*मूल्यवर्धनने जाणिव-माझ्या जबाबदा-यांची*
मूल्यवर्धन हा विषय जितका महत्वाचा आहेत तितकाच फायद्याचा सुद्धा आहे.आज प्रत्येक शाळेमध्ये मुल्य रूजवण्यांचे कामं प्रत्येक शिक्षक करत आहे.त्याचा परिणाम खूप चांगला विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.बालवयातच योग्य ते संस्कार रूजवण्याची खरी गरज आहे...मूल्य हे रूजवावी लागतात...एखाद्या विद्यार्थ्यांने जर चोरी केली त्याला चोरी करू नको म्हणून सांगत बसण्यापेक्षा चोरी करणं योग्य की अयोग्य हे समजून सांगायला हवे.त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन हा उपक्रम जाणिवपूर्वक दिल्यामुळे शिक्षकांना सुध्दा एक दिशा मिळाली आहे.प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकांनुसार वेगवेगळे उपक्रम या एकाच पुस्तिकेत आढळून येतात.नवनवीन गोष्टी वाचून त्यावर सकारात्मक विचार करायला लावणारी प्रश्न ही खरोखरच विचार करायला लावणारी आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य विचार करण्याची सवय लागते.
मूल्यवर्धनने जाणिव माझ्या जबाबदारीची या विषयानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदा-या समजू लागल्या आहेत...मतदान करणे ही एक जबाबदारी आहे.ते समजून देण्यासाठी वर्गस्तरावर वर्गमंत्रीमंडळ निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली.त्यासाठी निवडणूक पारदर्शक पध्तीने पार पडण्यासाठी मोठ्या माणसांचे मतदान कसे असते हे समजण्यासाठी शाळेत प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली.त्यात मंत्रिमंडळासाठी इच्छूक उमेदवारांची नांवे फळ्यावर लिहीण्यात आली.जसे वर्गमंत्री, स्वच्छतामंत्री,शिक्षणमंत्री, शिस्तमंत्री, आरोग्यमंत्री, पर्यावरण मंत्री इ.पदासाठी अर्ज मागवण्यात आली.पुर्ण वर्गासमोर निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या मतदारांची नांवे लिहीण्यात आली.मतदान करण्यासाठी वर्ग खोलीचे नियोजन करून मतदान पेटी तयार करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना रांगेत येऊन,हाताला शाई लावायच्या टेबलजवळ येऊन थांबत असे हाताला शाई लावल्यानंतरच पुढच्या टेबलावर एक उंच रिकामा खोका मतदाराच्या नावासमोर टीक मार्क करण्यासाठी ठेवला होता. तिथे टीकमार्क करूनच चिठ्ठीची घडी घालून मतदान पेटीमध्ये चिठ्ठी टाकायची.असे करत संपूर्ण वर्गाचे मतदान झाल्यावर इतर विद्यार्थ्यांची मदत घेवून.इयत्ता चौथीचे विद्यार्थी मतमोजणी करत त्यांचे मत फळ्यासमोरील नावासमोर लिहीत असत.पुर्ण प्रक्रीया पार पडल्यानंतर ज्याला सर्वात जास्त मत पडले तो वर्गप्रमुख झाला...प्रत्येक दोन उमेदवारामधून चुरशीचा सामना करत ज्याला जास्त मत तो त्या त्या मंत्रीपदासाठी मुख्य व उप अशी निवड प्रक्रिया खूप पारदर्शक पध्तीने पार पडली.
मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष राहिल्यामुळे लोकशाही पध्दतीने कसे मतदान करतात याची कल्पना विद्यार्थ्यांना झाली.विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली.नागरिक शास्त्र व माझी जबाबदारी यांची ओळख नव्याने झाली.
नियम पाळूया...शाळेचे नियम या इयत्ता पहिलीच्या मूल्यवर्धन गीतामधून शाळेचे व स्वयंशिस्तीचे नियम गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रूजले आहेत.हे गीत परिपाठाच्या वेळी दररोज घेत असल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झालेला दिसून येत आहे.पुर्वी कोणाचा वाढदिवस असला की शाळेच्या मैदानात कितीही सांगून चाॅकलेटची कागदं ग्राउंड वर पडलेली दिसत होती.आता या गीतामुळे एकही कागद मैदानावर दिसत नाही.एकही विद्यार्थी शाळेच्या गणवेशाशिवाय येत नाही....
वर्ग आपुला स्वच्छ ठेवू या
घालूनी गणवेश शाळेत येवू या
मित्राच्या सोबत मैत्री टिकवू या
नियम पाळू या ...आपण नियम पाळूया
शाळेचे सारे आपण नियम पाळूया
या ओळीमुळे शाळा स्वच्छ, दप्तर स्वच्छ राहायला लागले...जे कामं हजार वेळा सांगून होत नव्हते ते फक्त या गीतामुळे झाले.आणि आपला वर्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेली...आणि ती मूल्य आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये रूजली गेली आहेत....
*शब्दांकन-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव*
*केंद्रशाळा-तोंडगाव*
*ता.जि.वाशिम....*
*पीन -444505*
No comments:
Post a Comment