Monday, 9 December 2019

तीन शब्दांवरून गोष्ट तयार करणे....

 Date: 9 Dec 2019
    आजचा उपक्रम- तीन शब्दावरुन गोष्ट तयार करणे.....
       *सज्जन माणूस,चोर,संत*

        एका गावात  एक सज्जन माणूस रहात होता. तो खूप साधा निर्मळ मनाचा होता. कसल्याही परिस्थितीत सत्याने वागणारा असा तो सज्जन माणूस होता. एकेदिवशी त्या माणसाच्या घरी एका रात्री एक चोर घरात शिरतो तेवढ्यात त्या माणसाला जाग येते... चोर त्याच्या गळ्याला सुरी लावतो. आणि चोर धमकावतो माझं सोनं व्यवस्थित ठेव म्हणून एक सोन्याचा गाठोडं त्या सज्जन माणसाकडे देतो माझ्यामागे पोलीस लागले आहेत. मी काही दिवसाने येऊन हे सोनं परत घेऊन जातो असे तो चोर सजनाला बजावतो सज्जन फार घाबरलेला असतो त्यामुळे त्याचं सोन्याचा गाठोडं गपचूप ठेवून घेतो दोन महिने झाले चार महिने झाले सहा महिने झाले तरी चोर काही येत नाही. मग ही गोष्ट सज्जन माणूस एका संताला सांगतो काही दिवसांनी चोर सज्जन माणसाच्या घरी येतो. तोपर्यंत सज्जन माणसाने सोन्याचा गाठोडं त्या संताकडे सुखरूप ठेवण्यासाठी नेहून ठेवलेलं असतं. सज्जन माणूस खूप घाबरतो चोराला पाहून आणि एकदम चोराला म्हणतो मी तुमच्या सोन्याला हात सुद्धा लावलेला नाहीये चला आपण महाराजांकडे जाऊ या आणि त्यांच्याकडून सोनं तुम्हाला घेऊन मी देतो असं म्हणून सज्जन व चोर संताकडे  निघतात. संत महाराजा कडे गेल्यानंतर संत चोराला विचारतात का रे बाबा तू इतके दिवस कुठे गेला होता का आला नाहीस? चोर महाराजाला सांगतो की महाराज महाराज माझी मुलगी खूप आजारी पडली होती आणि म्हणून मी लवकर येऊ शकलो नाही. मी जेवढं चोरून धन जमा केलो होतो. ते सगळं दवाखान्यासाठी खर्च झालंय असं चोर संताला सांगतो. संत चोराला म्हणतात हे बघ गड्या ज्या हाताने तू चोरी केलीस त्या हातात हे फुकटचं धन कसं राहणार? चोर आचंबित होतो म्हणजे म्हणजे काय तुम्हांला काय म्हणायचं आहे असं चोर संताला विचारतो. तेवढ्यात संत चोराला म्हणतात "जैसी करणी वैसी भरणे"  म्हणजे काय असं चोर संताना विचारतो. संत म्हणतात अरे फुकटंचं तू लोकांचं धन,पैसा अडका चोरलं म्हणून तुझ्या जवळ ते टिकलं नाही जे कष्टाच असतं तेच टिकतं.... आणि त्यावर चोर मग विचार करू लागला चोराला ही खरच वाटलं कारण त्यांनी आत्तापर्यंत जेवढं कमावलं होतं ते सर्वच्या सर्व धन दवाखान्याच्या खर्चासाठी गेलं... चोर विचार करू लागला आणि महाराजांना म्हणाला यापुढे मी कधीही चोरी करणार नाही... सज्जन माणसाला खूप आनंद झाला व संतांना सुद्धा खूप आनंद झाला संतांनी जसा उद्देश केला तसा त्या चोरांनी आईला आणि त्या चोरांमध्ये परिवर्तन झाले. सोन्याने भरलेली थैली चोरांनी संतांच्या चरणी ठेवली आणि म्हणाला महाराज या सोन्याचं काय करायचे आहे ते करा हे धन मला आता नको आहे. संत म्हणाले मलासुद्धा कसले फुकटचे धन नको आहे आणि त्यावर चोरांनी त्या गावांमध्ये एक छान मंदिर बांधले व्यायाम शाळा काढली. मुलांसाठी वाचनालय सुरु केले. आणि चोराचा एक चांगला सज्जन माणूस झाला....

