Friday, 12 June 2020

मराठी साहित्य मंच ई काव्यसंग्रह जून २०२० अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न ...

मराठी साहित्य मंच ई काव्य संग्रह जून २०२० अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न 

बीड (प्रतिनिधी) ,मराठी साहित्य मंच  ई -काव्य  संग्रह जुन-२०२० मासिक अंक ऑनलाईन प्रकाशन सोहळा 
  सुप्रसिद्ध कवयित्री /लेखिका/तंत्रस्नेही शिक्षिका/ संपादिका व साहित्य क्षेत्रातील कोहिनूर
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
मुळ रहिवासी-धाराशिव उस्मानाबाद
मु.पो.कोकलगाव(कर्मभुमी)
ता.जि.वाशिम
यांच्या शुभहस्ते  ११ जुन २०२० रोजी ११ :११ वाजता अगदी थाटात व उत्साहात  संपन्न झाला ,या वेळी नक्षत्राधीस कवी वादळकार राजेंद्र सोनवणे हे ही समूहात  उपस्थित होते 
काव्य संग्रहाचे संपादक काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
मु.पो.चांदा,ता.नेवासा, जि. अहमदनगर-
(राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित)
यांनी या सोहळ्यास मोलाचे योगदान देऊन सहकार्य केले 
तसेच प्रशासक समितीचे नंदकुमार शेंदरे सर,सौ. शालू विनोद कृपाले मॅडम,विशाल पाटील वेरुळकर यांनी ही विशेष सहकार्य केले 
या अंकात अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक व नवं लेखकांच्या 
कवीता प्रकाशित झाल्या 
  मुख्य संपादक श्री अंगदजी दराडे आणि प्रा. रावसाहेबजी राशिनकर (साहेब) , तसेच प्रशासक समिती आणि संपूर्ण टीम यांनी सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा ई- काव्य संग्रह  तयार केला
यातील सर्व कवीता अगदी आकर्षक,वाचनीय आणि सर्वच विषयांना न्याय देणारा आहे.मुखपृष्ठ तर अगदीच बोलके आहे.या अंकांतील राशिनकर साहेब , मुख्य संपादक अंगद दराडे आणि मिनाक्षीताई यांच्या मनोगताची शब्दगुंफन वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी आहे.काव्यसंग्रह प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच आहे.या काव्यसंग्रहामध्ये आई,पावसाचे रूप,वृक्षतोड, मन,पुन्हा ते दिवस येतील,आमची गरिबी, मुखवटे,शेवटची इच्छा,ढवळ्या पवळ्या, त्याग,माणुसकी ,माझं गाव ,माहेर या आणि अशा इतर एकूण 62 कवितांचा समावेश आहे.
.या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून नवकवी आणि कवयित्रींच्या लेखणीला वाव आणि लेखनाची संधी नक्कीच मिळाली आहे.
 या मध्ये युवा कीर्तनकार गणपत माखने महाराज , प्रा.डॉ.संतोष तागड , गजानन दराडे , मयूर बागूल , जयश्री बापट , भारती सावंत , भाग्यश्री पटारे , हर्षदा वाकचौरे , दिलीप धायगुडे, विक्रांत शेवारे , बाल कवी अनोमा मालसमीदर , अंजु येवले , उषा ढेरे- करपे,पुजा बागुल,श्रद्धा कुलकर्णी, निशा खापरे,योगिता शिरोरे,कल्पना म्हापुसकर,शोभा वागळे, सुचित्रा कुंचमवार यांसह नामवंत कवी-कवयित्रींच्या रचनाचा समावेश आहे 

काव्य संग्रह सोहळा संपन्न होताच अनेक नामवंत साहित्यिकांनी त्यांचे लेखी अभिप्राय समूहात पाठवले 
व काव्यसंग्रहाचे संपादक रावसाहेब राशिनकर व अंगद दराडे यांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले.

Tuesday, 9 June 2020

जननायक शहीद बिरसा मुंडा....

