*संघर्षमय जीवन जगणं सांगणारा कथासंग्रह म्हणजे -खोडा*
वाढती महागाई आ म्हणून तोंड वासत चाललेली, साधारण व गरिबातल्या गरीब माणसाला जीवन जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, नात्या नात्यामधला संपत चालेला जिव्हाळा, बदलत्या काळाबरोबर ग्रामीण आणि शहर यात होत चाललेला अमुलाग्र बदल,बदलती जीवनशैली, त्याचबरोबर हरवत चाललेली माणुसकी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध लेखक श्री उमेश मोहिते सर यांच्या खोडा काव्यसंग्रहातून पहावयास मिळते.
अतिशय सुंदर मुखपृष्ठ असून जीवन जगण्यासाठी स्त्रियांना पडलेली भ्रांत ,आ वासून समोर येत असलेली महागाई, मागासलेपण,फाटक्या संसाराला ठिगळं लावणा-या स्त्रिया, अशा समस्या, त्यात होणारी कुटुंबाची होरपळ, स्त्रियांचे मन हेलावून टाकणारे नाजूक मन, त्यावेळी झालेले घाव वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवले जाते.एक आगळीच ओढ निर्माण करते. लेखक श्री उमेश मोहिते सर यांचा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. अतिशय सोपी, बोलीभाषा वाचकाच्या थेट काळजाला जाऊन भिडल्याशिवाय राहत नाही.
शाळा शिकण्याची अतोनात धडपड असणारी सविता वाढत्या वयात भावनांना आवर घालत आई-वडिलांना शिकण्याची इच्छा व्यक्त करते आणि आई वडील दोघेही सविताला शिकण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेल्या लग्नाच्या स्थळाला नकार देतात. नकळत प्रेमात पडू पाहणाऱ्या मोहनला योग्य 'निर्णय' सांगणारी सविता वयाच्या उंबरठ्यावर असताना देखील स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करीत तिची शिकण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्नाला नकार देणारी निर्णय कथा आजच्या काळात पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.
काबाड कष्ट करणाऱ्या सारजाबाईच्या जीवनात संकटावर संकटे येतात.अवकाळी निसर्गाच्या कोपानं सारजाबाईच पार कंबरडच मोडून जातं. निसर्ग गरिबांची खूप परीक्षा पाहतो. परिस्थिती पुढे मनुष्य हातबल होतो. अवकाळी या कथेतून लेखक उमेश मोहिते सरांनी काळीज पिळवटून टाकणारी ही कथा वाचकाच्या थेट काळजाला जाऊन भिडते. कोरोना काळात लॉकडाऊन लागलं आणि अख्ख जग जाग्यावर थांबलं. हे सर्व धंदे बंद पडले असताना सामान्य माणसाला जीवन जगण्याची भ्रांत पडली होती. तेंव्हा दोन वेळचं पोटभर जेवण मिळण्यासाठी कावेरीची चाललेली धडपड तिला सहकार्य करणाऱ्या गोदा काकू आज एकमेकीवर जळफळाट करणाऱ्या स्त्रियांना जबरदस्त चपराकच हाणली आहे. ती होरपळ या कथेतून आजच्या काळात एखाद्याचा धंदा चांगला चालत असेल तर तो दुसऱ्याला बघवतच नाही. पण त्याच्या धंद्याची माहिती दुसऱ्याला तो देतच नाही हे जरी वास्तव असले तरी होरपळ या कथेतून गोदा काकूंनी कावेरीला केलेली मदत, सहकार्य वाखाण्याजोगेच आहे. लॉकडाऊनच्या काळात कावेरी स्वतःच्या आईच्या अंतिम दर्शनाला पण जाऊ शकत नाही. कोरोनामुळे सर्वत्र संचार बंदी असल्याने कावेरीच्या होणा-या जीवाची घालमेल आईचं शेवटचं तोंड पण पाहता येणार नाही. याची कावेरीला होणारी खंत मानवी मनाला अस्वस्थ करणारी आहे.
