Sunday, 18 April 2021

*जगाचा पोशिंद्याला सुखी ठेवण्यासाठी विठुरायाला साकडे घालणारा कविता संग्रह म्हणजे "विठू माऊली की विठोबा!"*

 Date: 15 Apr 2021

*जगाचा पोशिंद्याला सुखी ठेवण्यासाठी विठुरायाला साकडे घालणारा कविता संग्रह म्हणजे "विठू माऊली की विठोबा!"*

       महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ज्या विठू माऊलीची पूजा केली जाते. त्या विठू माऊलीला कुणब्याच्या आयुष्यात एक वेगळे स्थान आहे. ते वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागातून मोठ्या उत्साहात दिसते. अशा वातावरणातून लहानाचा मोठा झालेला अर्थात कुणब्याच्या घरात जन्माला आलेले मलकापूर, अकोल्याचे कवी गणेश शिवराम भाकरे यांचा चौथा कवितासंग्रह "विठुमाऊली की विठोबा!" हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय सुंदर समर्पक नावाला साजेसे घाम गाळणाऱ्या शेतकरी राजाचे, हाती विळा व एका खांद्यावर कुदळ घेऊन विठ्ठला सारख्या बळीराजाचे देखणे चित्र रेखाटले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शब्ददीप प्रकाशन, अकोला यांनी प्रकाशित केले असून याची प्रथमावृत्ती २४ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रकाशित झाली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १७० रुपये असून यात या सर्वच कविता विठुरायाच्या चरणी साकडे घालणाऱ्या आहेत.
              शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले कवी गणेश भाकरे यांचा पहिला कवितासंग्रह "मी" दुसरा कवितासंग्रह "आसवांची शाई" याला महाराष्ट्रातून १४ विविध पुरस्कार मिळाले आहेत. तिसरा कवितासंग्रह प्रकाशाचा दिवा बालकवितासंग्रह झाला.याला महाराष्ट्रातून विविध १२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असा हाडाचा कवी असणारा पण रेमंड लिमिटेड छिंदवाडा डिव्हिजन या नामांकित कंपनीत कामाला असून हे साहित्याचा छंद जोपासणारे आहेत. कवी गणेश भाकरे यांच्या साहित्यावर प्रेम करणारा साहित्यीक गोतावळा, गाव मातीतीलं गणगोत, हाताच्या बोटावर मोजता न येण्यासारखी आहेत. एका नामवंत कंपनीत कामाला असूनही कवी गणेश भाकरे यांचे चार कवितासंग्रह दर्जेदार स्वरुपात वाचकांच्या समोर ठेवण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणे यांच्या किशोर मासिकातून सलग २९ महिने प्रकाशित झाल्या.अनेक पुरस्कार मिळाले यावरून साहित्यावरचे त्यांचे नितांत प्रेम व आस्था दिसून येते.
              शेतकऱ्या बद्दल अत्यंत जिव्हाळा, आपुलकी, प्रेम असणारे कवी गणेश भाकरे यांनी शेतकऱ्याचं जगणं-मरणं शेतकऱ्याचे कष्ट, कष्टकरी लोकांच्या व्यथा, विठुरायाशी संवाद साधत विठुरायाच्या चरणी साकडे घालत देशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या जवान सैनिक व घाम गाळून देश जगवणा-या जगाचा पोशिंदा म्हणजेच बळीराजाला अर्पण केले आहेत. कवी गणेश भाकरे यांच्या सर्वच कविता माणसाला जगायला शिकवणाऱ्या, माय बापाला  पांडुरंग रूपात पाहणाऱ्या, शेतकऱ्याला कष्टाची जाणीव करून देणाऱ्या, लबाडांची बिंग फोडणाऱ्या, थकल्या देहाचं जीन सांगणाऱ्या, अभंगातून विठुरायाला विनवणी करणाऱ्या,गावाची महती सांगणाऱ्या, कुणब्याची महती सांगणाऱ्या, जीवनाचा वेध घेणाऱ्या, संस्कार पेरणाऱ्या, शेतकऱ्यांना प्रति आदर व्यक्त करणाऱ्या, आईची महती सांगणाऱ्या, जगाचं दुःख, दारिद्रय, शेतकऱ्याचे गा-हाणं अभंगातून विठ्ठलाला सांगणाऱ्या सर्वच कविता काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाहीत.

       वार्ता कळताच मित्रा आलं डोळ्यांत रे पाणी
       कसा टाळूनिया गेला सांग शेवटच्या क्षणी
       चिंबचिंब आसवांनी केले ओलेचिंब घावं 
       पोटासाठी आलो होतो मित्रा सोडूनिया गाव
       जुन्या आठवणी झाल्या साऱ्या पापणीत गोळा 
        तुझी माझी आठवली  मित्रा गावातली शाळा,....!!


