Saturday, 3 April 2021

संस्काराचा खजिना म्हणजे बारीकसारीक गोष्टी

 *संस्काराचा खजिना म्हणजे -बारीकसारीक गोष्टी*

            बालवयातच मुलांना बोधकथा, संस्कारकथा,छान छान गोष्टी खूप आवडतात. गोष्टीमधून योग्य ते संस्कार रुजवले जातात.बालकांच्या भावविश्वाशी निगडित असणाऱ्या प्राण्या-पक्षांच्या,आजोबा-आजींच्या,निसर्गाच्या, परींच्या कथा बालकांना खूप आवडतात.गाण्यापेक्षाही मुलांना कथा जास्त आवडतात.अशाच कथांचं पुस्तक माझ्या वाचनात आले आहे.त्याचं नाव आहे बारीक सारीक गोष्टी. लेखक आहेत शिरीष पद्माकर देशमुख. चपराक प्रकाशन यांनी प्रकाशन केले असून याची प्रथम आवृत्ती १७ सप्टेंबर २०२० ला प्रकाशित झाली आहे. या कथा संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे आहे. पाहताक्षणी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणारे आहे. या कथासंग्रहात एकूण पंधरा गोष्टी असून त्याचे मूल्य फक्त ९९रूपये आहे. पण यातल्या सर्वच कथा बालकावर योग्य संस्कार करणा-या आहेत.
              जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखक शिरीष देशमुख यांचा बालबोध करणारा कथासंग्रह बारीक-सारीक गोष्टी या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.कथा छोट्या छोट्या असल्या तरी गहन आशयाच्या आहेत. आज बऱ्याच पालकांच्या तक्रारी असतात की या मोबाईल मुळे मुले बिघडायला लागली आहेत. मुलं खूप हट्टी होत आहेत. त्यांना शिस्त नाही. रागीष्ट झालेत अशी अनेक पालकांच्या तक्रारी असतात पण मुलांवर योग्य वयात योग्य ते चांगले संस्कार करण्याची गरज आहे. बालवयात केले गेलेले संस्कार आयुष्यभर पुरतात, टिकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माँसाहेब जिजाऊ होय. मासाहेबांनी शिवरायांवर बालपणीच उत्तम संस्कार केले. स्त्रियांचा आदर करणे रयतेचे रक्षण करणे, रयतेच्या सुखासाठी अपार त्रास सहन करणे, आपले कर्तव्य बजावणे हे सारे संस्कार बालवयातच रामायण-महाभारतातल्या सारख्या कथा सांगून योग्य ते संस्कार पेरले होते म्हणून जगाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांचे नाव प्रथम येतील अशा संस्कार घडवणाऱ्या या कथा प्रत्येक बालकांनी तर वाचाव्यात पण पालकांनी ही आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.
              लेखक शिरीष देशमुख यांनी बालकांना वळण लावणाऱ्या बालकांवर संस्कार घडवणाऱ्या, बालकांच्या व पालकांच्या पचनी पडतील अशा कथांचा खजिनाच वाचकांसमोर ठेवला आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. बुजगावणं या कथेत एक हरिणी आपल्या पाडसांना हिम्मत येण्यासाठी बुजगावणं पाडून दाखवते नंतर सर्व पाडसाची भीती आपोआप दूर होते.बालकांच्या जीवनातला सर्वात मोठा गुरु म्हणजे आई असते तीच जीवनाला योग्य आकार देत असते. हे या कथेतून प्रकर्षानं जाणवतं
            मार्जिन या कथेमध्ये मार्जिन पेक्षा निसर्ग किती मोठा ? तो कोणत्या पद्धतीने वाचवला पाहिजे हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारा यश प्राप्त प्रात्यक्षिकासंह आपल्या प्रिन्सिपल मॅडमला समजावून सांगतो.वेळ प्रसंगी सरांच्या छड्या खाणाऱ्या यशचे निसर्गावर चे प्रेम निसर्ग, वाचवण्याचे उपाय अगदी छोट्या कृतीतूनही धीटपणे सांगणारा यश त्याच्या धाडसाचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही ही कथा वाचल्यानंतर खरंच आपण का मार्जिन सोडतो असा सवाल वाचकाला पडतो.
             शाळेत जायला नको म्हणून रडणारा राजू चित्रकला स्पर्धेत प्रथम येतो आणि आपलं बक्षीस बाबांना दाखवतो तेव्हा राजूच्या रागामुळे घरातलं झालेलं नुकसान, दूध सांडणे, रिमोट फोडणे बाबा समजावून सांगितल्याने राजुचा राग किती वाईट आहे ? ते कळतं. आजकाल मुलांना हल्ली ही भाजी आवडत नाही. ती भाजी आवडत नाही. असे म्हणणाऱ्या मुलांसाठी खास कथा आहे. दाता तला राक्षस या कथेत अनंता सूर बंटीच्या स्वप्नात येऊन ब्रश कर बदल दम देतो.त्याच बरोबर बिस्कीट चहा किती वाईट आहे ते सांगतो. त्यामुळे घाबरलेला बंटी दररोज ब्रश नियमितपणे करतो हे आजच्या प्रश्न करणाऱ्या कंटाळवाण्या मुलांवर खास औषधच आहे.
