*संशयाचे भूत*
सुधाचा चांगला सुखात संसार चालला होता. दोन गोंडस मुले होती. नवरा जॉबला होता. ७० हजार पगार नवऱ्याला होता. नवरा फार दयाळू कनवाळू होता. कोणालाही अडीअडचणीत पटकन मदत करणारा,स्त्रियांचा मान सन्मान, आदर करणारा गावातल्या कोणालाही अडचणीमध्ये मागेपुढे न बघता पटकन मदत करणारा नवरा नशिबाने सुधाला मिळाला होता. पण तेसुद्धा सुधाला आवडायचं नाही. ती नवऱ्याकडे सारखे डोळे वटारून पाहत असायची. मदत करायला माझाच नवरा उरला की काय? यासाठीच माझ्यासोबत लग्न केले की काय ? तडतड करत, त्रागा करून घेत, सुधा पाय आपटत,दात कटकट चावत निघून जायची. तिच्या नवऱ्याचा स्वभाव घरातल्या सर्व मंडळींना ठाऊक होता पण ते सुधाला मान्य नव्हतं ती विनाकारण नव-यावर संशय घ्यायची.
"संशयाचे भूत" सुधाच्या असं काही मानगुटीवर बसलं होतं की त्याचा इलाज जगातल्या कुठल्याच मांत्रिकाकडे किंवा डॉक्टर कडे नव्हता. सुधा कितीही आदळआपट केली. तरी तिचा नवरा मात्र खूप संयमी व मितभाषी होता. तो अगदी शांतपणे ऐकून घ्यायचा आणि पुढे निघून जायचा. एक दिवस गावातल्या एका बाईचे बँकेचे खाते उघडण्यासाठी सुधाचा नवरा राम बँकेत गेला होता. सोबत बिचारी ती बाई होती तिने खूप गयावया करून तिचं काम करण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे राम त्या बाईला सोबत घेऊन बँकेत गेला होता. बँकेतले काम झाल्यावर राम निघून दुसऱ्या कामाकडे वळला. राम वर लहानपणापासूनच खूप चांगले संस्कार झाले होते.आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या रामला वाटेवर चालता चालता जर कोणी अडचणीत दिसला तर त्याला पटकन मदत करायचा हा रामचा स्वभाव धर्म होता.आणि त्या दिवशीही तसेच झाले त्या बाईचे बॅंकेचे काम केले. आणि पासबुक वर लावण्यासाठी घेतलेला एक फोटो राम कडेच राहिला.रामच्या पाकिटातला तो फोटो सुधाने रात्री घरी आल्यावर पहिला आणि घरात अख्खं कुरुक्षेत्र उभं केलं.जणू महाभारत सुरू झाला आणि सुधा तांडवनृत्य करू लागली.सारं घरं डोक्यावर घेतलं. खूप जोरजोरानं नवऱ्याला भांडू लागली.
सुधाची वयात आलेली पोरं भिरभिरे सुधाकडे पाहत होती. पण सुधा जास्त शिकलेली नव्हती. आणि समंजसही नव्हती. विनाकारण राम सोबत खूप भांडण केलं आणि तरातरा निघून माहेरी गेली. रामची यात काहीच चूक नव्हती. त्यामुळे राम आपला शांतच बसला होता.कारण रामच्या नजरेत आपण कोणाला मदत करणे हे वाईट नव्हतंच मुळी.सुधा माहेरी राहून राहून किती दिवस राहणार आठ-दहा दिवसात परत घरी आली.पण तिच्या मनातलं संशयाचं भूत कांही निघतच नव्हतं. प्रत्येक गोष्टीला ती संशयाने पाहायची. आता राम सुद्धा तिच्या अशा वागण्याला, बोलण्याला फार कंटाळून गेला होता. रामा जर आनंदी असला तरी सुधारला ते आवडायचं नाही.सुधा नवऱ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची "संशयाचं भूत" लय वाईट.चांगल्या सुखी संसारात विघ्न घालत विष कालवण्याचं काम हे संशयाचे भूत करत असतं. अनेक रोगावर औषध आहे पण संशयी स्वभावाला औषध नाही. आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुठेही औषध निघाले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुधाच्या आयुष्यात जास्त कटकटी भांडण, आदळ-आपट मुलांकडे लक्ष देणे नको, चांगल्या कांही वाचन नको, किंवा चांगल्या गोष्टींकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोनही राहिला नव्हता.त्यामुळे सुधाची मनस्थिती फार बिघडली होती. सुधाचा नवरा जर छान ड्रेस घातला. दाढी कटिंग केली तरी सुद्धा सुधा त्याच्याकडे संशयाने बघू लागली. हा माझा नवरा आहे आणि मी त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवायचे तर दूरच उलट भांडणाचा सुळसुळाट व्हायचा....कितेकांचे सुखी संसार अशा संशयाने उध्वस्त झाले आहेत.एखादा भुकंप झाला तर त्याचा आवाज होतो.पण मनाच्या भिंतींना तडे गेलेली मात्र अजिबात दिसत नाहीत.
सुधाचा रात्रंदिवस नवऱ्याबद्दल संशय वाढत चालला होता. तिला सारखं वाटायला लागलं की मी नवऱ्याला आवडतच नाही.नवरा चांगला वागला तरी सुद्धा त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची. त्यात सुधाला एक मैत्रीण मिळाली होती. तीही तशीच त्यात आणखीन भर टाकायची. आणखीन तेल ओतायची. तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करु लागली. सुधाला वाटायचं की हर एक गोष्ट आपल्या मैत्रीला सांगावं पण मैत्रीण उलट सुधाच्या डोक्यात नको ते भरून द्यायची आणि मग परत सुधा आणि राम ची कडाक्याचे भांडण व्हायचे. नवऱ्याचा गरीब स्वभाव बघून निर्व्यसनी सरळ स्वभावाच्या रामला सुधा सारख्या धमक्या द्यायची. रामला कांही सुचेनासं झालं... जावे तरी कुठं आणि करावं तरी काय? असा प्रश्न रामला पडला होता. रामला वाटायला लागलं माझं काहीतरी पाप आहे त्यामुळे कमी डोक्याची ही सुधा माझ्या गळ्यात पडली. राहून राहून रामला सारखं पश्र्चाताप व्हायचा. आपण उगाच लग्न केले असे रामला वाटायचे पण सुधाचे "संशयाचं भूत" मात्र काही केल्या उतरत नव्हतं...
लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.शाळा.कोकलगाव
No comments:
Post a Comment