      मित्रांवर अतोनात प्रेम करणारा कवी गणेश भाकरे यांचा मित्र अचानक सोडून गेलेल्या भावना वरील ओळीतून दाटून आलेल्या दिसतात. मित्राचा विरह दिसून येतो. मित्र गेल्याचे दुःख वरील ओळी ओळीतून व्यक्त होते. दुःखाच्या वेळी, संकटाच्या वेळी मित्राचा फार मोठा आधार असतो. जगात मित्राला खूप मोठे स्थान आहे. आपण प्रत्येक गोष्ट कोणालाही सहज सांगू शकत नाही पण मित्रांकडे शेअर करु शकतो. अशी हक्काची जागा म्हणजे मित्र. सदैव सोबत असणारा मित्र शेवटच्या क्षणी अचानक निघून गेल्याने कवी गणेश भाकरे यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पोटासाठी शहरात आलेला मित्र म्हणजे कवी गणेश भाकरे यांचा मित्र गावातच होता पण शहरात आलेल्या हळव्या मनाच्या कवी गणेश भाकरे यांना बालपणीच्या आठवणी मनात गोळा झाल्या दोघांही मित्रांची एक शाळा आठवली आणि मित्रावरचे उत्कट प्रेम वरील ओळीतून दिसून येते.

        शेणा-मातीच्या घरात झाला अन्नाविना अंत 
        सांग लाडक्या विठ्ठला तुला का नाही रे खंत...!!

      गरीबी फार वाईट असते ज्यानं गरिबी भोगली त्यालाच गरिबीचं महत्व कळतं.परिस्थिती फार वाईट असते. गरिबीला पण मन असतं पण दररोज तो मन मारून जगत असतो. गरिबाला आहे वाटतं आपण चांगलं काम चांगले केले पाहिजे. कपडे चांगले घालावे ,चांगले राहावे पण गरीबाची बीड एकाही त्याला सुटू देत नाही आपल्या देशात श्रीमंत -गरीब अशी साखळी निर्माण झाली आहे.श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातो आहे.आणि गरीब आणखी गरीब होत जातोय. गरीब व श्रीमंत यांच्यामधली दरी फार मोठी आहे. गरीब गरिबाला रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असते. भूक जगू देत नाही.गरिबी मरु देत नाही ...!! अशी काहीशी अवस्था असते गरीबाच्या घरी शेणा मातीच्या घरात अन नसल्यामुळे अंत झाला विठ्ठला तू सर्वांचा मायबाप आहेस तुला त्याची खंत नाही का रे असा खडा सवालही कवी गणेश भाकरे यांनी पंढरीच्या विठ्ठलाला केला आहे

           "राहू दे तुझी रे 
            कृपा आम्हावर 
             देऊननिया सर 
                .....पावसाची....!!

              वरील अभंगाच्या ओळीतून विठुरायाच्या चरणी शेतकऱ्यासाठी साकडे घालणारा संवेदनशील मनाचा कवी गणेश भाकरे म्हणतो आहे. कवी गणेश भाकरे यांनी विठ्ठलाला हात जोडून विनंती केली आहे खूप पाऊस पाड तुझी कृपा आम्हावरी राहू दे. अशी हाक दिली आहे. शेतकऱ्याचा आयुष्यात पावसावर पाऊस अवलंबून असतं पाऊस नाही झाला तर अवर्षणाचा सामना करावा लागतो. शेतकऱ्याला दुसरे काही वैभव नको असतं. फक्त त्याचे हिरवे रान बघितलं की शेतकरी राजा आनंदाने डोलतो. शेतकरी विठुरायाच्या चरणी फक्त चतकोर भाकरीची भूक मिटवण्यासाठी विनंती करतो तरी गणेश भाकरे शेतकऱ्याचे पुत्र असल्याने शेतकऱ्याचं जगणं-मरणं शेतकऱ्यांचे कष्ट जवळून पाहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या शब्दात दाटून येतात.

           "कुण्या कवितेत मांडू
           दुःख आयुष्याच माझं
            कशी लेकरांना झाली 
            माय जन्मदाती ओझं!"

            वरील अष्टाक्षरी तून कवी गणेश भाकरे यांनी आजच्या काळातील मुलांना जन्मदात्री कशी ओझी वाटत आहे याची खंत वरील ओळीतून व्यक्त केली आहे. जी आई पोटच्या लेकराला नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटात ठेवते. जन्मल्यानंतर बाळाला सतरा धारा दूध पाजते, लेकरासाठी आयुष्यभर मरमर करते,राब राब राबते हाडाची काड करते. लेकरू शिकावं म्हणून पदराला शंभर गाठी मारते. तीच माय घरात उपाशी झोपते. कांही मुलं तर लग्न झाले की आई-वडिलांना वेगळं काढून देतात किंवा सरळ वृद्धाश्रमात ठेवतात. अशा निष्ठुर झालेल्या मुलांसाठी आईचे महत्व,आईच दुःख, वेदना , कवी आपल्या काव्यातून जड अंतकरणाने मांडतो.