           आजच्या धावत्या युगात पालकांनी आपल्या मुलाबरोबर वेळ कसा घालवावा याची महती सांगणारा, बालकांच्या भावना पालकांपर्यंत पोचणारी कथा संजू तप करतो या कथेतून शिरीष देशमुख यांनी अगदी मार्मिकपणे मांडली आहे त्यामुळे पालक नक्की जागृत होतील यात संशय नाही. शेतकऱ्याला पोटासाठी सालभर किती कष्ट करावे लागतात. याची प्रचिती देणारी कथा म्हणजे ' पांढरा चिखल' पावसामुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान ,मुलगा जेव्हा डोळ्यांनी पाहतो तेव्हा मला सायकल नको म्हणून रडणारा मुलगा व बाप यात मुलांचा समंजसपणा, मोठेपणा दिसून येतो. गारपीठीमध्ये गोरगरिबांचे संसार उघड्यावर आलेल्या लोकांना मदत करून खऱ्या अर्थाने शिवजयंती कशी साजरी करतात हे शिव संस्कार या कथेतून घेण्यासारखे आहे हरवलेल्या हरिणीच्या पाडसाला झालेली जखम पाहून तळमळणारा कोवळ्या मनाचा राजा पाडसाला जीवापाड प्रेम करतो.राजा आणि पाडस या कथेमध्ये प्राणीमात्रावर दया कशी करावी?  हे दिसून येते
          भोळ्याभाबड्या यशला पाच रुपयाचा नाना सापडतो. हे पैसे माझी नाहीत मी नको ठेवायला. अशीच सद्सद्लतविवेक बुद्धीने वागणारा सापडलेले पैसे देवाच्या पेटी मध्ये टाकण्यासाठी जातो पण मंदिराबाहेर भुकेने व्याकूळ झालेला मुलगा पाहून भीक मागणाऱ्या मुलाला पैसे न देता त्याला स्वतःचे दोन रुपये टाकून दुकानात जाऊन पाच रुपये ची वही व दोन रुपयाचा पेन देतो. हे या डॉलर या कथेतून त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. इतरांना मदत करणारे भाव- भावना काळजाला स्पर्श करून जाते. माझी आईत्याची आई या कथेतून ग्रामीण भागात राहणाऱ्या कष्ट करून घामाने स्वाभिमानाने प्रामाणिकपणा रे राहणारी महेश ची आई रोहन आपल्या आईबरोबर तुम्हाला करून पाहतो पण रोहनला माहेरची आई परिस्थितीने दरिद्री पण मनाने श्रीमंत असलेली आई अधिक महत्त्वाची वाटते
         रवी च्या बर्थडेला रवी चे चित्र स्केच करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी झिप्री या कथेतून निस्सीम निखळ प्रेम दिसून येतो रविवार माझ्या आवडीचा म्हणणाऱ्यांना रविवार किती कंटाळवाणा आहे तो दिसतो. दररोज रविवार असेल तर सगळी कामं कशी ठप्प पडतात? तेच सोमवारची कहाणी या कथेतून दिसून येते.राजकन्या आणि परीस यांची ही  कथा खूपच मनोरंजक आहे परिसाचा दगड फेकून देणाऱ्या राजकुमारीला परिसराचे महत्त्व कळत नाही तोच दगड लोहारा ला ठेचून बघा करण्यासाठी दिला जातो आणि लोहाराच्या आयुष्याचं सोनं होतं मायेची गोष्ट या कथेमध्ये मुक्या प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारा लहानग्याला दासुच अपार प्रेम दिसून येतं.
           लेखक शिरीष देशमुख यांनी बारीक-सारीक गोष्टी या बाल संग्रहातून विद्यार्थ्यांवर,बालकांवर योग्य संस्कार होतील अशा सर्वच कथांचा खजिना आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या बालका समोर ठेवला आहे. बालवयातच योग्य संस्कार मुलांवर होतात त्यासाठी प्रत्येक बालक व पालकांनी बारीक-सारीक गोष्टी आवर्जून वाचावे असा कथासंग्रह. आज साहित्यामध्ये महिलाचा दगड ठरला आहे. यातल्या सर्वच कथा बालमनाला आवडतील अशा सर्वच कथा चित्ररूप असल्याने व बालकांच्या पुस्तक हाताळण्याच्या दृष्टीने पाणी दर्जेदार प्रतीची असल्याने थेट कथा काळजाला भिडतात. वाचकाला वाचताना जणू चित्र डोळ्यासमोर उभे राहते असे संस्काराचा खजिना प्रत्येक शाळेत घरात आवर्जून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
                लेखक शिरीष देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 