    *तात्पर्य:  चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलं की वाईट माणसांमध्ये सुद्धा बदल होतो...*

*लेखिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*


Sunday, 1 December 2019

चालू राजकीय घडामोडी...

Date: 1 Dec 2019

*स्पर्धेसाठी*

*विषय- चालू राजकीय घडामोडी*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*राजकारणाचे डावपेच, साऱ्यांनी आता ओळखले*
*दोन महिने चालले, राजकारणाची डाळ शिजवले...!!*

*पुन्हा येईन.... पुन्हा येईन म्हणतच डौलाने आले*
*विश्वासाचा पत्ता अजितदादा एकदम गुल झाले.....!!*

*राष्ट्रपती राजवट होती, झाली  राज्यात लागू*
*मंत्रिपदासाठी भुकेजलेले खुर्ची लागले मागू......!!*

*एके दिवशी सकाळीच, झाला एक गौप्यस्फोट*
*दोघांच्या भांडणात मग, तिसऱ्याचाच झाला स्फोट....!!*

*जनता बिचारी पहाटे पहाटे खळबळून सारी उठली*
*जो तो टिव्ही समोर, मोाईलवरही पाही बातमी कुठली...!!*

*त्या दिवशीचा पेपर सुध्दा झाला त्या दिवशीच जुना*
*साऱ्या मंत्र्यांनी लोकशाहीला लावला ना चुना......!!*

*एकमेकांचे दुश्मन, गळ्यात गळे टाकू लागले*
*खोटे खोटे हसु शपथ घेताना मग वाकू लागले....!!*

*जनता सारी बिचारी गेली हो पार गोंधळून* 
*खोटे गुन्हे बाजुला करत, अजित दादा आले वळून....!!*

*कसला तो गनिमी कावा, कसा कळेल जनतेला*
*उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन जागले ममतेला....!!*

*शेवटी एक निर्णय झाला, रडक्यांचे ही डोळे पुसले*
*स्वार्थासाठी जगणारे नेते, लोकही मग मनात हसले....!!*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*©®कवयित्री- मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✒✒✒✒✒✒✒✒✒

Sunday, 6 October 2019

*भारतातील पहिली महिलां संपादिका...तानुबाई बिर्जे....

*सातवे पुष्प- तानुबाई बिर्जे*
======================
*(भारतातील पहिल्या महिला स्त्री संपादिका....)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महात्मा फुलेंचे सहकारी व शेजारी देवराव ठोसर यांची कन्या व सावित्रीबाई फुले यांची मानसकन्या तानुबाईंचा जन्म १८७६ मध्ये पुण्यात झाला. त्यांचं शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुलेंच्या शाळेत झालं, तर २६ जानेवारी १८९३ रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधकीय पद्धतीने त्यांचा विवाह झाला. वासुदेव बिर्जे यांनी बडोदा सरकारमध्ये त्यांनी १८९४ ते १९०५ अशी अकरा वर्षे ग्रंथपाल म्हणून कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ‘दिनबंधु’ हे वृत्तपत्र १८९७ मध्ये पुन्हा सुरू केलं. कृष्णाजी भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बंद पडलं होतं. १८८० मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबईतून सुरू केलं. त्यानंतर १८९७ मध्ये बिर्जे यांनी त्याची जबाबदारी घेतली व ते १९०६ पर्यंत चालवलं, मात्र १९०६ मध्ये प्लेगने त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते वृत्तपत्र पुन्हा बंद पडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पती निधनानंतर डगमगून न जाता प्रबोधनाचे कार्य तानुबाई बिर्जे यांनी पुढे चालू ठेवले. तानुबाईचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि सत्यशोधकच होते. महात्मा फुले यांच्या घराशेजारीच त्यांचं घर होतं. त्यामुळे फुले दांपत्याचा सहवास तानुबाईंना लहानपणीच मिळाला.