         बांधावर नाही | आधाराला बाप 
         कोणी दिला शाप | असा मला...!!

       वरील अभंगाच्या  ओळीतून बाप नसल्याचे दुःख शेतकरी पुत्राने छान मांडली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या डोईवर वर बापाचे छत्र हरवतो तो अभागी मुलगा बांधावर गेला की त्याला त्याचा बाप आठवतो बापाचा वीर जीवघेणा वाटतो म्हणून तो देवालाच कुणी शाप मला दिला म्हणून आपल्या कवितेतून व्यक्त होतो.
         विठोबा या काव्यसंग्रहातील सर्वच कविता थेट काळजाला जाऊन भिडतात.तातल्या बर्‍याच कविता शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित आहेत.तर काही कविता शहरात राहायला गेलेल्या पोराच्या आठवणीने डोळ्यांत पाणी येणाऱ्या गावाकडच्या मायबापाच्या आहेत. बऱ्याच कविता विठ्ठलाची संवाद साधणाऱ्या , विठ्ठलाच्या चरणी साकडे घालणारे आहेत, तर काही कविता आणि शिष्य दुष्काळ विरह शेती ,शेतकरी यांच्याशी निगडित आहेत .तरी गणेश भाकरे यांना त्यांच्या आईला जे दुःख पटकन समजते ते दुःख विठुरायाला का समजत नाही?  तूच सांग विठोबा तुला काय म्हणून "विठू माऊली की विठोबा" अशा शब्दात कवी व्यक्त होतात आणि पांडुरंगा चरणी साकडे घालतात... साऱ्या जगाचा तुच निर्मितीकार आहेस.म्हणून काव्यरूपी हाक देतात . तूच दुसऱ्यांचे दुःख नाही सकर म्हणून विठुराया चरणी प्रार्थना करतात.
      कवी गणेश भाकरे यांच्या विठुमाऊली की विठोबा हा काव्यसंग्रह सर्वांनी आवर्जून वाचावा असाच आहे कवी गणेश म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.9767663257

Wednesday, 7 April 2021

तिमिरातूनी तेजाकडे नेणारा काव्यसंग्रह म्हणजे-मी उजेडाच्या दिशेने निघालो.*

*तिमिरातूनी तेजाकडे नेणारा काव्यसंग्रह म्हणजे-मी उजेडाच्या दिशेने निघालो.*

          वर्धा जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी अरुण विघ्ने यांचा चौथा काव्यसंग्रह मी उजेडाच्या दिशेने निघालो नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ तिमिरातुनी तेजाकडे म्हणजेच अंधारातून उजेडाकडे नेणारे आहे. नावाला साजेसे सुंदर मुखपृष्ट प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून दर्जेदार बांधणी व प्रकाशन मध्यमा प्रकाशन नागपूर यांनी दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी याची प्रथमावृत्ती प्रकाशित केली आहे.या काव्यसंग्रहाला प्रस्तावना डॉ.भूषण रामटेके यांची लाभली असून मलपृष्ठावर डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांनी पाठराखण केली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ २२० रुपये आहे पण यातल्या सर्वच कविता प्रकाशाच्या दिशेने नेणा-या आहेत.
            वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी हरिभाऊ विघ्ने यांचा पहिला कवितासंग्रह पक्षी, वादळातील दीपस्तंभ, जागल असे तीन कवितासंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. त्यानंतर  'मी उजेडाच्या दिशेने निघालो'  हा चौथा कवितासंग्रह काळोखातून उजेडाच्या दिशेने नेत स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय, करुणा, प्रेम, मैत्री, अहिंसा या मूल्यांची ओळख करून देणारा आहे. जाती भेदभाव दूर करून कामगार कष्टकरी,शेतकरी, पीडित, शोषित, वंचित लोकांना आपल्या हक्काची ओळख करून देणारा आहे.

        ज्योतिबा
        तुम्ही झुगारलेत गुलामगिरीचे बंध
        तोडलेत जातीभेदाचे साखळदंड 
        आणि घातलात पाया स्त्रीशिक्षणाचा 
         रूढी-परंपरांना तोडून 
         तुम्ही वंचितांचे,उपेक्षितांचे,शोषितांचे, अस्पृश्यांचे,
        क्रांतीबा  आणि क्रांतीमा होऊन ओढलात आसूड
         तत्कालीन व्यवस्थेवर 
          तुमच्या बंडानेच आज स्त्री घेतेय सर्वच क्षेत्रात गगनचुंबी भरारी
          तुमचा वारसा चालवीत बाबासाहेबांनीही त्याला
          कायद्याने बळकटी दिली 
          आणि शिक्कामोर्तब झाले सर्वांगीण विकासावर...

