Sunday, 1 December 2019
चालू राजकीय घडामोडी...
Sunday, 6 October 2019
*भारतातील पहिली महिलां संपादिका...तानुबाई बिर्जे....
*सातवे पुष्प- तानुबाई बिर्जे*
======================
*(भारतातील पहिल्या महिला स्त्री संपादिका....)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महात्मा फुलेंचे सहकारी व शेजारी देवराव ठोसर यांची कन्या व सावित्रीबाई फुले यांची मानसकन्या तानुबाईंचा जन्म १८७६ मध्ये पुण्यात झाला. त्यांचं शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुलेंच्या शाळेत झालं, तर २६ जानेवारी १८९३ रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधकीय पद्धतीने त्यांचा विवाह झाला. वासुदेव बिर्जे यांनी बडोदा सरकारमध्ये त्यांनी १८९४ ते १९०५ अशी अकरा वर्षे ग्रंथपाल म्हणून कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ‘दिनबंधु’ हे वृत्तपत्र १८९७ मध्ये पुन्हा सुरू केलं. कृष्णाजी भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बंद पडलं होतं. १८८० मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबईतून सुरू केलं. त्यानंतर १८९७ मध्ये बिर्जे यांनी त्याची जबाबदारी घेतली व ते १९०६ पर्यंत चालवलं, मात्र १९०६ मध्ये प्लेगने त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते वृत्तपत्र पुन्हा बंद पडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पती निधनानंतर डगमगून न जाता प्रबोधनाचे कार्य तानुबाई बिर्जे यांनी पुढे चालू ठेवले. तानुबाईचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि सत्यशोधकच होते. महात्मा फुले यांच्या घराशेजारीच त्यांचं घर होतं. त्यामुळे फुले दांपत्याचा सहवास तानुबाईंना लहानपणीच मिळाला.
‘दिनबंधु’चे पहिले संस्थापक-संपादक कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरू केलेल्या या वृत्तपत्राचं नंतरच्या काळात संपादन तानुबाई बिर्जे यांनी उत्कृष्टरीत्या केलं होतं. त्या भारतातील पहिल्या महिला संपादक ठरल्या. परंतु भारतातीलच नव्हे तर जगातील त्या पहिल्या संपादक असाव्यात, असा निष्कर्ष काढला जात आहे. त्या काळात भारतातील पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांचं नाव गाजलं.
वडील ठोसर व पती बिर्जे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी ‘दिनबंधु’ चालवायला घेतले आणि जगातल्या पहिल्या संपादक बनण्याचा लौकिक मिळवला. हे वृत्तपत्र त्यांनी १९०६ ते १९१२ पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे चालवून संपादिका म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तानुबाईंनी त्यांच्या संपादकपदाच्या कारकीर्दीत ‘दिनबंधु’मध्ये सत्यशोधक चळवळीच्या वृत्तांवर भर दिला. समाजाला आत्मभान यावे म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची वचने ‘दिनबंधु’मध्ये छापली. तुकाराम महाराजांचे अभंग अग्रलेखाच्या शिरोस्थानी प्रसिद्ध करून तानुबाईंनी एका अर्थाने ‘दिनबंधु’चे उद्दिष्ट कथन केले होते.
एक अत्यंत यशस्वी, सक्षम संपादक म्हणून त्यांचे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल.
सलाम त्यांच्या धाडसाला आणि सलाम त्यांच्या पत्रकारीतेला....🙏🙏🙏🙏
*शब्दांकन-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*
Wednesday, 25 September 2019
'बाप्पास पत्र'
Date: 15 Sep 2019
*स्पर्धेसाठी*
*विषय-बाप्पास पत्र*
*प्रिय बाप्पा*
*मु.गांव तिथे गणपती*
*पो-प्रत्येक घर*
*ता.बच्चेकंपनी*
*जि-ह्रदय*
प्रिय लाडक्या बाप्पाला साष्टांग नमस्कार....तुम्ही आमच्या घरी आलात आणि आनंदाला उधान आलं.तुमच्या येण्याची तयारी आम्ही बच्चेकंपनी कित्येक दिवसांपासून करत होतो...मक्कर कसा बनवायचा डेकोरेशन कसे करायचे? सर्व तयारी करून ठेवली होती...तुमच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात होतो.तुम्ही आलात त्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून नवीन कपडे घालुन तुमच्या आगमनासाठी जय्यत तयारी झाली.