‘दिनबंधु’चे पहिले संस्थापक-संपादक कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरू केलेल्या या वृत्तपत्राचं नंतरच्या काळात संपादन तानुबाई बिर्जे यांनी उत्कृष्टरीत्या केलं होतं. त्या भारतातील पहिल्या महिला संपादक ठरल्या. परंतु भारतातीलच नव्हे तर जगातील त्या पहिल्या संपादक असाव्यात, असा निष्कर्ष काढला जात आहे. त्या काळात भारतातील पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांचं नाव गाजलं.

वडील ठोसर व पती बिर्जे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी ‘दिनबंधु’ चालवायला घेतले आणि जगातल्या पहिल्या संपादक बनण्याचा लौकिक मिळवला. हे वृत्तपत्र त्यांनी १९०६ ते १९१२ पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे चालवून संपादिका म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तानुबाईंनी त्यांच्या संपादकपदाच्या कारकीर्दीत ‘दिनबंधु’मध्ये सत्यशोधक चळवळीच्या वृत्तांवर भर दिला. समाजाला आत्मभान यावे म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची वचने ‘दिनबंधु’मध्ये छापली. तुकाराम महाराजांचे अभंग अग्रलेखाच्या शिरोस्थानी प्रसिद्ध करून तानुबाईंनी एका अर्थाने ‘दिनबंधु’चे उद्दिष्ट कथन केले होते.

एक अत्यंत यशस्वी, सक्षम संपादक म्हणून त्यांचे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल.
    सलाम त्यांच्या धाडसाला आणि सलाम त्यांच्या पत्रकारीतेला....🙏🙏🙏🙏

*शब्दांकन-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*

Wednesday, 25 September 2019

'बाप्पास पत्र'

Date: 15 Sep 2019

*स्पर्धेसाठी*

*विषय-बाप्पास पत्र*

                                      *प्रिय बाप्पा*
                                      *मु.गांव तिथे गणपती*
                                      *पो-प्रत्येक घर*
                                       *ता.बच्चेकंपनी*
                                        *जि-ह्रदय*