समीक्षिका/लेखिका /शिक्षिका /कवयित्री 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता. जि. वाशिम
मो.9767663257

Monday, 29 March 2021

पुरस्कार

Sunday, 28 March 2021

शेतीमातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे 'आम्ही माणसं मातीचे'

 *शेती मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे आम्ही माणसं मातीचे*

     भारत हा कृषीप्रधान देश आहे.बळीराजा शेतामध्ये राबराब राबतो. उन्हातानात रात्रंदिवस कष्ट उपसतो. म्हणून अख्या जगाला अन्न मिळते. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात. शेतकरी आहेत म्हणून सारी दुनिया आहे.शेतकऱ्याला त्याची काळी माती त्याला मायीसारखी वाटते. शेती शेतकऱ्याचा जीव की प्राण असतो. विदर्भाच्या मातीत जन्मलेले अमरावती जिल्ह्यातील व-हाडी कवी गजानन मते यांचा 'आम्ही माणसं मातीचे' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ शेती- मातीचे आहे. शेतातली झोपडी, झाड,बैलगाडीचे चाक असे सुंदर मुखपृष्ठ आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मेधा पब्लिकेशन हाऊस, अमरावती यांनी प्रकाशित केले असून त्याची प्रथमावृत्ती ५ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १२० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता शेती-मातीशी नाळ जोडणा-या आहेत.
         शेतकऱ्यांचे स्वप्न फुलवणाऱ्या, शेतकऱ्याच्या घामाने भिजलेल्या, पावसाचे महत्व सांगणाऱ्या, कुणब्याचं जीणं सांगणाऱ्या,धान्याला कोंब फुटतं, मृगाचा पाऊस,जेंव्हा पालवी फुटते, मृगाचा पाऊस, फुले, बापू तुझ्या देशात, माय, आभाय, आंबा, माती माय रुसलेली,आम्ही माणसं मातीचे अशी मातीचा कळवळा असणारा कुणब्याला माती म्हणजे त्याची माय समजून लिहिलेल्या सर्वच कविता शेती मातीशी नाळ जोडणाऱ्या आहेत कष्टकऱ्यांचे जीणं-मरणं सांगणा-या आहेत.
        
           "रोज घरचाच कसा 
           आला पाऊस पावना 
           पापणीत साठवून 
           सखी बसली साजना...!!

            आठवात पावसाच्या 
             होती धरती अबोल 
             तुवा भिजोल्या वाटेन
             कशी सावरू मी तोल...!!

              कवळ्या फांदीले आली 
              आता कवळीच पान 
              थेंब झेलताना गाती 
               हिरव्या संसाराच गाणं....!!"

          शेतकरी ज्याची देवासारखी वाट पाहतो, ज्याच्यावर शेती अवलंबून असते अशा पावसाची आतुरतेने वाट बघणारा शेतकरी पावसाला  पाहुना म्हणतो. पावसाच्या आठवणीत धरणीमाय अबोल होऊन बसते. पावसाची आतुरता, ओढ,धरणीमायला लागली आहे. पावसाने भिजलेल्या वाटेनं तिचा तोल कशी सावरू या विचारांनी धरणी वाट पाहत बसली आहे.तुझ्या पावसानं मी तृप्त होणार आहे.तुझ्यामुळेच झाडाच्या फांदीला कोवळी पानं फुटतील आणि पावसाचा प्रत्येक थेंब झेलताना हिरव्या संसाराचं गानं गातील असे शेतकरी प्रिय असणारा कवी गजानन मते यांना वाटते. शेतीवरचे निसर्गावरच प्रेम त्यांच्या प्रत्येक शब्दांशब्दातून भरभरून ओसंडत आहे.
             कवी गजानन मते सरांच्या सर्वच कविता अस्सल वऱ्हाडी भाषेमध्ये असल्याने 'आम्ही माणसं मातीचे' हा कवितासंग्रह व-हाडी मेवा आहे. साधी, सरळ, सोपी,व-हाडी भाषा, प्रत्येक कवीता गेय स्वरूपात मांडण्याचा गजानन मते सरांचा हातखंडा दिसून येतो. कांही कविता सहा अक्षरी, तर काही कविता अभंग प्रकारात असल्याने एक वेगळाच साज घातल्या सारख्या भासतात तर काही कविता अष्टाक्षरी या काव्या प्रकारांमध्ये येतं असल्याने आणखीनच खुलून दिसत आहेत.कवी गजानन मते सरांना मनाच्या शेतीवर शब्दांची पेरणी करायला सुरेख जमतं.

            पाणी ना पाऊस
            चिंता कास्तकारा
            हमसून रडे 
            वावराचा धुरा....!

             बिना भरोशाचं 
             कुणब्याचं जीन
             मांडतो बेरीज
             होते उणं-उणं....!!