                    बहुजन समाजाला पूर्वी शिक्षणाचा गंधही नव्हता तेंव्हा क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरीचे बंधने तोडून जातीभेदाचे साखळदंड तोडून सर्वांना शिक्षणाचे बाळकडू पाजले.स्त्री शिक्षणाचा पाया फुले दांपत्यांनी रचला. सावित्री ज्योतिबा यांनी अखंड आयुष्य दुसऱ्यासाठी घालविले. ज्ञानाचा दीपक लावला. जुन्या, रुढी,परंपरांना तोडून वंचितांना, शोषितांना, उपेक्षितांना,अस्पृश्यांना शिक्षण दिले.सर्वांचे क्रांतिबा आणि क्रांतीमा ठरलात. तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढले.आज सावित्रीज्योती यांच्यामुळे स्त्रिया आज सर्वच क्षेत्रात गगनचुंबी भरारी घेतात. पुर्वीच्या काळी स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतक्यातच अडकवून ठेवलं जात होतं. ज्योतीबांच्या विचारांचा वारसा चालवणार्‍या बाबासाहेबांनी कायद्याने ज्योतीबांच्या विचाराला बळकटी दिली. त्यामुळेच आज सर्वांगीण विकास होतोय असे परिवर्तनवादी विचार  करणारा कवी अरुण विघ्ने आपल्या पहिल्या कवितेतूनच क्रांतीज्योती महात्मा फुले सावित्री आई व बाबा साहेबांच्या चरणी काव्यफुले वरील ओळीतून अर्पण करताना दिसतात.
       
               दिव्यांनी ठरवावं आपापलं 
               कुठे कुठे पेटून प्रकाशायचं 
               कुठला अंधार करावा नाहीसा 
               आणि कुठे आपसूक विझायचं ....

                प्रकाशातच पेटतात दिवे सारे 
                त्याच महत्त्व कसं समजायचं 
                काळोखात पेटलेल्या एका पणतीचं 
                अस्तित्व तरी कशाला मोजायचं....!!

       परिवर्तनवादी विचारांचा कवी अरुण विघ्ने यांच्या सर्वच कवितांची उंची व खोली खऱ्या विचारवंताला विचार करायला भाग पाडतात. खोल आशयसमृद्ध असणाऱ्या कविता काळजापर्यंत आतल्या उजेडाकडे नेतात.अंधारात गुरफटलेल्या व्यक्तीला प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येक कविता दिव्याप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. दिव्यांनी ठरवायचं कुठे पेटवून प्रकाशायचं? कुठला अंधार नाहीसा करायचा आणि कुठे आपणच विझायचं.. प्रत्येक माणसाने सुद्धा स्वतः ठरवायचा आहे आपणही दिवा होऊन अंधाराला चिरत इतरांना मार्ग दाखवायचं. कुठे विझायचं हे सुद्धा मानवाने ठरवावं. प्रकाशात तर सारेच पेटून उठतात त्याचं महत्त्व फार नसतं. पण काळोखात पेटलेल्या एका पणतीचे अस्तित्व का नाही मोजता येतं? असा खडा सवाल कवी अरुण विघ्ने आपल्या काव्यातून करताना दिसतात.

          मायी माय भिमाबा
         करी जात्यात दयन
         उखयात मिरच्यावाणी 
         करी कुप्रथाचं कांडण....!!

         भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या मातेच्या पोटी झाला त्या भिमाबाईने किती खस्ता खाल्ल्या ? किती कष्ट भोगले? किती हाल सोसले? हे कवी अरुणजी आपल्या काव्यातून स्पष्ट करतात. भीमाईनं जात्यावर दळण दळते. उखळात मिरच्या जशा ठेचल्या जातात त्याप्रमाणे कुप्रथांना कांडते. रूढी-परंपरांना कुटतात. दाने जात्यात टाकत चंद्र भुकेचा रांधत म्हणजेच पोटासाठी, भाकरीसाठी दळण दळते. या अष्टाक्षरी काव्यातून कवीने जातीभेदावर प्रहार केला आहे. अनिष्ट रूढी परंपरांना संविधानाने तोडलं आहे.

              हे करूणाकार बुद्धा 
             अखिल विश्वाचा प्रवास करून 
              लाखो खाचखळग्यातून चालताना 
             तृष्णेच्या कोटी कोटी दगडाला ठेचाळून
              रक्तबंबाळ होऊन थकलेली माझी पावलं 
              आता तुझाच अष्टांग मार्ग चोखाळणार आहे बुध्दा
             बोधिवृक्षाखाली विसावणार आहेत कायमची
              भरकटलेली पावलं तुझ्याकडेच येत आहेत शांतिदूता
            मी उजेडाच्या दिशेने निघालो आहे...