मक्कर सजला, दारी सुंदर रांगोळी काढली...दारी तोरण बांधले, धुपदीप, पंचामृत,प्रसाद,फळे,बेल, फूल,आगरडा, हराळी,पुजेचे ताट, समई लाईटींग सर्व तयारी झाली...माझ्या आईने लाडक्या बाप्पासाठी त्यांना आवडणारे उकडीचे मोदक, तळलेल्या मोदकाचा वास घरात पसरला होता.....आपले आगमन झाले...पुजाअर्चा झाली...सकाळ-संध्याकाळ आरती घेता मन प्रसन्न झाले....गणपती बाप्पा मोरया...खूप जोशाने सर्वजण म्हणत आनंदाने प्रसाद घ्यायचो....
बाप्पा तुम्हांला सर्वजण गणाधिशा, गणनायका, सुखकर्ता, दु:खहर्ता ,विघ्नहर्ता असे म्हणतात....अशी कित्येक 108 नांव तुमची आहेत...पण बाप्पा माझ्या मनात एक प्रश्न नेहमी पडतो.तोच प्रश्न मला फार सतावतो आहे.त्याचे तुम्ही उत्तर द्याल अशी आशा आहे. तुम्हांला सर्व लोकं विघ्नहर्ता म्हणून प्रत्येक कामं सुरू करताना तुमची पुजा करतात.तुम्हाला विघ्नहर्ता म्हणतात...तर तुम्ही या वर्षी केवढा महापूर आला...कित्येक लोकं पुरात वाहून गेली.गावच्या गांव पाण्याखाली गेली. पुराने थैमान घातले. नाहक कित्येक लोकांचे बळी गेले...बाप्पा तुम्ही ते विघ्न का टाळले नाहीत???
पुराची बातमी ऐकून मला फार दु:ख झाले...लहान लहान मुलंबाळं, गुरंढोर, बायामाणसं पुरात वाहून गेली,पाण्याने गरिबांची मातीची घरे पडली.लोकं रस्त्यावर आली.कित्येक मुलांचे दप्तर गेले वह्यापुस्तके पुरात गेली...तेव्हा बाप्पा तुम्ही फक्त बघतच राहीलात का???
शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला धावून आला. जातपात विसरून कित्येक लोकंआनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा प्राण वाचवला....लोकं एकमेकांना मदत करत होती. तू मात्र हा खेळ मस्त हातावर हात ठेवून पहात होतास का?
तू विघ्नहर्ता आहेस तर मग इवढा पाऊस का पाडलास...अरे बाप्पा त्या लातूर,बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात लोकांना प्यायला पाणी मिळेना तिकडे थोडा पाऊस पाडायचाच होता तर तिकडेही पाडू शकला असतास पण नाही...तुला लोकांना झालेला त्रास पाहून आनंद वाटतो का?
तरीही लोकं पुरातली मंडळींनी ही तुझी स्थापना केली.मनोभावे पुजा केली.मग तुच असा का वागतोस हा माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे बाप्पा....मी तुला हात जोडून विनवणी करतो...सर्वांना सुखात ठेव...असले नैसर्गिक विघ्न तुझं तू सारं...यापुढे बाप्पा लोकांना त्रास देवू नकोस...नाहीतर लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल...आणि तुला विघ्नहर्ता न म्हणता विघ्नकर्ता म्हणतील हे ध्यानात ठेव...मी विचरलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला तूही पत्र पाठवून किंवा दिदीच्या व्हाट्सप वरून कळवलास तरी चालेल...
दिदिचा what's app no.9767663257 या नंबरवर व्हाट्सप मेसेज करून कळव...आणि पुढच्या वर्षी लवकर या....गणपती बाप्पा मोरया....