 Date: 6 Jun 2020

*जननायक शहीद बिरसा मुंडा*

     आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी जननायक शहीद बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलीहातू या छोट्याशा खेड्यात १५ नोव्हेंबर१८७५ मध्ये झाला.वडील सुग्ना व आई करमी यांच्या पोटी झाला. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.त्यामुळे बिरसाचा नंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्यांची आत्या दासकिर यांच्या आयुभातू या गावी गेले. बालपणापासूनच अत्यंत हुशार व शिक्षणाची आवड असलेले बिरसा मुंडा होते. बासरी व टुईला वाजविणे नृत्य व नकला करणे, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंद त्यांच्या अंगी होते. जी.सी.एल मिडल स्कूल मधून त्यांनी उच्च माध्यमिक पास केली. मिशनरी आदिवासींना आदिवासी,चोर,डाकू म्हणू लागले. त्यावेळी त्यांना मिशनर्‍यांना खडसावून प्रत्युत्तर दिले व शाळा सोडून दिली त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले.
         बिरसा मुंडा यांचा विवाह हिराबाई यांच्याशी झाला पण पुढे लवकरच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. संगीताबरोबरच नृत्याची आवड बिरसांना होती.  ते उत्तम बासरी वाजवायचे त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला. रानात गुरे चारायला नेत त्यामुळे जंगली वनौषधी बद्दल चांगले ज्ञान बिरसांना होते. आजारग्रस्त लोकांना जडीबुटी औषध तयार करून देऊन त्यांचा आजार त्यांचा बरा करत असत. म्हणून लोक त्यांना भगवान बिरसा मुंडा म्हणू लागले.
         सन १८६९ मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली. सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या जमिनी हडप केल्या. त्याबद्दल आदिवासींनी एकही शब्द न करण्याचे आदेश इंग्रजांनी दिले होते.त्यामुळे आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्ध बिरसा यांनी १८९० मध्ये व्यापक "क्रांती उलगुलान" ची घोषणा केली १८९५ मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले जंगल, जमीन,संपत्ती आमचा अधिकार आहे. यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येऊन लढायचे आव्हान केले. न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतले बिरसा यांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिले. त्यामुळे त्यांना ९ ऑगस्ट १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांना अटक झाली.
           ३० नोव्हेंबर १८९७ ला बिरसा तुरुंगातून बाहेर आले.त्यावेळी आदिवासी समाजाची केविलवाणी परिस्थिती पाहून पुन्हा अन्यायाविरुद्ध पेटून उठले. बिरसा हे उत्तम योद्धा व कुशल प्रशासक होते. १८९८ मध्ये बिरसांनी "डुंबारी बुरुज"  या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली. फादरच्या घरावर हल्ले करायचे ठरवले जानेवारी १९००मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकार्‍याला बिरसा यांच्या हल्ल्याची माहिती मिळाली इंग्रजांनी "डुंबारी बुरुजावर" गोळीबार सुरु केला. आदिवासींनी दगडफेक व धनुष्यबाण करत प्रतिकार केला. या नरसंहारात दोनशेपेक्षा अधिक आदिवासी लोक मारले गेले.इंग्रजांनी बिरसा यांना अटक केले. व तुरुंगात अतोनात छळ केला ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. न्याय व हक्कासाठी लढणारा क्रांती सूर्याचा अंत झाला. अशा या महान शूरवीर क्रांतिकारकाला कोटी कोटी प्रणाम आज ९ जून रोजी  स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

लेखिका/ कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
तालुका जिल्हा वाशिम...

---
ShuusShuus

Monday, 8 June 2020

ललित लेख... "संशयाचे भूत"

