस्नेही' व्हाट्सअप समूहाद्वारे लॉकडाउन काळामध्ये ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करणे व लॉकडाऊन काळात हजारो शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती करून युट्युबवर प्रसारित करीत शाळा बंद पण शिक्षण आहे सुरू या सदराखाली महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर लॉकडाउन काळात माजी विद्यार्थ्यांकडून जे नोकरीवर लागले आहेत अशा विद्यार्थ्याकडून जिल्हा परिषद शाळेचे ऋण व्यक्त करण्याकरता लोकसहभाग गोळा करून शाळेची उत्कृष्ट रंगरंगोटी केली आहे. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांचे साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रात नाव कमावले आहे. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यातले व जिल्ह्यातले विद्यार्थ्यांचे पहिले काव्यसंग्रह 'उमलती फुले' स्वखर्चाने प्रकाशित केले असून त्यांचे 'चिमणी पाखरं' आणि स्वराज्याचे मावळे हा ऐतिहासिक काव्यसंग्रह शालेय शिक्षण सचिव नंदकुमार साहेब, खासदार भावना गवळी, आमदार पाटणी,आमदार अमित झनक व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब (स्वराज्यरक्षक मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता )यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहेत. स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.त्यांचे अनेक लेख व जवळपास ४० पुस्तकावरची समीक्षेने, कविता, महाराष्ट्राच्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्याची दखल घेत रयतेचा कैवारीच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे आणि सेवानिवृत्त प्राचार्य बी.बी. जाधव यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार निलेश लंके, राजूदास जाधव, अमृत बांगर, गोपीनाथ जगताप, रामदास रहाणे, परसराम निखाडे, संगीता नरवाडे, रेतीचा कैवारीचे मुख्य संपादक शाहू संभाजी भारती आदींची उपस्थिती होती.
       मिनाक्षी नागराळे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ व मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने शिक्षण वर्गाकडून तसेच माजी शिक्षणाधिकारी अंबादास मानकर गट शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे केंद्रप्रमुख विलास गोटे जिजाऊ ब्रिगेड, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना वाशिम तसेच मराठा सेवा संघाचे वाशिम जिल्हा सचिव नारायणराव काळबांडे व सर्व शिक्षक वृंदाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Wednesday, 8 September 2021

मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे कोवीड योध्दा म्हणून सन्मानित...

*मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे सन्मानित*

          मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त वाशिम येथील सर्कीट हाऊसमध्ये कोवीड १९ च्या काळात सेवा करणारे डॉक्टर्स,नर्स, पोलीस,शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांना कोरोना योध्दा म्हणून ग्रंथ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकराव महाले, उद्घाटक आमदार अॅड किरणराव सरनाईक, प्रमुख अतिथी आमदार अमित झनक बाबाराव पाटील खडसे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश अहेर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद वानखेडे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष माधवराव अंभोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.राजुभाऊ चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष सौ.संजिवनीताई बाजड,मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव शिवश्री.नारायणराव काळबांडे, नागेश काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम यांना सन्मानित करण्यात आले.त्यांनी कोरोना काळात लोकवर्गणीतून शाळा रंगरंगोटी केली.तसेच विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करून ऑफलाईन शिक्षण दिले.'शाळा बंद शिक्षण आहे सुरू' या सदराखाली अनेक शैक्षणिक पिडीएफ,पी.पीटी,फ्लीपबुक ची निर्मिती केल्याबद्दल 'कोवीड योध्दा' म्हणून मिनाक्षी नागराळे वाशिम यांना मराठा सेवा संघातर्फे प्रमाणपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाबळे सर यांनी केले,तर आभार शिवश्री नारायणराव काळबांडे यांनी मानले.या कार्यक्रमास जिल्ह्यातील  प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिष्ठित डॉक्टर्स, पोलिस,नर्स, पत्रकार, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,शिक्षक आदि उपस्थित होते.

Saturday, 28 August 2021

बालकांच्या सकस बुध्दीचा आहार म्हणजे-'नभाची कोडी'(विज्ञानाधारित कोड्यांचा बालकाव्यसंग्रह)

 *बालकांच्या बुद्धीचा सकस आहार म्हणजे- नभाची कोडी(विज्ञानधारित कोड्यांचा बालकाव्यसंग्रह)*


     मुलांना कोडी खूप आवडतात. बालपणी मुलांची बुद्धी फार तल्लख व फार चिकित्सक असते. आपल्या आजूबाजूला शेजारीपाजारी एखादे लहान मूल असते. त्याच्याकडे बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते की लहान मुलं खूप प्रश्न विचारतात व घरातील आई-बाबांना भंडावून सोडतात. का? असेच का? तसेच का? असे का नाही? तसे का नाही? कुठे गेला ? केंव्हा येणार? अशा प्रश्नांची मालिका सुरूच असते. काही लहान लहान मुलं तर आकाशातला चंद्रच मागतात. मग आई त्याची समजूत काढते. तो चांदोमामा आहे.आपल्यापासून खूप दूर असतो तेवढ्या लहानपणापासून चंद्र, चांदण्या,आभाळ, ढग, पाऊस, दिवस-रात्र यांच्याविषयी उत्सुकता वाढायला लागते. त्यात मुलांना खेळ, गाणी,गोष्टी,कोडी तर फारच आवडतात.अशाच विज्ञानाधारित कोड्यांची मेजवानी म्हणजे- नभाची कोडी. 

             बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील लेखक, कवी,प्राध्यापक देवबा शिवाजी पाटील यांचा नुकताच प्रकाशित झालेला कोड्यांचा बाल काव्यसंग्रह नभाची कोडी हा बाल काव्यसंग्रह वाचनात आला.या पुस्तकाचे मुखपृष्ठ बाल मनाला आकर्षित करणारे असून विद्यार्थ्यांची वाचण्याची उत्सुकता निर्माण करणारे देखणे मुखपृष्ठ आहे. प्रत्येक पानावर बालकांच्या चित्रासह आश्चर्य दाखवणारे, उत्साहवर्धक,मनोवेधक चित्रे रेखाटली आहेत. या पुस्तकाचे  प्रकाशन श्री राजू बर्वे पुणे यांनी दिलिपराज प्रकाशन द्वारा केले आहे.याची प्रथमावृत्ती ५ऑगस्ट २०२१ ला प्रकाशित झाली आहे.या पुस्तकाला प्रस्तावना प्राध्यापक, डॉ.राणे अंबरनाथ यांची लाभली असून पाठराखण प्राध्यापक डॉ.किसन पाटील जळगाव यांनी केली आहे. या पुस्तकाची किंमत 120 रुपये असली तरी यातल्या कोडे कविता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या  बुद्धीचा कस वाढवणाऱ्या आहेत.

          'नभाची कोडी'  या पुस्तकातील सर्वच कविता कवितेचा हात धरून विज्ञानाकडे नेणाऱ्या आहेत. ज्ञानदायी आहेत. सर्व कविता या भूगोल व खगोल शास्त्राची ओळख करून देणार्‍या आहेत. प्रत्येक कवितेत तालबद्ध, रंजकता उत्सुकता व उत्साह भरभरून भरलेला आहे. मुलांना कल्पनाशक्तीच्या जगात घेऊन जाणार्‍या रहस्यमय कविता मुलांना खूप आवडतात. या पुस्तकातील भाषा कवी देवबा पाटील यांनी आकलनसुलभ, सहजरित्या, साधी, सरळ, सोपी भाषा वापरली असल्यामुळे अतिशय मनोरंजक व उत्साह वाढवणार्‍या या सर्वच कविता आहेत. यातल्या बर्‍याच कविता मोठ्यांच्या ज्ञानात भर घालणा-या आहेत.


         खांब नाही 

         सरी नाही 

          दांडे नाही 

          टेके नाही 

   

           खाली मुळीच 

            पडत नाही 

            वर जाता 

            वरच जाई


              आदी नाही 

              अंत नाही 

              ग्रहताऱ्यांनी

              व्यापून राही


                निळा निळा 

                 त्याचा रंग 

                ओळखा तयास

                 होऊन दंग....!!


          बालमनाचा उत्साह व उत्सुकता वाढवणारी कोडी मुलांना शेवटपर्यंत कोड्यात टाकणारे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देऊन बुद्धीचा कस वाढवणारी आहेत.विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून कुतूहल वाढवणाऱ्या बालकविता प्राध्यापक देवपा पाटील यांनी रचल्या आहेत. प्राध्यापक  देवबा पाटील हे प्राध्यापक असले तरी लहान मुलांना समजतील अशा बालकथा व बाल कवितांचे त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. प्राध्यापक देवबा पाटील हे खरे तर विज्ञानाचे शिक्षक परंतु लहान मुलांच्या प्रति त्यांचा असलेला लळा वाचकास दिसून येतो. प्राध्यापक देवबा पाटील यांची 'धाडसी राम'  ही कादंबरी खूप वाचनीय व प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे 'नभाची कोडी' हा विज्ञानाधारित कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या अत्यंत उपयोगी आहे. 'नभाची कोडी' या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना सूर्य, ग्रह, तारे, आकाशगंगा, सूर्यमाला, चंद्र, पृथ्वी, आभाळ,संधिप्रकाश, वारा, पाऊस, गारा, इंद्रधनुष्य, ढगफुटी,उल्का, धूमकेतू, चांदण्या, सौर ऊर्जा, कृत्रिम उपग्रह, इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रत्येक कविता अतिशय मनोरंजक असल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करणारी आहे. या नभाची कोडी या काव्यसंग्रहामध्ये एकूण 23 कोडे कवितेच्या रुपात प्राध्यापक देवबा पाटील यांनी रचली आहेत.शेवटी प्रत्येक कोडे कवितेची उत्तरे शेवटच्या पानावर दिली आहेत.