          व-हाडी मातीचा गंध कवी गजानन मते सरांच्या प्रत्येक शब्दांतून येताना दिसतो. ना कुणाची प्रस्तावना ना कुणाच्या शुभेच्छा. प्रत्येक कविता कवीने बळीराजाच्या ओटीत धान्य भरावं तसं भरले आहेत. कुणाब्याला समर्पित केले आहे.स्वार्थी माणसानेच आज  वृक्षतोड करून निसर्गाची भयानक हानी करून ठेवली आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर कधी पडतच नाही. पावसाची वाट बघणारा शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत बसतो. वेळेवर पाऊस पडला नाही तर चिंता करीत बसतो. शेतकऱ्याला झोप लागत नाही की अन्न गोड लागत नाही. त्याला फक्त पावसाची ओढ लागते. पाऊस पडल्यावर वावराचा( शेताचा) धुरा (बांध ) रडत बसतो. शेतकऱ्याचे जीवनच पावसावर अवलंबून असते.ते जीवन बीन भरोशाचे असतं म्हणजे पाऊस पडेल की नाही याची खात्री नसते. बेरीज मांडत बसला तर राहतं उणं उणं. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा पावसाच्या भरोशावर कर्ज काढून व्याजानं पैसा काढून खत बियाणं साहित्य घेतो. शेत पिकल्यावर परत करू या आशेन का होईना हिंमत धरतो. पण पावसाने जर दगा दिला तर शेतकरी कर्जापायी स्वतःला फास लावायलाही मागं पुढं बघत नाही. शेतकऱ्याच्या जीवाची आर्त हाक कवीने मांडली आहे.

                 सूर्य तळपत आला 
                 हिवं खात पाणी पित
                 वारा सुसाट सुटला 
                 धूळ-माती उडवित....!!

                  आला फुलून पळस
                  शेत-शिवारास लाली
                  सुकलेल्या डोंगराला 
                  हसू फुटलेलं गाली......!!

                   किती सोकू दे जमीन 
                   हारू नको धर तग
                   ऊन वारा तुफानात 
                   सांगे पळस तू जग.....!!

          वरील गोळीतून कवी गजानन मते यांचे शेतकऱ्यावरील नितांत प्रेम व आदर दिसून येते. कडक उन्हाळ्यात सूर्य आग ओकत आहे. अशी उन्हाची तीव्रता असताना इतकी गर्मी विदर्भात असते. वारा बेभान सुटतो. धूळ माती तुडवत याच वसंत ऋतूमध्ये पळस फुलून आला आहे . त्याच पळसाच्या फुलावरची शिवाराला सुद्धा लाली चढली आहे. उन्हाळ्यात कितीही तापलं, डोंगर सुकली तरी पळस मात्र हसत शेतात उभा आहे. पाऊस नाही पडला तर दुष्काळ येतो. जमीन सुकून जाते. पण तू बळीराजा तू हरू नकोस धीर सोडू नकोस. त्यातूनसुध्दा तुफानामध्ये पळस  जगायला सांगते .असल्या तप्त उन्हात पळस डोलाने रंग उधळीत उभा असतो.तसे माणसाने ताठ उभं राहून कष्ट करून जगले पाहिजे. पळस सुद्धा माणसाला तू असं जग म्हणून सांगतो.

        तुझी माय माती | माझी माय माती |
        कुठे जातीपाती | पांघरता ||

       साऱ्या मानवाची माय म्हणजे माती. माणसाचा जन्म जरी आईच्या पोटी घेतला पण शेवटी मनुष्य मातीतच जाणार आहे. या काळ्या माईकडे कधीच भेदभाव नसतो. तिला सारी लेकरे एक समान असतात. तिच्याकडे कोणती जातपात नसते. ना कोणता धर्म नसतो. सर्वांचा रंग एकसारखाच असतो. सर्व सर्वांचे रक्त लालच असते मग मानवाने का भेदभाव करावा असे कवी गजानन मते वरील वरील ओळीतून व्यक्त होताना दिसतात.
                  कवी गजानन मते यांच्या कविता शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणाऱ्या, कष्ट करायला लावणाऱ्या,निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या, समतेचे महत्त्व विशद करणा-या,कुणब्याचं  जिने-मरणं, दुःख, दुष्काळ , अवर्षण विषद करणाऱ्या, गावाची ओढ लावणाऱ्या, वास्तवता मांडणाऱ्या, माय मराठीची महती सांगणाऱ्या, देश धर्मासाठी प्राण पणाला लावणाऱ्या, सर्वच कविता वाचकांच्या थेट काळजाला जाऊन भिडणा-या आहेत.
        
            कवी गजानन मते सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!
आम्ही माणसं मातीचे पुस्तक खरेदीसाठी संपर्क.
९४२००७६८६७