लेकीला नोकरदार नवरा करावा म्हणून खस्ता खाणारी गजरा स्वतःच्या भावाच्या पोराला मुलगी सुरेखाचा हात देत नाही. धडकपणे भावाला नकार देते. आणि सांगून टाकते की माझ्या सुरेखाला एक दोन एकर वावर विकून का होईना आपण मुलीला नोकरदार मुलगाच बघून द्यावा म्हणणारा तळमळणारा गजराचा जीव. वाचकाला प्रत्यक्षदर्शी समोर घटनेत असल्याचा भास धडक या कथेतून होतो.
सुभानरावची सावकारी जात राजारामजी गरीबी मुळे होणारे हे सांड सखूचा म्हशीत अडकलेला जीव शेवटी सुभानराव सावकार व्याजाच्या पेशात राजाराम व सखुची म्हैस घेऊन जातो राजाराम व सखू यांना जीवन जगण्यासाठी होणारे दमकुंडी या कथेत लेखक उमेश मोहिते सर अगदी रुदयद्रावक घटना प्रसंग मांडताना मानवी मनाच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.
कोरोनाच्या काळात कावेरीला शाळेतल्या मॅडमनी केलेली मदत ती केवळ मदत नसून तर त्यांना स्वावलंबी बनविण्याचे ट्रेनिंग मॅडम देऊन गरिबांना जीवन जगण्यासाठी आणि परिस्थितीशी दोन हात करत रस्ता दाखवणारी कथा वाचकाला प्रेरणा देऊन जाते आणि माणुसकी नकळत शिकून जाते आजच्या भावी पिढीला सुशिक्षित बेरोजगार म्हणून हातावर हात ठेवून बसलेल्या लोकांना ही कथा प्रेरणादायी वाटते.
पेरणीसाठी सावकाराकडून काढलेलं कर्ज पार्वतीला भेटता येत नसल्याने पुन्हा पैशाची गरज भासली. तेंव्हा पार्वतीला सख्खा भाऊ पण मदत करत नाही उलट तिची देखणी मुलगी स्वतःच्या मुलासाठी मागतो पार्वती त्याला स्पष्ट नकार देते आणि सावकाराकडे स्वतःचा वाडा गहाण ठेवून पैसे काढते पुढच्या आणि पाठच्या पण खोडा घालतात थोड्या या कथेत विधवा पार्वतीने नवरा मेल्यावर लेकर जतन करण्यासाठी खालेल्या खस्ता मानवी मनाला अस्वस्थ करून टाकतात बिस्कुट आणि झुंज कथाही खूप वाचनीय आहेत.
खोडा या कथासंग्रहात एकूण 11 कथांचा समावेश आहे .लेखक उमेश मोहिते सरांनी ग्रामीण भागातल्या कष्टकरी, गरीब, शोषित, पीडित कुटुंबाचे हाल त्यांच्यावरील संकटे. समस्त श्री जातीला फटक्या संसारासाठी लावावी लागणारी ठिगळं त्यांनी खालेल्या खस्ता त्यांच्या हाल अपेष्टा इच्छा अपेक्षा आणि त्यांच्यापासून कशा उपेक्षित राहणाऱ्या स्त्रियांची व्यथा कथा म्हणजेच खोडा कथासंग्रह होय.
लेखक उमेश मोहिते यांची अस्सल ग्रामीण भागातली साधी सरळ बोलीभाषा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कष्टकरी स्त्रियांच्या जाणिवा वाचकाला अंतर्मुख करायला भाग पाडतात. वाचकाला स्वतःच त्याच कथेत असल्याचा भास होतो. एवढी ताकद लेखक उमेश मोहिते सरांच्या लेखणीत आहे. वाचकाच्या पसंतीस पडेल हा कथासंग्रह यात शंकाच नाही लेखक उमेश मोहिते यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
कथासंग्रहाचे नाव -खोडा
लेखक -उमेश मोहिते
प्रकाशक -तेजश्री प्रकाशन,कोल्हापूर
मुखपृष्ठ -सरदार जाधव
मूल्य -केवळ २०० रुपये
पुस्तक बोलवण्यासाठी संपर्क 7666186928
समीक्षिका लेखिका
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका जिल्हा वाशिम
पिन नंबर 444505
मोबाईल नंबर 9767663257



.jpg)









