Sunday, 3 February 2019

शिवकाव्य

*विषय-शिवकाव्य*

छत्रपती  शिवाजीचा
जन्म झाला शिवनेरी 
सन सोळाशे हो तीस
एकोणीस    फेब्रुवारी....

शिवछत्रपती     राजा
थोर जिजाऊ माऊली
संस्काराचा लेप लावी
शिवबाची हो सावली...

कुशीतून     उगवला
तळपता  वीर   तारा
फुटे  घाम   शत्रूलाही
नाही  शत्रूसही  थारा...

राम आणि कृष्ण सांगे
गोष्टी छान जिजामाता
न्याय  अन्याय  शिकवू
जगी   श्रेष्ठ    वीरमाता....

युध्दनिती  शिकवली
हाती   दिली तलवार
बालपणी    थरारली
तळपती      तलवार....

कर     तलवारबाजी
सपासप   वार   कर
घोड्यावर स्वार होऊ
चढू  लागे   झाडावर....

दांडपट्टा फिरू लागे
लांब जाई भालाफेक
एक  एक  धडा  घेई
माय जिजाऊचा लेक...

स्वराज्याचं स्वप्न पाही
राजमाता जिजाबाई
शूरवीर    पुरूषांच्या
नांवे गाजे जिजाआई...

स्वराज्याची हो प्रतिज्ञा
रायरेश्वरात         घेई
मुठभर   मावळ्यांना
धडे  स्वराज्याचे  देई....

शत्रू    घाबरत    असे
नांव   ऐकता शिवाजी
वीर   मावळे    सगळे
लावी जिवाचीच बाजी...

अफजलखान वीडा
शिवाजीचा उचलला
शिवबाने कोथळाच
वाघनखे ने फाडला...

कोसळला  शत्रू  खान
उडे   शत्रू   दाणादाण
शाहिस्तेखानच   जाई
घेण्या शिवबाची जान...

बोटे कापली खानाची
झोपेतही      बडबडू
धाक खावून शिवाचा
खान लागला हो रडू ...

पेटा-यात    बसूनहो
गेले  होते   शिवराय
तुरी  दिल्या  हातावर
निसटले     शिवराय...

एक   एक   गड    घेत
युध्द   करत   शिवाजी
स्वराज्यासाठीच लावी
बाजी लावी हो तानाजी....

गड  आला  पण  सिंह
धारातिर्थी   रे   पडला
एक   एक   मावळ्याने
इतिहास      घडवला.....

सिद्दी   पाठलाग   करी
वेळ आली आणिबाणी
शिवाजीची    घालमेल
बाजीप्रभु   ओळखली....

खिंड  बाजीने   लढली
पाहुनच   स्वामीभक्ती
आले  भरून  मन   रे
कांही चालेना हो शक्ती...

स्वराज्याचे  ध्येय  होते
शिवाजीला   गाठायचे
जिवावर   आले   होते
बाजीप्रभु    सोडायचे....

सुरू    झाली   लगेचच
झुंज  खिंडीत  शर्थीची
पराक्रमी      बाजीप्रभु
झाली कोंडी हो शत्रूची...

शत्रूचीही    घामाघूम
घोडखिंड    लढवली
झाली पावनखिंड हो
तोफ  मग  कडाडली....

स्वामीभक्त बाजीप्रभु
धारातिर्थी  कोसळला
इतिहास   मावळ्यांनी
शिवबाच्या   घडविला.....

राजधानी      रायगड
एक   अपूर्व   सोहळा
शिवबाच्या राज्यासाठी
लढे   एकेक   मावळा.....

सर्व  धर्मांना  प्रजेला
न्याय व सुख देणारा
स्वराज्याचे स्वप्न स्वतः
पुर्णपणे      झटणारा....

असा  शूरवीर   राजा
होता न्यायी दिलदार
भल्याभल्या शत्रूनींही
होती  घेतली  माघार....

माझा जाणता राज्याचा
भरे     छान      दरबार
स्वराज्याचं स्वप्न  पाही
घुमे         जयजयकार....

महाराष्ट्र दैवत मानते
करी मानाचा  मुजरा
शिवजयंतीचा   सण
चला करू हो साजरा....

*कवयित्री-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
*मो.9767663257*

No comments:

Post a Comment