 Date: 7 Jun 2020

*संशयाचे भूत*

        सुधाचा चांगला सुखात संसार चालला होता. दोन गोंडस मुले होती. नवरा जॉबला होता. ७० हजार पगार नवऱ्याला होता. नवरा फार दयाळू कनवाळू होता. कोणालाही अडीअडचणीत पटकन मदत करणारा,स्त्रियांचा मान सन्मान, आदर करणारा गावातल्या कोणालाही अडचणीमध्ये मागेपुढे न बघता पटकन मदत करणारा नवरा नशिबाने सुधाला मिळाला होता. पण तेसुद्धा सुधाला आवडायचं नाही. ती नवऱ्याकडे सारखे डोळे वटारून पाहत असायची. मदत करायला माझाच नवरा उरला की काय? यासाठीच माझ्यासोबत लग्न केले की काय ? तडतड करत, त्रागा करून घेत, सुधा पाय आपटत,दात कटकट चावत निघून जायची. तिच्या नवऱ्याचा स्वभाव घरातल्या सर्व मंडळींना ठाऊक होता पण ते सुधाला मान्य नव्हतं ती विनाकारण नव-यावर संशय घ्यायची.
        "संशयाचे भूत" सुधाच्या असं काही मानगुटीवर बसलं होतं की त्याचा इलाज जगातल्या कुठल्याच मांत्रिकाकडे किंवा डॉक्टर कडे नव्हता. सुधा कितीही आदळआपट केली. तरी तिचा नवरा मात्र खूप संयमी व मितभाषी होता. तो अगदी शांतपणे ऐकून घ्यायचा आणि पुढे निघून जायचा. एक दिवस गावातल्या एका बाईचे बँकेचे खाते उघडण्यासाठी सुधाचा नवरा राम बँकेत गेला होता. सोबत बिचारी ती बाई होती तिने खूप गयावया करून तिचं काम करण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे राम त्या बाईला सोबत घेऊन बँकेत गेला होता. बँकेतले काम झाल्यावर राम निघून दुसऱ्या कामाकडे वळला. राम वर लहानपणापासूनच खूप चांगले संस्कार झाले होते.आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या रामला वाटेवर चालता चालता जर कोणी अडचणीत दिसला तर त्याला पटकन मदत करायचा हा रामचा स्वभाव धर्म होता.आणि त्या दिवशीही तसेच झाले त्या बाईचे बॅंकेचे काम केले. आणि पासबुक वर लावण्यासाठी घेतलेला एक फोटो राम कडेच राहिला.रामच्या पाकिटातला तो फोटो सुधाने रात्री घरी आल्यावर पहिला आणि घरात अख्खं कुरुक्षेत्र उभं केलं.जणू महाभारत सुरू झाला आणि सुधा तांडवनृत्य करू लागली.सारं घरं डोक्यावर घेतलं. खूप जोरजोरानं नवऱ्याला भांडू लागली.
        सुधाची वयात आलेली पोरं भिरभिरे सुधाकडे पाहत होती. पण सुधा जास्त शिकलेली नव्हती. आणि समंजसही नव्हती. विनाकारण राम सोबत खूप भांडण केलं आणि तरातरा निघून माहेरी गेली. रामची यात काहीच चूक नव्हती. त्यामुळे राम आपला शांतच बसला होता.कारण रामच्या नजरेत आपण कोणाला मदत करणे हे वाईट नव्हतंच मुळी.सुधा माहेरी राहून राहून किती दिवस राहणार आठ-दहा दिवसात परत घरी आली.पण तिच्या मनातलं संशयाचं भूत कांही निघतच नव्हतं. प्रत्येक गोष्टीला ती संशयाने पाहायची. आता राम सुद्धा तिच्या अशा वागण्याला, बोलण्याला फार कंटाळून गेला होता. रामा जर आनंदी असला तरी सुधारला ते आवडायचं नाही.सुधा नवऱ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची "संशयाचं भूत" लय वाईट.चांगल्या सुखी संसारात विघ्न घालत विष कालवण्याचं काम हे संशयाचे भूत करत असतं. अनेक रोगावर औषध आहे पण संशयी स्वभावाला औषध नाही.  आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुठेही औषध निघाले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुधाच्या आयुष्यात जास्त कटकटी भांडण, आदळ-आपट मुलांकडे लक्ष देणे नको, चांगल्या कांही वाचन नको, किंवा चांगल्या गोष्टींकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोनही राहिला नव्हता.त्यामुळे सुधाची मनस्थिती फार बिघडली होती. सुधाचा नवरा जर छान ड्रेस घातला. दाढी कटिंग केली तरी सुद्धा सुधा त्याच्याकडे संशयाने बघू लागली. हा माझा नवरा आहे आणि मी त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवायचे तर दूरच उलट भांडणाचा सुळसुळाट व्हायचा....कितेकांचे सुखी संसार अशा संशयाने उध्वस्त झाले आहेत.एखादा भुकंप झाला तर त्याचा आवाज होतो.पण मनाच्या भिंतींना तडे गेलेली मात्र अजिबात दिसत नाहीत.
          सुधाचा रात्रंदिवस नवऱ्याबद्दल संशय वाढत चालला होता. तिला सारखं वाटायला लागलं की मी नवऱ्याला आवडतच नाही.नवरा चांगला वागला तरी सुद्धा त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची. त्यात सुधाला एक मैत्रीण मिळाली होती. तीही तशीच त्यात आणखीन भर टाकायची. आणखीन तेल ओतायची. तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करु लागली. सुधाला वाटायचं की हर एक गोष्ट आपल्या मैत्रीला सांगावं पण मैत्रीण उलट सुधाच्या डोक्यात नको ते भरून द्यायची आणि मग परत सुधा आणि राम ची कडाक्याचे भांडण व्हायचे. नवऱ्याचा गरीब स्वभाव बघून निर्व्यसनी सरळ स्वभावाच्या रामला  सुधा सारख्या धमक्या द्यायची. रामला  कांही सुचेनासं झालं... जावे तरी कुठं आणि करावं तरी काय? असा प्रश्न रामला पडला होता. रामला वाटायला लागलं माझं काहीतरी पाप आहे त्यामुळे कमी डोक्याची ही सुधा माझ्या गळ्यात पडली. राहून राहून रामला सारखं पश्र्चाताप व्हायचा. आपण उगाच लग्न केले असे रामला वाटायचे पण सुधाचे "संशयाचं भूत" मात्र काही केल्या उतरत नव्हतं...


लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

Sunday, 31 May 2020

*दानशूर,कर्तृत्वान,कुशल,राज्यकर्ती धाडसी स्त्री-अहिल्याबाई होळकर*

 Date: 30 May 2020

*दानशूर,कर्तृत्वान,कुशल,राज्यकर्ती धाडसी स्त्री-अहिल्याबाई होळकर*

      इतिहासाच्या पानांमध्ये एक सुवर्णाक्षरी पान म्हणजे दानशूर,कर्तुत्वान आणि कुशल राज्यकर्ती स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर होय.त्यांचा जन्म ३१ मे १७२५ अहमदनगर जिल्ह्यातील चौंढी या छोट्याशा गावात झाला.धनगर समाजात जन्माला आलेल्या अहिल्याबाई चे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेरावाशी झाला. त्यांना दोन अपत्ये झाली. मुलगा मालेराव व मुक्ताबाई ही कन्या... खंडेराव यांचा कुंभारी येथे लढाईत मृत्‍यू झाला. अहिल्याबाईंना वयाच्या २८ व्या वर्षी वैधव्याला  सामोरे जावे लागले.प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या पण सासरे मल्हारराव होळकरांनी "प्रजाहितासाठी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य तुम्हाला सांभाळायची आहे" असे म्हणल्यामुळे त्यांचा मान राखला व राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले.मल्हाराव ज्यावेळी मोहिमेवर जात तेव्हा अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोखपणे राखीत असत.
          मल्हाराव होळकर यांना पेशव्याने इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती.दौलतीचा कारभार मोठा होता पण १७६६ मध्ये मल्हाररावांचे निधन झाले.त्यामुळे आलेल्या अहिल्याबाईवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. पुढे २८ वर्षे राज्य कारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला.अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ⇨ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
        अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी ⇨ शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने आहिल्याबाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.
अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
            अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.
             राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या.जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
        आहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
        अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली.अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.
मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते.महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
      अशा महान कर्तबगार धाडसी स्त्रीव्यक्तीमत्वाला मानाचा मुजरा... विनम्र अभिवादन....

लेखिका/कवयित्री
©️®️कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम...

उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहातील तंत्रस्नेही शिक्षिकांनी तयार केलेलीऑनलाइन चाचणी सिरीयल भाग 3

 *उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची चाचणी सिरीयल... work from home ....*
 
🌹 *भाग ३*🌹

*उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची चाचणी सिरीयल... work from home ....*
 