        अख्ख्या जगाला शांतीचा संदेश देणारे करूणाकार गौतम बुद्ध विश्वाचा प्रवास लाखो खाचखळग्यातून करतात तेव्हा तृष्णेच्या कोटी दगडांना ठेचाळत रक्तबंबाळ झालेली पावलं तुझाच अष्टांग मार्ग स्वीकारणार आहेत. तुझ्याच बोधीवृक्षाखाली विसावणार आहेत. भरकटलेली पावलं तू दाखवलेल्या दैदिप्यमान उजेडाकडे निघत आहेत. हे शांतिदूता आता तू जगाला शांततेचा संदेश देतो. त्याच प्रकाशमान उजेडाच्या दिशेने मी सुद्धा निघालो आहे. असे कवी वरील ओळीतून व्यक्त होतो.

           धागा माणुसकीचा, शिवतो फाटलेली नाती 
          आणि दुभंगलेली मने अविरत 
           धागा एकतेचा, ठेवतो असंख्य फुलांना एकत्र जोडून 
           एकमेकांशी नात्यासारखा घट्ट...

                 माणुसकीच्या धाग्याने फाटलेली नाती आणि दुभंगलेली मने शिवणारा धागा हो.एकतेच्या धाग्याने अनेक फुलांना एकत्र जोडून एकमेकांशी घट्ट जोडणारा धागा हो. प्रेमाच्या धाग्याने असंख्य अक्षरे, शब्द शब्द बनवून, भावभावनांना,प्रेमाला कवितेत गुंफणारा कवी समतेच्या धाग्यांनी जात,धर्म, पंथ,देश, वर्ण यांना जोडून समूह बनविणारा कवी समतेचा धागा हो म्हणून कवितेच्या माध्यमातून दिशा दाखवित आहे.
       कवी अरुण विघ्ने यांच्या कविता माणसाला जातिभेद दूर सारून समतेच्या, न्यायाच्या, वेदनेच्या, स्वातंत्र्य, समता, बंधुता याचे महत्त्व विषद करणाऱ्या, माणसाला माणसासम वागायला शिकवणाऱ्या शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या, देशप्रेम, सावित्री,भिमाई,रमाई चा त्याग सांगणाऱ्या, विषमतेवर प्रहार करणाऱ्या, शांततेचा संदेश देणाऱ्या, बुद्धाच्या मार्गाकडे नेणाऱ्या, मानव मुक्तीचा जाहीरनामा सांगणाऱ्या,उपेक्षितांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या व्यथा मांडणाऱ्या, संविधानाचे गाण गाणाऱ्या, गाडगे बाबांचे कार्य सांगणाऱ्या, महामानवाचा संदेश सांगणाऱ्या, अंधाराकडून उजेडाकडे नेणाऱ्या एकूण ८३ कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत. माणसाला माणूसपण आणि शहाणपण शिकवणा-या आहेत.
      वाचणा-यांच्या डोक्यात दैदिप्यमान प्रकाश टाकणाऱ्या, तिमिरातुनी तेजाकडे नेणाऱ्या असून वर्‍हाडी भाषेचा आस्वाद घेणाऱ्या सर्वच कविता प्रत्येकानं आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.
             प्रसिद्ध कवी अरुण विघ्ने सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!

 समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता.जि.वाशिम
मो.9767663257

Sunday, 4 April 2021

वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांना ऑथर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित...

 *वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांना स्टोरी मिररचा ऑथर ऑफ द इयर 2020 या पुरस्काराने सन्मानित*