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७

Wednesday, 24 March 2021

संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे-इजू

 *संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे-इजू*

*इजू एक धगधगती संघर्षगाथा. पुण्याच्या हनुमाननगर झोपडपट्टीतला आकी-आबाचा लाडका इजू वेळप्रसंगी फक्त पाणी पिऊन झोपणारा इजू. परिस्थितीला दोष न देता अंधारलेल्या आयुष्याला कष्टाचा मुलामा देत उजेडाच्या दिशेने जाणारा इजू .तर कधी बाल वयात हसून खेळून बालपण न घालवता कोवळ्या वयातील भावंड सांभाळण्याची जिमेदारी घेणारा इजू. दोन पैसे मिळवण्यासाठी भल्या पहाटे लवकर उठून पेपर टाकणारा, दूध पॉकेट पोचवणारा, बिगारी काम सुट्टीच्या दिवसांत करून दोन पैसे स्वाभिमानाने मिळवणार्‍या इजूचे  आत्मचरित्र वाचकाला जगण्याची उमेद व प्रेरणा देऊन जाते.
        पुणे जिल्ह्यातील विजय वडवेराव यांचे आत्मचरित्र इजू नुकताच वाचनात आले या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ शिक्षणाची जबरदस्त इच्छाशक्ती असणाऱ्या बालपणीच्या इजूचे आहे. सारवलेल्या हिरव्यागार जमिनीवर कोळशाचा बोरू करून आकी-आबा, शाळा असे लिहिणाऱ्या छोट्या मुलाचे म्हणजेच विजय वडवेराव यांच्या बालपणीचे आहे. अतिशय सुंदर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार सर यांनी चित्रित केले असून प्रकाशन परीस पब्लिकेशन पुणे यांनी केले आहे. जबरदस्त मुखपृष्ठ व उत्कृष्ट बांधणी असणाऱ्या या पुस्तकाची प्रथमावृत्ती २८ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित झाली. या आत्मकथनाचे मूल्य केवळ ४०० रुपये असून यातील जिद्द व संघर्ष प्रत्येक मालकाला प्रेरणा देणारी आहे.
        आजच्या काळातील कवी,लेखक, संगीतकार, गीतकार, गझलकार,शिक्षक, एक बाप,एक मुलगा अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या विजय वडवेराव यांना आज सगळे जण ओळखतात पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी खाल्लेल्या खस्ता, त्यांची उपासमार, त्यांची गरिबी, त्यांचा संघर्ष प्रत्येक बालकाला प्रेरणादायी टॉनिक आहे. या पुस्तकाला प्रस्तावना म्हणजे लेखकाचे बाबा यांचा फोटो तर शुभेच्छा आमदार अमोल मिटकरी साहेबांच्या, तसेच महापौर मुरलीधर ओहोळ साहेब यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. तसेच विशालराजे बोरे वृत्तप्रतिनिधी, मुंबई दूरदर्शन यांच्याही शुभेच्छारुपी आशीर्वाद लाभला आहे. मलपृष्ठावर जन्मदात्या आकीने पाठराखण केली आहे. अगदी तिच्याच बोलीभाषेत तिच्याच लिपीमध्ये जगातली सर्वात ग्रेट लिपी आकीची  लाभणं हे सुद्धा इजूचं मोठे भाग्यच आहे.
        ज्या ठिकाणी देशातील पहिली मुलींच्या शाळेची सुरुवात झाली. ज्या फुले दाम्पत्यांने फुले असूनही काटे वेचिले आयुष्यभर. अशा सावित्री ज्योतिबाची शाळा ज्या वाड्यात भरत होती तो वाडा म्हणजे भिडे वाडा. आज समाजाकडून, शासनाकडून दुर्लक्षित झालेला होता. भिडेवाड्याची आत्मकथा... 'भिडे वाडा बोलला' या कवितेच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे भिडे वाड्याची स्वच्छता करणारे आज भिडेवाडाकार म्हणून ओळखले जातात. विजय वडवेराव यांचे यापूर्वीचे 'वेशीवरचा दगड' (कवितासंग्रह) चंद्रही पेटेल, अक्षरबाग मधाळी(गझलसंग्रह) असे 2 गझलसंग्रह, बाभळीचा काटा (कवितासंग्रह )असे एकूण चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रत्येक पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार साहित्य निर्माण करून विजय वडवेराव हे  साहित्यशिल्पकार ठरले आहेत.
           कवी विजय वडवेराव यांचे कुटुंब मूळ मराठवाड्यातल्या धाराशिव( उस्मानाबाद) जिल्ह्यातील मसला खुर्द गावचे आहेत.ज्या मातीने लेखकाच्या वडिलांना पोसले त्याच मातीचा गंध त्यांच्या प्रत्येक शब्दांला आहे. दुष्काळामुळे वडवेरावांचं कुटुंब उपजीविका भागविण्यासाठी पुण्याला स्थाईक झाले.इजू वर उत्तम संस्कार करणारी त्याची आकीआबासोबत होते. संस्काराचं पांघरून, गरिबीचं अंथरूण, घरात खाणारी तोंडं जास्त आणि कमावणारे हात म्हणजे इजूचे बाबा व आकी काबाडकष्ट करून, रक्ताचे पाणी करून इजूला घडवलं. कापडात बांधून नेलेली चतकोर भाकर शाळेत इतर मुलं हसू नये म्हणून मुलांपासून दूर जाऊन मिरचीचा ठेचा व भाकर खाणारा आहे.जो गरिबी पुढे कधीच हतबल झाला नाही, कधी वाम मार्गाने गेला नाही, हे आजच्या इजूचं फलित आहे.