*तुझाच लाडका*
*सोन्या*
~~~~~~~~~~~~~~~~
*©®कवयित्री -कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍
Thursday, 23 May 2019
वाट पहाते मी
Date: 23 May 2019
*स्पर्धेसाठी षढाक्षरी*
*विषय-वाट पहाते मी*
वाट पहाते मी
मृग पावसाची
भागेना तहान
चातक पक्ष्याची.....!!
येईल पाऊस
भिजेल धरती
शांत होईल रे
जमिन तापती....!!
मिळेना हो पाणी
पडला दुष्काळ
पडेल पाऊस
येईल सुकाळ....!!
मिळेना रे चारा
पडला दुष्काळ
झाडे लावू चला
येईल सुकाळ......!!
आडवा जिरवा
पावसाचे पाणी
शोषखड्डे खणा
मिळेल रे पाणी....!!
तोडून हो वृक्ष
तापली जमिन
मरतात पक्षी
रोज पाण्यावीन....!!
*©®कवयित्री कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे, वाशिम*
✒✒✒✒✒✒✒
Saturday, 16 March 2019
जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह प्रकाशन करून सुकळी शाळेने रोवला मानाचा तुरा.....
कवयित्री मिनाक्षी नागराळे यांच्या चिमणी पाखरं व उमलती मुले या जिल्ह्यातील पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले मोठ्या थाटामाटात....
शिक्षणाधिकारी मानकर साहेब यांच्या हस्ते होणार प्रकाशन
वाशिम तालुक्यातील उकळी पेन केंद्रशाळे अंतर्गत असलेल्या जि.प. शाळा सुकळी येथील कवयित्री असलेल्या सहायक शिक्षीका मिनाक्षीताई नागराळे यांच्या बालकांच्या भावविश्वाशी संबंधीत ' चिमणी पाखरं ' व ' उमलती फुले ' या काव्यसंग्रहांचे प्रकाशन कार्यक्रम सोमवारी ११ मार्च रोजी वाशिम येथील लाखाळा परिसरातील केमीस्ट भवनमध्ये दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले होते.उमलती फुले या बालकविताचे प्रकाशन संपादिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे मॅडमनी करून जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह म्हणून सुकळी शाळेने मानाचा तुरा रोवला आहे...
लहान लहान विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे कविता करू शकतात याचा उत्तम नमुना म्हणजे उमलती फुले....
जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अशोकराव महाले राहणार असून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर साहेब यांच्या हस्ते काव्यसंग्रहांचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस नारायणराव काळबांडे चित्रपट निर्माता तथा साहित्यीक सत्येंद्र राऊत, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संजीवनीताई बाजड व प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती आर.एच.वाघ, सुरेश सरनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक परसराम भोयर, सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक संजय डवरे, उकळी पेन केंद्राचे केंद्रप्रमुख नामदेव सरदार, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव बोरकर, साहित्यीक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काळे, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलासराव सोळंके, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख विलास गोटे, साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर महाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष देवबा शिंदे, अजिंक्य प्रकाशनच्या संचालक अॅड. जयमाला भगत, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तराव इढोळे, युक्टा जिल्हाध्यक्ष दिपक जावळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष शत्रुघ्न गवळी, केंद्रप्रमुख शेषराव गोटे, रामेश्वर दंडे, ज्ञानेश्वर भोयर, बापूराव महाले, दिलीपराव गवई, अ.भा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय मनवर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद घुगे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक नागेश कव्हर, केशवराव वाबळे, नारायणराव सरनाईक, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष मंचकराव तायडे, वऱ्हाडी कवि भारत लादे आदीे उपस्थित होते...
विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर करून मोठ्या माणसाला विचार करायला लावले.तंबाखू सोडा ही कविता...व्यसनानी कसा घात होते हे सांगून गेली....
मिनाक्षी नागराळे मॅडम या संवेदनशील शिक्षिका व आदर्श कवयित्री असल्याने हे शक्य झाले असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी मा.मानकर साहेब यांनी सांगितले....