          लाखो वाचक असलेल्या वेबसाईट वर भारतातून लाखो वाचक,लेखक सहभागी होत असतात.स्टोरी मिरर या वेबसाईटवर लेखकाला हवे तसे कथा,कादंबरी, कविता,क्योट्स असे लिखाण करण्यासाठी एक मुक्त अशी हक्काची जागा आहे.मिनाक्षी नागराळे यांनी 2020 या वर्षात या साईटवर अनेक कथा,कविता,क्योट्स मराठी भाषेमधून लिहीलेल्या आहेत.आजपर्यंत त्यांनी स्टोरी मिरर चर्या अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.अनेक पुस्तके बक्षिसही मिळाली आहेत.अनेक व्हॉव्हचर त्यांना मिळाले आहेत.त्यांचे साहित्य हजारो लोकांची पसंतीस उतरले आहे.स्टोरी मिररच्या माध्यमातून साहित्याचा प्रवास सुखद न नवनवीन स्पर्धेच्या माध्यमातून घेतल्याने लेखकाला नविन उर्जा मिळते.असं त्या सांगतात..
         बेस्ट ऑथर ऑफ द इयर 2020 च्या पुरस्काराच्या मानकरी वाशिम जिल्ह्यातील मिनाक्षी पांडुरंग नागराळे (जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव ता.जि.वाशिम) यांनी लिखाणात वर्षभर सातत्य ठेवून भारतातून एडीटर चॉईस व लोकांनी दिलेल्या वोटींमध्ये मराठी भाषेमधून दुसरे स्थान पटकावले आहे.आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.परंतू हा पुरस्कार भारतातून असल्याने मराठी भाषेबद्दलचे त्यांचे प्रेम,मराठीचा गोडवा त्यांच्या नसानसांत भिनला आहे.मराठीवरचे प्रेम दिसून येते.सतत लिहीते राहण्याची जिद्द, आणि वाचकांच्या पसंतीस उतरलेले त्यांचे साहित्य याला न्याय देण्यासाठी,त्यांचा सन्मान करण्यासाठी स्टोरी मिरर या वेबसाईटवरून प्रमाणपत्र व ट्रॉफी पोस्टाने पाठवून मिनाक्षी नागराळे यांना सन्मानित करण्यात आले आहे....
          मिनाक्षी नागराळे या तंत्रस्नेही एक आदर्श शिक्षिका आहेत.शाळेत त्यांचे अनेक उपक्रम सतत राबवित असतात.लॉकडाऊन काळातही त्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून जि.प.शाळा.कोकलगाव या शाळेचा कायापालट केला.तसेच त्यांच्यावर लॉकडाऊन काळातील हिरोईन या सदराखाली पत्रकार गजानन धामणे यांनी स्टोरी लिहून प्रकाशित केली. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक,साहित्यीक,व सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असतात.स्टोरी मिररचा भारतातला मराठी भाषेचा सर्वोच्च सन्मान वाशिम जिल्ह्यातील मिनाक्षी नागराळे यांना मिळाल्यामुळे सर्व साहित्यीक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे....

राज्यस्तरीय निरजा काव्य स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला...!!

 *राज्यस्तरीय निरजा काव्य स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला*
------------------------------------------
      1 मार्च 2020 ला नीरजा चा 4 था वाढदिवस व नीरजा काव्य समूहाचा 3  रा वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय नीरजा रचना स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. या स्पर्धेचे असामान्य महत्त्व आहे.' झेप  नीरजेची ' या विषयावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. नीरजा समूहातील अनेक कवी या स्पर्धेत सहभाग घेतला. नवीन काव्य प्रकार असून सुद्धा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हातील कवींनी सहभाग घेऊन विजेते ठरले. विजेत्यांना सन्मान चिन्ह तर उत्तेजनार्थ कवींना सन्मान पत्र देण्यात आले. 2017 पासून समूहाचे काव्य संग्रह प्रकाशन सोहळा व कवी संमेलन मोठ्या उत्साहाने घेण्यात येतो पण कोरोना संकटामुळे 2020 ला घेण्यात आले नाही. त्यामुळे विजेत्यांचे सन्मान चिन्ह घरपोच पाठविण्यात आले.त्यामधे सर्वोत्कृष्ट कवयित्री.मा.लीना साकरकर,कारंजा जिल्हा वाशिम,उत्कृष्ट कवयित्री.मा.मेधा देसाई ,(पुणे ),प्रथम कवयित्री. मा.ऊर्मी घरत, (पालघर), द्वितीय कवयित्री.मा.शामला पंडित,पुणे तर तृतीय सन्मान कवयित्री.मा.मिनाक्षी नागराळे,वाशिम यांना प्राप्त झाले असून सर्वांचे सन्मान मा. प्रशासक नरेन्द्र गुरुदास कन्नाके, वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने सन्मान पूर्वक घरपोच पाठविण्यात आले आहे.समूहात वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. विजेत्यांना सन्मान पूर्वक ई प्रमाणपत्र दिले जाते.रोज उपक्रम असतो त्यावर अनेक कवी आपली नीरजा सेंड केल्या जातात.आलेल्या नीरजा वर रोज मार्गदर्शन केले जाते. कोरोणा काळात सुध्दा सर्वांचे नीरजा घेऊन स्पंदन नीरजा ई दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यात आले.यामुळेच समूहात एक वेगळा आनंद मिळतो.तसेच लिहिण्याची ऊर्जा प्राप्त होते. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन .पुढील काळात असेच यश संपादन करावे अशी मा.दुर्गा देशपांडे ,मुंबई,मा.गीता केदारे मुंबई, मा.शितल मोतेवार,नागपूर,या सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन केलेले आहे.