          लेखकांनी इजू या आत्मकथनात गावाकडची साधी सोपी सरळ बोलीभाषा वापरल्यामुळे इजू हे आत्मकथन वाचताना थेट काळजाला भिडते आणि डोळ्यातून अश्रू  तराळते. पण प्रत्येक शब्द न् शब्द काळजाला जाऊन भिडतो त्यामुळे प्रत्येक भाग वाचकाला वाचण्याची उत्कंठा वाढवून ठेवतो.विजू जणूकाही आपल्या समोरच दिसतो. त्याचं बालपण,त्याचं तरुणपण, त्यांनी केलेली कष्टाची कामं, साक्षात डोळ्यांसमोर एखाद्या पिक्चर प्रमाणे चित्र उभे राहते.खरतर इजू वर एखादा पिक्चर व्हायला पाहिजे. तसं झालं तर तीस वर्षाचा प्रवास तीन तासात बसवणं अवघडच पण चित्ररूपाने जर प्रदर्शित झाला तर सर्वात जास्त आनंद मलाही होईल. कारण वाचताना मला त्याचा अनुभव आला आहे. विजू वाचून जेवढं वाचकाचं मन हळहळतं, कसं कळवळतं असेल? याची कल्पनाच करायला नको.
                बालपणी मूल जेंव्हा शाळेत जाते.तेंव्हा ते पार गांगरून जाते. त्याला मायेचा आधार आवश्यक असतो. लोकरे मॅडमचा प्रेमळ स्वभाव इजूला खूप आवडतो. कधीकधी तर आकीच्या रूपातच त्यांना पाहतो.इजूचे बालपण, बालपणीचे शिक्षक, मित्र, सवंगडी, शाळेच्या समोर पेरू विकणाऱ्या आजी, कॉलेज, नातीगोती,इजूची शाळा आणि तिचा हात धरून चाललेली गरिबी, संकटाला न घाबरणारी आकी, काबाडकष्ट करणारा आबा, परिस्थितीवर मात करत संघर्ष करणारा इजू.प्रत्येक भाग वाचून इजूच्या वेदना, कष्ट, दुःख, हाल-अपेष्टा इजूचं मन मारुन जगणं. मरण यातना भोगल्या सारखंच जीनं वाचून माणसाला माणुसकी कळते. गरिबी काय असते ते समजते. गरिबीचे चटके सोसणाऱ्या इजू आकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करतो आणि शेवटी सरकारी नोकरीला लागतो. प्रथम नियुक्ती शिक्षकांची म्हणून जेव्हा बीड जिल्ह्यात रुजू होतो तेंव्हा जातीपातीचा राजकारणावरून इजूला त्रास लोकशाहीत संविधानाची मान मर्यादा बाजूला ठेवते. शेवटी तिथून राजीनामा देऊन पुणे जिल्ह्यात जॉईन होतो.एक वेळ फाटकी चड्डी घालून शाळेत जाणारा इजू अंगात शाळेचा ड्रेस ही फुलं असताना भावाचा शर्ट अर्ध्या रस्त्यात ाण्यात बुचकळून अर्ध ओला अंगात घालत पळत शाळेला जाणारा इजू आजच्या अभ्यास न करणाऱ्या,बापाच्या जीवावर बुलेट घेऊन फिरणाऱ्या मुलांना चुंबकाच्या दिशादर्शक काट्याप्रमाणे दिशादर्शक ठरतो. आज आपण पाहतो आई वडील घरात अडचण नको म्हणून वृद्धाश्रमात आई-वडील नेऊन ठेवणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं,इजूचं आकी आबावरचं प्रेम मानवाच्या मेंदूतल्या मुंग्या जाळणारं आहे.
          कॉलेज वयातली मुलं अनेक रंगीबेरंगी कपडे घालून स्वप्नांच्या दुनियेत माय -बापाच्या जीवावर उड्या मारत बुलेट गाडीवरून फिरणाऱ्या मुलांच्या घोळक्यात इजू उन्हाळ्याच्या सुट्टीत अंगभर कामाला जाऊन दोन पैसे कमावणारा स्वाभीमानाने ताठ जीवन जगणारा आहे. पण कधी कोणाकडे लाचारीने भीक मागितली नाही ना कधी गैर काम केले नाही. आज त्याच इजूने मान मर्यादा एक आदर्श शिक्षक, गझलकार,संगीतकार, गायक, कवी, लेखक अशा अनेक भूमिकेत आहे.जो आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे.एका कष्टकरी मजुरांच्या मुलांनं ज्या दिवशी नवीन कार घेतली. त्या दिवशी आकी दहा- दहा किलोमीटर पायी पायपीट करणाऱ्या आकीला इजून आपल्या कारमध्ये बसवलं. असा संस्कारी पुत्र फक्त स्वतःसाठी न जगता आजूबाजूच्या,परिस्थितीने हतबल झालेल्या अनेक मुलांना मदतीचा हात देतो. इतर इजूना मदत करण्यासाठी आव्हान करतो. आज या इजू ला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले पण ज्या इजूनी भोगलेले गरिबी,कष्ट, दुःख, वेदना तसूभरही कमी न होता इजूच्या रूपात आत्मकथन तयार झालं. आत्मकथन लिहीताना इजूला असह्य यातना होत असल्या तरी इंगळी डसल्याप्रमाणं इजूने झेलत सहन करत आज खंबीरपणाने इजू आत्मकथन जगासमोर ठेवलं.
           खरंच आजच्या काळातील तरुणांना जे व्यसनाच्या आहारी गेले अशा तरुणांना प्रेरणा देऊन जाणार आत्मकथन आहे. अनेक इजू वर प्रकाश टाकणारे आत्मकथन सर्वांनी आवर्जून वाचावे असेच आहे.
            लेखक/ कवी /विजय वडवेराव यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .....!!