         प्राध्यापक देवबा पाटील यांची आज पर्यंत एकूण 53 पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या विविध पुस्तकांना अनेक पुरस्कार आज पर्यंत मिळाले असून त्यांच्या अनेक कविता विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत असतात.नभाची कोडी हा कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर घालणारा असल्याने प्रत्येक घरात, प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच आहे.


    प्राध्यापक देवबा पाटील यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....


समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री

कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

पीन ४४४५०५

मो.९७६७६६३२५७


Wednesday, 4 August 2021

रोमन अंक 101 ते 200

 101=CI

102=CII

103=CIII

104=CIV

105=CV

106=CVI

107=CVII

108=CVIII

109=CIX

110=CX

111=CXI

112=CXII

113=CXIII

114=CXIV

115=CXV

116=CXVI

117=CXVII

118=CXVIII

119=CXIX

120=CXX

121=CXXI

122=CXXII

123=CXXIII

124=CXXIV

125=CXXV

126=CXXVI

127=CXXVII

128=CXXVIII

129=CXXIX

130=CXXX

131=CXXXI

132=CXXXII

133=CXXXIII

134=CXXXIV

135=CXXXV

136=CXXXVI

137=CXXXVII

138=CXXXVIII

139=CXXXIX

140=CXL

141=CXLI

142=CXLII

143=CXLIII

144=CXLIV

145=CXLV

146=CXLVI

147=CXLVII

148=CXLVIII

149=CXLIX

150=CL

151=CLI

152=CLII

153=CLIII

154=CLIV

155=CLV

156=CLVI

157=CLVII

158=CLVIII

159=CLIX

160=CLX

161=CLXI

162=CLXII

163=CLXIII

164=CLXIV

165=CLXV

166=CLXVI

167=CLXVII

168=CLXVIII

169=CLXIX

170=CLXX

171=CLXXI

172=CLXXII

173=CLXXIII

174=CLXXIV

175=CLXXV

176=CLXXVI

177=CLXXVII

178=CLXXVIII

179=CLXXIX

180=CLXXX

181=CLXXXI

182=CLXXXII

183=CLXXXIII

184=CLXXXIV

185=CLXXXV

186=CLXXXVI

187=CLXXXVII

188=CLXXXVIII

189=CLXXXIX

190=CXC

191=CXCI

192=CXCII

193=CXCIII

194=CXCIV

195=CXCV

196=CXCVI

197=CXCVII

198=CXCVIII

199=CXCIX

200=CC

रोमन अंक १०० ते. २००

 

101=CI

102=CII

103=CIII

104=CIV

105=CV

106=CVI

107=CVII

108=CVIII

109=CIX

110=CX

111=CXI

112=CXII

113=CXIII

114=CXIV

115=CXV

116=CXVI

117=CXVII

118=CXVIII

119=CXIX

120=CXX

121=CXXI

122=CXXII

123=CXXIII

124=CXXIV

125=CXXV

126=CXXVI

127=CXXVII

128=CXXVIII

129=CXXIX

130=CXXX

131=CXXXI

132=CXXXII

133=CXXXIII

134=CXXXIV

135=CXXXV

136=CXXXVI

137=CXXXVII

138=CXXXVIII

139=CXXXIX

140=CXL

141=CXLI

142=CXLII

143=CXLIII

144=CXLIV

145=CXLV

146=CXLVI

147=CXLVII

148=CXLVIII

149=CXLIX

150=CL

151=CLI

152=CLII

153=CLIII

154=CLIV

155=CLV

156=CLVI

157=CLVII

158=CLVIII

159=CLIX

160=CLX

161=CLXI

162=CLXII

163=CLXIII

164=CLXIV

165=CLXV

166=CLXVI

167=CLXVII

168=CLXVIII

169=CLXIX

170=CLXX

171=CLXXI

172=CLXXII

173=CLXXIII

174=CLXXIV

175=CLXXV

176=CLXXVI

177=CLXXVII

178=CLXXVIII

179=CLXXIX

180=CLXXX

181=CLXXXI

182=CLXXXII

183=CLXXXIII

184=CLXXXIV

185=CLXXXV

186=CLXXXVI

187=CLXXXVII

188=CLXXXVIII

189=CLXXXIX

190=CXC

191=CXCI

192=CXCII

193=CXCIII

194=CXCIV

195=CXCV

196=CXCVI

197=CXCVII

198=CXCVIII

199=CXCIX

200=CC