🌹 *भाग ३*🌹

*101) योगिता लोखंडे*

https://forms.gle/u4VrADzJQwd1uydo7

*102)उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/k7hgoswsNXFLAVL26

*103)गायत्री शिंदे*

https://forms.gle/zVNdzcYbxtWaD1G69

*104)उषा ढेरे, बीड*

https://forms.gle/Cp4VNfuKrQ5JSLXs6

*105)Urmila Lasurkar https://forms.gle/atf4bEro7Nya1Vn5A


*106)https://forms.gle/uAgvd6iGnEWtAKPm8

*107)उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/wurYoWwGtKX1HiyS8

*108) मिनाक्षी नागराळे वाशिम*

https://forms.gle/wy2qvaz9KXqJffD57

*109) चंदा श्रीराम वानखडे वाशिम https://forms.gle/nWLsquaLuFHbDYLP8

*110)उषा ढेरे बीड*

https://forms.gle/G279rxnB4CTR5aBh7


*111) मिनाक्षी नागराळे, वाशिम*

https://forms.gle/kwgUdfgYr9JMVRH19

*112)भावना पाटील*
https://forms.gle/ZPTVZCeGAwHbNpLy6

*113)प्रतिभा पगारे*
 
https://forms.gle/dxEcpb2vfPeEpMEn6

*114)हेमा यादव*
https://forms.gle/bgCNdRvjA9JYKX7f9


*115) साधना पवार*
https://forms.gle/u8zJCgfwqCNKXABE6

*116) मीनाक्षी नागराळे, वाशिम*
 *वासाची किंमत-इयत्ता-३री*

https://forms.gle/5vZPYTfG4czUCecy8

*117)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/sgAPLpKfCer4Ry12A

*118) *सोनाली साळुंखे,जळगाव* 
https://forms.gle/YUpaQ2k5A8PtH1jQ6

*119)*हेमा यादव*
https://forms.gle/xKZaKY8A6NmbQqWu8

*120)https://docs.google.com/forms/d/16EKbmJ9hKnxKpGB-54Gk-pH_MUmR_mlMBMTBmUcWJd8/edit संगीता किसन तांबे मुंबई


*121)श्रीमती आम्रपाली टेंकाळे,हिंगोली
https://forms.gle/k8K2gauoA2v4fPbY7


*122)कु.अर्चना वैद्य वाशिम
https://forms.gle/9xRffgr2FPu8cHwg9


*123) मिनाक्षी नागराळे, वाशिम*
http://online.fliphtml5.com/kspr/duyf/

*124)मेघा जाधव, वाशिम*
https://forms.gle/fBB2twBrb7v5EEon8
*125)  मेघा जाधव,वाशिम https://forms.gle/PhTNpVt8riRqhkEP8                 
 *126)देशमुख शोभाताई अहमदनगर* 
 https://forms.gle/bPj2NFCY16NmRgLw7

*127) मिनाक्षी नागराळे वाशिम*

https://forms.gle/iZFnHFbAwUpvL5Kp8

*128)https://forms.gle/q8Z9fkyRSyRLrMWn7
*योगिता लोखंडे जळगाव*

*129)https://forms.gle/PJyq4Ak8QL4YiPvM9
*अनुपमा अरुणकुमार यादव*

*130)https://forms.gle/TmfRb3mhDG2ECtsY6देशमुख शोभाताई अहमदनगर 

*131)उज्ज्वला फटांगरे 
https://docs.google.com/forms/d/1XgrU5-XUb36jB8fz6O_LB0hEDPp1KEc6qDUKoZYUQMk/edit

*132)उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/UmfFB4Kjoqzd7ggV7

*133)मिनाक्षी नागराळे, वाशिम*

https://forms.gle/8CDG8DsRRJ3PjoKR9

*134) उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/9hL1PQALU7CRbFBS8
*135) योगिता लोखंडे जळगाव*
https://forms.gle/oa5mb1PoTW5ZAidF9


*136) उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/! 

137) प्रतिभा पगारे

इयत्ता - ३ री
विषय - भाषा
https://forms.gle/rEEBZgARefCKFnuZ8

138) https://forms.gle/vsFtuYjviMnr8WDY8

Urmila Lasurkar 
Z.P. Primary school Sutarkhede, Taluka: Chandwad, Dist: Nashik.

139:-) *राणी जगदाळे, सातारा* 

https://forms.gle/dCFG82b8GGprXt2X9

140) *yogita lokhande*Jalgaon
https://forms.gle/Ztit6fZXmQgFdj

141) सौ.हेमा यादव
https://forms.gle/Qp91AZ5yiYYDLCRQ8

     १४२)सौ.वैशाली भोईर
https://docs.google.com/forms/d/1P5nCFuG234CZJYm_iEn10CEEJOQWKz51AQ2uqcfKX-A/edit

143)   जयश्री भड, कारंजा https://forms.gle/98mtKxbisYH93b7L8  

144) सुनिता शिरसाठ https://forms.gle/Xoryu9Cx3ChdBGZx9 

(145) वंदना देवकर ,हिंगोली https://forms.gle/tvbL7MAZgEjEsYPw5 

(146)वंदना देवकर(ढोकणे) https://forms.gle/stDNWRSWodoQxqLS7

148)*योगिता लोखंडे जळगाव*
https://forms.gle/XXSDn9viEJkCeUsr7  

(149) श्रीमती वंदना देवकर,ढोकणे ,हिंगोली https://forms.gle/iSyjRotSRzrho8
qw6 

*150)सुनिता शिरसाठ* https://docs.google.com/forms/d/1YRcSaqE2Pa_LC-DSEEXTDj2m4agjXu0P-kLb9wZPDiI/edit