इजू खरेदीसाठी संपर्क क्रमांक.9075159142

समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
कु.मीनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद शाळा कोकलगाव
तालुका- जिल्हा वाशिम
पीन ४४४५०५
मो.9767663257

Saturday, 20 March 2021

बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे 'माझे गाणे आनंदाचे'

 बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा बालकवितासंग्रह म्हणजे-'माझे गाणे आनंदाचे'

        लहान मुलांना गाणी, गोष्टी आणि खेळ खूप आवडतात. अगदी बाळं लहान असल्यापासून आई बाळाला आपल्या मांडीवर घेऊन अंगाई म्हणत असते. त्यामुळे बाळ मांडीवर झोपी जाते. एखादं मूल रडत असेल तर त्याच्या समोर कोणी गाणं म्हटलं तर मूल लगेचच रडायचे थांबते. गाण्याकडे लक्ष केंद्रित होते. बोबड्या स्वरात अंगणवाडीत बडबड गीत म्हणणाऱ्या बालकांना खूप छान छान गाणी येतात. त्यातल्या त्यात प्राणी-पक्ष्यांचे जास्त आकर्षण असते. प्राणी-पक्षांवरचे गीत लगेचच तोंडपाठ होतात. अशाच गीतांचा खजिना म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कवी डॉ. कैलास दौंड यांचा काव्यसंग्रह 'माझे गाणे आनंदाचे' हा बालकविता संग्रह नुकताच वाचनात आला. या बालकाव्य संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर, देखणे व बोलक्या स्वरूपाचे आहे.आनंदाने नाचणारी, बागडणारी मुलांचे चित्र सुरेखपणे धर्मराज आव्हाड सर यांनी रेखाटले आहेत. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अनुराधा प्रकाशन पैठण, औरंगाबाद यांनी केले असून पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड,मुंबई यांनी केली आहे. या संग्रहाची प्रथम आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२० ला म्हणजे बालदिनी झाले असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ पन्नास रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता बालकांना वाचनाची गोडी लावणा-या आहेत.
           कवी डॉ. कैलास दौंड यांनी आजवर मोठ्यांसाठी ललित,गद्य ,कादंबरी,कथा असं खूप लिहिलं यांची बरीच साहित्यसंपदा आहे. ४ काव्यसंग्रह, ३ कादंबऱ्या, १ ललित लेखसंग्रह, १ बालकाव्यसंग्रह,१ बालकथासंग्रह अशी एकूण त्यांची ११ पुस्तके प्रकाशित आहेत. पण बालकांसाठी मात्र त्यांचे एकही पुस्तक नव्हतं.पण बाल कविता लिहिलेल्या होत्या त्यामुळे 'माझे गाणे आनंदाचे' हा बालकवितासंग्रह बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा व बालकांना वाचनाची गोडी निर्माण करणारा आहे.
         विद्यार्थ्यांना आवडणारे माळरान, डोंगर, फुले, परी, पाऊस, पक्षी,सूर्योदय, स्वच्छता, आभाळ, माझे गाव, स्वप्नातील शाळा, गट्टी फू, थोडे फिरायला जाऊ, माझे आनंदाचे गाणे, शिवाशिवीचा खेळ इत्यादी बालकविता बालकांच्या नाजूक अंतर्मनाला हळुवारपणे स्पर्श करणाऱ्या बालकांचे मन गुंतविणा-या वाचनप्रिय आहेत. त्यात प्रत्येक कवितांमध्ये सुंदर सुंदर चित्रे रेखाटली असल्याने बालकांचे देहभान विसरल्याशिवाय राहणार नाही.

                 झाली सकाळ 
                 पडलं ऊन 
                 आळस गाणं
                  जाऊ द्या जुणं
                  मोकळं रानं
                  दूरच दूर 
                  पाखरं गाणं
                  ऐकूया सूर
                  सोन्याचं ऊन
                  आलया दारी 
                  घाम गाळून
                   करू न्याहरी...!!

         वरील ओळीतून अगदी साध्या शब्दांत पंचाक्षरी मध्ये केलेली दौंड यांची कविता बालकांना साद देऊन जाते. खूप काही शिकवून जाते. सकाळी पडलेलं कोवळं ऊन आळस झटकून काढायला शिकवते. आकाशाचे, सूर्याचे निरीक्षण करायला शिकवते. मोकळं रान दूरच दूर म्हणजे पहाटेच्या समयी मोकळ्या रानी पक्षांची गाणी,पक्षांचा आवाज, चिमण्यांचा चिवचिवाट,पोपटी मैना,कोकीळेची मंजुळ गाणी, कावळ्याची कावकाव इत्यादी नादमयी सूर बालकांना ऐकायला मिळते. सोन्यासारखं ऊन दारी आल्यावर माणसाने कामाला लागलं पाहिजे, खूप कष्ट केले पाहिजे.घाम गाळलं पाहिजे.मगच न्याहारी म्हणजे सकाळचा नाष्टा केला पाहिजे अशी शिकवण देणारी कविता सानथोरांसह मनाला भावते.
        