Saturday, 3 April 2021

संस्काराचा खजिना म्हणजे बारीकसारीक गोष्टी

 *संस्काराचा खजिना म्हणजे -बारीकसारीक गोष्टी*

            बालवयातच मुलांना बोधकथा, संस्कारकथा,छान छान गोष्टी खूप आवडतात. गोष्टीमधून योग्य ते संस्कार रुजवले जातात.बालकांच्या भावविश्वाशी निगडित असणाऱ्या प्राण्या-पक्षांच्या,आजोबा-आजींच्या,निसर्गाच्या, परींच्या कथा बालकांना खूप आवडतात.गाण्यापेक्षाही मुलांना कथा जास्त आवडतात.अशाच कथांचं पुस्तक माझ्या वाचनात आले आहे.त्याचं नाव आहे बारीक सारीक गोष्टी. लेखक आहेत शिरीष पद्माकर देशमुख. चपराक प्रकाशन यांनी प्रकाशन केले असून याची प्रथम आवृत्ती १७ सप्टेंबर २०२० ला प्रकाशित झाली आहे. या कथा संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे आहे. पाहताक्षणी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणारे आहे. या कथासंग्रहात एकूण पंधरा गोष्टी असून त्याचे मूल्य फक्त ९९रूपये आहे. पण यातल्या सर्वच कथा बालकावर योग्य संस्कार करणा-या आहेत.
              जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखक शिरीष देशमुख यांचा बालबोध करणारा कथासंग्रह बारीक-सारीक गोष्टी या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.कथा छोट्या छोट्या असल्या तरी गहन आशयाच्या आहेत. आज बऱ्याच पालकांच्या तक्रारी असतात की या मोबाईल मुळे मुले बिघडायला लागली आहेत. मुलं खूप हट्टी होत आहेत. त्यांना शिस्त नाही. रागीष्ट झालेत अशी अनेक पालकांच्या तक्रारी असतात पण मुलांवर योग्य वयात योग्य ते चांगले संस्कार करण्याची गरज आहे. बालवयात केले गेलेले संस्कार आयुष्यभर पुरतात, टिकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माँसाहेब जिजाऊ होय. मासाहेबांनी शिवरायांवर बालपणीच उत्तम संस्कार केले. स्त्रियांचा आदर करणे रयतेचे रक्षण करणे, रयतेच्या सुखासाठी अपार त्रास सहन करणे, आपले कर्तव्य बजावणे हे सारे संस्कार बालवयातच रामायण-महाभारतातल्या सारख्या कथा सांगून योग्य ते संस्कार पेरले होते म्हणून जगाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांचे नाव प्रथम येतील अशा संस्कार घडवणाऱ्या या कथा प्रत्येक बालकांनी तर वाचाव्यात पण पालकांनी ही आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.
              लेखक शिरीष देशमुख यांनी बालकांना वळण लावणाऱ्या बालकांवर संस्कार घडवणाऱ्या, बालकांच्या व पालकांच्या पचनी पडतील अशा कथांचा खजिनाच वाचकांसमोर ठेवला आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. बुजगावणं या कथेत एक हरिणी आपल्या पाडसांना हिम्मत येण्यासाठी बुजगावणं पाडून दाखवते नंतर सर्व पाडसाची भीती आपोआप दूर होते.बालकांच्या जीवनातला सर्वात मोठा गुरु म्हणजे आई असते तीच जीवनाला योग्य आकार देत असते. हे या कथेतून प्रकर्षानं जाणवतं
            मार्जिन या कथेमध्ये मार्जिन पेक्षा निसर्ग किती मोठा ? तो कोणत्या पद्धतीने वाचवला पाहिजे हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारा यश प्राप्त प्रात्यक्षिकासंह आपल्या प्रिन्सिपल मॅडमला समजावून सांगतो.वेळ प्रसंगी सरांच्या छड्या खाणाऱ्या यशचे निसर्गावर चे प्रेम निसर्ग, वाचवण्याचे उपाय अगदी छोट्या कृतीतूनही धीटपणे सांगणारा यश त्याच्या धाडसाचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही ही कथा वाचल्यानंतर खरंच आपण का मार्जिन सोडतो असा सवाल वाचकाला पडतो.
             शाळेत जायला नको म्हणून रडणारा राजू चित्रकला स्पर्धेत प्रथम येतो आणि आपलं बक्षीस बाबांना दाखवतो तेव्हा राजूच्या रागामुळे घरातलं झालेलं नुकसान, दूध सांडणे, रिमोट फोडणे बाबा समजावून सांगितल्याने राजुचा राग किती वाईट आहे ? ते कळतं. आजकाल मुलांना हल्ली ही भाजी आवडत नाही. ती भाजी आवडत नाही. असे म्हणणाऱ्या मुलांसाठी खास कथा आहे. दाता तला राक्षस या कथेत अनंता सूर बंटीच्या स्वप्नात येऊन ब्रश कर बदल दम देतो.त्याच बरोबर बिस्कीट चहा किती वाईट आहे ते सांगतो. त्यामुळे घाबरलेला बंटी दररोज ब्रश नियमितपणे करतो हे आजच्या प्रश्न करणाऱ्या कंटाळवाण्या मुलांवर खास औषधच आहे.