        प्रिय लाडक्या बाप्पाला साष्टांग नमस्कार....तुम्ही आमच्या घरी आलात आणि आनंदाला उधान आलं.तुमच्या येण्याची तयारी आम्ही बच्चेकंपनी कित्येक दिवसांपासून करत होतो...मक्कर कसा बनवायचा डेकोरेशन कसे करायचे? सर्व तयारी करून ठेवली होती...तुमच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात होतो.तुम्ही आलात त्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून नवीन कपडे घालुन तुमच्या आगमनासाठी जय्यत तयारी झाली.
      मक्कर सजला, दारी सुंदर रांगोळी काढली...दारी तोरण बांधले, धुपदीप, पंचामृत,प्रसाद,फळे,बेल, फूल,आगरडा, हराळी,पुजेचे ताट, समई लाईटींग सर्व तयारी झाली...माझ्या आईने लाडक्या बाप्पासाठी त्यांना आवडणारे उकडीचे मोदक, तळलेल्या मोदकाचा वास घरात पसरला होता.....आपले आगमन झाले...पुजाअर्चा झाली...सकाळ-संध्याकाळ आरती घेता मन प्रसन्न झाले....गणपती बाप्पा मोरया...खूप जोशाने सर्वजण म्हणत आनंदाने प्रसाद घ्यायचो....
        बाप्पा तुम्हांला सर्वजण गणाधिशा, गणनायका, सुखकर्ता, दु:खहर्ता ,विघ्नहर्ता असे म्हणतात....अशी कित्येक 108 नांव तुमची आहेत...पण बाप्पा माझ्या मनात एक प्रश्न नेहमी पडतो.तोच प्रश्न मला फार सतावतो आहे.त्याचे तुम्ही उत्तर द्याल अशी आशा आहे. तुम्हांला सर्व लोकं विघ्नहर्ता म्हणून प्रत्येक कामं सुरू करताना तुमची पुजा करतात.तुम्हाला विघ्नहर्ता म्हणतात...तर तुम्ही या वर्षी केवढा महापूर आला...कित्येक लोकं पुरात वाहून गेली.गावच्या गांव पाण्याखाली गेली. पुराने थैमान घातले. नाहक कित्येक लोकांचे बळी गेले...बाप्पा तुम्ही ते विघ्न का टाळले नाहीत???
          पुराची बातमी ऐकून मला फार दु:ख झाले...लहान लहान मुलंबाळं, गुरंढोर, बायामाणसं पुरात वाहून गेली,पाण्याने गरिबांची मातीची घरे पडली.लोकं रस्त्यावर आली.कित्येक मुलांचे दप्तर गेले वह्यापुस्तके पुरात गेली...तेव्हा बाप्पा तुम्ही फक्त बघतच राहीलात का???
          शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला धावून आला. जातपात विसरून कित्येक लोकंआनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा प्राण वाचवला....लोकं एकमेकांना मदत करत होती. तू मात्र हा खेळ मस्त हातावर हात ठेवून पहात होतास का?
             तू विघ्नहर्ता आहेस तर मग इवढा पाऊस का पाडलास...अरे बाप्पा त्या लातूर,बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात लोकांना प्यायला पाणी मिळेना तिकडे थोडा पाऊस पाडायचाच होता तर तिकडेही पाडू शकला असतास पण नाही...तुला लोकांना झालेला त्रास पाहून आनंद वाटतो का?
       तरीही लोकं पुरातली मंडळींनी ही तुझी स्थापना केली.मनोभावे पुजा केली.मग तुच असा का वागतोस हा माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे बाप्पा....मी तुला हात जोडून विनवणी करतो...सर्वांना सुखात ठेव...असले नैसर्गिक विघ्न तुझं तू सारं...यापुढे बाप्पा लोकांना त्रास देवू नकोस...नाहीतर लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल...आणि तुला विघ्नहर्ता न म्हणता विघ्नकर्ता म्हणतील हे ध्यानात ठेव...मी विचरलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे  मला तूही पत्र पाठवून किंवा दिदीच्या व्हाट्सप वरून कळवलास तरी चालेल...
        दिदिचा  what's app no.9767663257 या नंबरवर व्हाट्सप मेसेज करून कळव...आणि पुढच्या वर्षी लवकर या....गणपती बाप्पा मोरया....
             
                               *तुझाच लाडका*
                                 *सोन्या*

~~~~~~~~~~~~~~~~
*©®कवयित्री -कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍

Thursday, 23 May 2019

वाट पहाते मी

Date: 23 May 2019

*स्पर्धेसाठी षढाक्षरी*

*विषय-वाट पहाते मी*

वाट पहाते मी
मृग पावसाची
भागेना तहान
चातक पक्ष्याची.....!!

येईल पाऊस
भिजेल धरती
शांत होईल रे
जमिन तापती....!!

मिळेना हो पाणी
पडला दुष्काळ
पडेल पाऊस
येईल सुकाळ....!!

मिळेना रे चारा
पडला दुष्काळ
झाडे लावू चला
येईल सुकाळ......!!

आडवा जिरवा
पावसाचे पाणी
शोषखड्डे खणा
मिळेल रे पाणी....!!

तोडून हो वृक्ष
तापली जमिन
मरतात पक्षी
रोज पाण्यावीन....!!

*©®कवयित्री कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे, वाशिम*
✒✒✒✒✒✒✒