Monday, 9 December 2019

तीन शब्दांवरून गोष्ट तयार करणे....

 Date: 9 Dec 2019
    आजचा उपक्रम- तीन शब्दावरुन गोष्ट तयार करणे.....
       *सज्जन माणूस,चोर,संत*

        एका गावात  एक सज्जन माणूस रहात होता. तो खूप साधा निर्मळ मनाचा होता. कसल्याही परिस्थितीत सत्याने वागणारा असा तो सज्जन माणूस होता. एकेदिवशी त्या माणसाच्या घरी एका रात्री एक चोर घरात शिरतो तेवढ्यात त्या माणसाला जाग येते... चोर त्याच्या गळ्याला सुरी लावतो. आणि चोर धमकावतो माझं सोनं व्यवस्थित ठेव म्हणून एक सोन्याचा गाठोडं त्या सज्जन माणसाकडे देतो माझ्यामागे पोलीस लागले आहेत. मी काही दिवसाने येऊन हे सोनं परत घेऊन जातो असे तो चोर सजनाला बजावतो सज्जन फार घाबरलेला असतो त्यामुळे त्याचं सोन्याचा गाठोडं गपचूप ठेवून घेतो दोन महिने झाले चार महिने झाले सहा महिने झाले तरी चोर काही येत नाही. मग ही गोष्ट सज्जन माणूस एका संताला सांगतो काही दिवसांनी चोर सज्जन माणसाच्या घरी येतो. तोपर्यंत सज्जन माणसाने सोन्याचा गाठोडं त्या संताकडे सुखरूप ठेवण्यासाठी नेहून ठेवलेलं असतं. सज्जन माणूस खूप घाबरतो चोराला पाहून आणि एकदम चोराला म्हणतो मी तुमच्या सोन्याला हात सुद्धा लावलेला नाहीये चला आपण महाराजांकडे जाऊ या आणि त्यांच्याकडून सोनं तुम्हाला घेऊन मी देतो असं म्हणून सज्जन व चोर संताकडे  निघतात. संत महाराजा कडे गेल्यानंतर संत चोराला विचारतात का रे बाबा तू इतके दिवस कुठे गेला होता का आला नाहीस? चोर महाराजाला सांगतो की महाराज महाराज माझी मुलगी खूप आजारी पडली होती आणि म्हणून मी लवकर येऊ शकलो नाही. मी जेवढं चोरून धन जमा केलो होतो. ते सगळं दवाखान्यासाठी खर्च झालंय असं चोर संताला सांगतो. संत चोराला म्हणतात हे बघ गड्या ज्या हाताने तू चोरी केलीस त्या हातात हे फुकटचं धन कसं राहणार? चोर आचंबित होतो म्हणजे म्हणजे काय तुम्हांला काय म्हणायचं आहे असं चोर संताला विचारतो. तेवढ्यात संत चोराला म्हणतात "जैसी करणी वैसी भरणे"  म्हणजे काय असं चोर संताना विचारतो. संत म्हणतात अरे फुकटंचं तू लोकांचं धन,पैसा अडका चोरलं म्हणून तुझ्या जवळ ते टिकलं नाही जे कष्टाच असतं तेच टिकतं.... आणि त्यावर चोर मग विचार करू लागला चोराला ही खरच वाटलं कारण त्यांनी आत्तापर्यंत जेवढं कमावलं होतं ते सर्वच्या सर्व धन दवाखान्याच्या खर्चासाठी गेलं... चोर विचार करू लागला आणि महाराजांना म्हणाला यापुढे मी कधीही चोरी करणार नाही... सज्जन माणसाला खूप आनंद झाला व संतांना सुद्धा खूप आनंद झाला संतांनी जसा उद्देश केला तसा त्या चोरांनी आईला आणि त्या चोरांमध्ये परिवर्तन झाले. सोन्याने भरलेली थैली चोरांनी संतांच्या चरणी ठेवली आणि म्हणाला महाराज या सोन्याचं काय करायचे आहे ते करा हे धन मला आता नको आहे. संत म्हणाले मलासुद्धा कसले फुकटचे धन नको आहे आणि त्यावर चोरांनी त्या गावांमध्ये एक छान मंदिर बांधले व्यायाम शाळा काढली. मुलांसाठी वाचनालय सुरु केले. आणि चोराचा एक चांगला सज्जन माणूस झाला....

    *तात्पर्य:  चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलं की वाईट माणसांमध्ये सुद्धा बदल होतो...*

*लेखिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*


No comments:

Post a Comment