        चाफ्याचे झाडं वाट पाहुन थकली 
        पूजेला फुलं त्यानं खाली टाकली.

            वरील ओळींमधून निसर्गाची अदभूत किमया, निसर्गसौंदर्य, डॉ. कैलास दौंड जवळून ओळख करून देतात. सोबतीला चित्र असल्यामुळे कविता आणखीन खुलल्या आहेत. कवी कैलास दौंड यांच्या प्रत्येक कवितेतून निसर्गसौंदर्य झऱ्याप्रमाणे खळखळून वाहत आहे. चाफ्याच्या झाडाला आलेला बहर वाट पाहून फुले थकले आणि सकाळी पूजेसाठी खाली टाकली.बहुतांश फुले सकाळी उगवतात. सकाळी सकाळी आई आपल्या बाळाला उठवायला येते. तेंव्हा आईचा स्पर्श बालकांना मोरपिसासारखा वाटतो. असं प्रत्येक बालकांच्या ठायी असलेले भावना कवी डॉ.कैलास दौंड अगदी सराईतपणे मनाने बालक होऊनच लिहीत आहेत. असा भास झाल्याशिवाय राहत नाही.

            गच्चीवर जेव्हा झोपली मुलं 
           आकाश अलगद खाली आलं 
           अनुभवविश्व मग झालं खुलं 
            चांदण्यांची झाली मोहक फुलं
            ऐकून मुले पेंगू लागली 
             नक्षत्र नावे सांगू लागली 
             गाव शहर की जणू बेट दिसतं 
             आकाश किती मोठ्ठं असतं
             मात्र प्रत्येक रात्री भासतं नवं
             रोज निरखून बघायला हवं...!!

          रात्रीला मूल अंगणात किंवा गच्चीवर झोपले की त्यांना खुलं आकाश खाली आल्यासारखं वाटतं अनोखं विश्व त्यांच्यासमोर खुलं होतं. संपूर्ण आकाश चांदण्यांनी भरलेलं पाहून बाल मनाला आनंद होतो. आकाशाकडे,चंद्राकडे बोट दाखवून बाळं खुणावत असते. चांदण्या जणू त्याला फुलासारख्या वाटायला लागतात. पण ही अजब दुनिया शहरातल्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या बालकांना पाहायला मिळत नाही कारण फ्लॅटमध्ये चार भिंतीच्या आतच विश्व असतं. बालपणीची खरी मजा ग्रामीण भागातच. चांदण्यांनी आकाश जणू बेट दिसतं आणि मोठ्ठं वाटायला लागतं.प्रत्येक रात्री नवीनच दिसतं पण त्यासाठी रोज रात्री आकाश निरखून बघायला हवं असं कवीमनाला वाटते.
           लहान बालकांना आई-बाबा इतकेच आजी-आजोबा प्रिय असतात. आजी आजोबा त्यांना खूप आवडतात कारण सर्वात जास्त लाड आजी-आजोबा करतात. आजी आजोबा छान छान गोष्टी सांगतात. आजी छान छान गाणी म्हणते. बोटाला धरून शाळेत नेते. म्हणून तर म्हणतात 'बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' बालपणीचे खेळ खूप भन्नाट असतात.लहान मुलांचे रुसणे, फुगणे सुद्धा खूप छान असते. प्रत्येकाला आपलं बालपण आठवायला लागतो आणि नकळत 'माझे गाणे आनंदाचे' हे बालकाव्य वाचल्यावर वाचक ही बालवयातच गुंतत जातो. बालपणीच्या आठवणींना नवीन उजाळा मिळतो म्हणून प्रत्येक कविता आनंदाची आहे.उत्साहाची आहे.
          कवी डॉ. कैलास दौंड यांची बालकाव्यप्रतिभा कांही औरच आहे. एका वेगळ्या शैलीची आहे. कुठल्याही अलंकारिक भाषेचा वापर न करता, सरळ साधी भाषा, भाषेमध्ये भरलेले निसर्गसौंदर्य, बालकांचे भावविश्व, बालकांच्या बालविश्वाशी संबंधित कवितेनुसार रेखाटलेली सुरेख चित्रे, भाषेची मधुरता,आपुलकी भाव, बालकांचे गाव, माती,इवले इवले फुलं, फुलपाखरं, सर्व पक्षी, रंगांची ओळख,आकाश निरीक्षण,पाऊस, वारा,गारा,कागदाच्या होड्या,खेळ अगदी मोजक्या शब्दांत बालमनाला पेलेल, आवडेल अशा शब्दांमध्ये व्यक्त होण्याची कला डॉ. कैलास दौंड यांना निसर्गात:च मिळाली आहे. फक्त प्रत्येक पालकांनी अशी वाचन प्रिय असणारी पुस्तक आपल्या बालकांना देऊन संधीच सोनं करावं इतकच.
       कवी कैलास दौंड यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!

समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता. जि. वाशिम
मो.9767663257