           आजच्या धावत्या युगात पालकांनी आपल्या मुलाबरोबर वेळ कसा घालवावा याची महती सांगणारा, बालकांच्या भावना पालकांपर्यंत पोचणारी कथा संजू तप करतो या कथेतून शिरीष देशमुख यांनी अगदी मार्मिकपणे मांडली आहे त्यामुळे पालक नक्की जागृत होतील यात संशय नाही. शेतकऱ्याला पोटासाठी सालभर किती कष्ट करावे लागतात. याची प्रचिती देणारी कथा म्हणजे ' पांढरा चिखल' पावसामुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान ,मुलगा जेव्हा डोळ्यांनी पाहतो तेव्हा मला सायकल नको म्हणून रडणारा मुलगा व बाप यात मुलांचा समंजसपणा, मोठेपणा दिसून येतो. गारपीठीमध्ये गोरगरिबांचे संसार उघड्यावर आलेल्या लोकांना मदत करून खऱ्या अर्थाने शिवजयंती कशी साजरी करतात हे शिव संस्कार या कथेतून घेण्यासारखे आहे हरवलेल्या हरिणीच्या पाडसाला झालेली जखम पाहून तळमळणारा कोवळ्या मनाचा राजा पाडसाला जीवापाड प्रेम करतो.राजा आणि पाडस या कथेमध्ये प्राणीमात्रावर दया कशी करावी?  हे दिसून येते
          भोळ्याभाबड्या यशला पाच रुपयाचा नाना सापडतो. हे पैसे माझी नाहीत मी नको ठेवायला. अशीच सद्सद्लतविवेक बुद्धीने वागणारा सापडलेले पैसे देवाच्या पेटी मध्ये टाकण्यासाठी जातो पण मंदिराबाहेर भुकेने व्याकूळ झालेला मुलगा पाहून भीक मागणाऱ्या मुलाला पैसे न देता त्याला स्वतःचे दोन रुपये टाकून दुकानात जाऊन पाच रुपये ची वही व दोन रुपयाचा पेन देतो. हे या डॉलर या कथेतून त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. इतरांना मदत करणारे भाव- भावना काळजाला स्पर्श करून जाते. माझी आईत्याची आई या कथेतून ग्रामीण भागात राहणाऱ्या कष्ट करून घामाने स्वाभिमानाने प्रामाणिकपणा रे राहणारी महेश ची आई रोहन आपल्या आईबरोबर तुम्हाला करून पाहतो पण रोहनला माहेरची आई परिस्थितीने दरिद्री पण मनाने श्रीमंत असलेली आई अधिक महत्त्वाची वाटते
         रवी च्या बर्थडेला रवी चे चित्र स्केच करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी झिप्री या कथेतून निस्सीम निखळ प्रेम दिसून येतो रविवार माझ्या आवडीचा म्हणणाऱ्यांना रविवार किती कंटाळवाणा आहे तो दिसतो. दररोज रविवार असेल तर सगळी कामं कशी ठप्प पडतात? तेच सोमवारची कहाणी या कथेतून दिसून येते.राजकन्या आणि परीस यांची ही  कथा खूपच मनोरंजक आहे परिसाचा दगड फेकून देणाऱ्या राजकुमारीला परिसराचे महत्त्व कळत नाही तोच दगड लोहारा ला ठेचून बघा करण्यासाठी दिला जातो आणि लोहाराच्या आयुष्याचं सोनं होतं मायेची गोष्ट या कथेमध्ये मुक्या प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारा लहानग्याला दासुच अपार प्रेम दिसून येतं.
           लेखक शिरीष देशमुख यांनी बारीक-सारीक गोष्टी या बाल संग्रहातून विद्यार्थ्यांवर,बालकांवर योग्य संस्कार होतील अशा सर्वच कथांचा खजिना आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या बालका समोर ठेवला आहे. बालवयातच योग्य संस्कार मुलांवर होतात त्यासाठी प्रत्येक बालक व पालकांनी बारीक-सारीक गोष्टी आवर्जून वाचावे असा कथासंग्रह. आज साहित्यामध्ये महिलाचा दगड ठरला आहे. यातल्या सर्वच कथा बालमनाला आवडतील अशा सर्वच कथा चित्ररूप असल्याने व बालकांच्या पुस्तक हाताळण्याच्या दृष्टीने पाणी दर्जेदार प्रतीची असल्याने थेट कथा काळजाला भिडतात. वाचकाला वाचताना जणू चित्र डोळ्यासमोर उभे राहते असे संस्काराचा खजिना प्रत्येक शाळेत घरात आवर्जून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
                लेखक शिरीष देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 

समीक्षिका/लेखिका /शिक्षिका /कवयित्री 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता. जि. वाशिम
मो.9767663257