Sunday, 31 December 2017

जोडाक्षर लेखन पध्दती....मिनाताई नागराळे.वाशिम.

🔵 _जोडाक्षर लेखन पद्धती_  🔵

1⃣ *शेवटी दंड असणारी व्यंजने*:::   (1) स्वतंत्र दंड असणारी व्यंजने ::  ग  ण श  याप्रकारा मध्ये दंड काढून जोडाक्षर तयार केले जाते उदा: रुग्ण ,अरण्य, अश्म.

(2) _जोडलेला दंड असणारी व्यंजने_:::: ख घ च ज झ त थ ध न प ब भ म य व ष स
सख्खा, विघ्न ,कच्चा, ज्वर, माझ्या, उत्कट, तथ्य,ध्यास, जन्म,आप्त,अब्ज,अभ्यास, म्यांन,हिय्या ,अव्यय,  मनुष्य, वास्तव. इ.

2⃣ *मध्यभागी दंड असलेली व्यंजने* :::: _क फ_
मध्ये दंड असणारी ही दोनच व्यंजने आहेत  याचे पुढील।प्रमाणे लेखन होते
पक्वान्न,  चाफ्याचे, भक्त क्लिष्ट

3⃣ *अर्धा दंड असलेली व्यंजने*:::   _छ ट ठ ड ढ द ल ह

1    ळ हे आधी आल्यास त्यातील दंड काढून टाकावा उदा मळ्यात फळ्यावर
2   छ हे व्यंजन आधी आल्यास त्यातील दंड काढून टाकू नये। उदा उच्छवास
3  ट ठ ड ढ ह ही व्यंजने आधी आल्यास व त्यापुढे य व्यंजन आल्यास पुढीलप्रमाणे।लेखन करावे:: कोट्यवधी साठ्यात पगड्या वेढ्यात कह्यात
4   द हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास त्याच्यापुढे य आल्यास विद्या उद्यान असे करावे दय असे करू नये
5  जोडाक्षरात द, च्या पूढे ग,घ,ध,व, आल्यास द च्याखालील बाजूस अक्षर जोडावे
उदा बुद्धी प्रसिद्धी पद्धत,
द्वंद्व, द्वीप

जेंव्हा दोन वेगळ्या पदाच्या संयोगातून द जोडाक्षर तयार होते द चा पाय मोडून लिहले जावे
उदा भगवद्गीता उदघाटन
6 जोडाक्षरात ल आधी आल्यास  पाल्य उल्हास। आई करावे

4⃣ *दंड नसलेली व्यंजने*:::
मराठी वर्णमलेत "र" हे एकच व्यंजन आहे त्याला दंड नाही त्याचे।लेखन जोडाक्षरात पुढीलप्रमाणे असावे। उदा(1)
ग्रस्त, व्रण प्रमाण
(2) क व फ मध्यभागी दंड असणाऱ्या व्यंजनांतर र हे अक्षर आल्यास   वक्र आक्रोश असे लिहावे
(3) द अर्धा दंड असलेल्या अक्षरानंतर र आल्यास द च्या खालच्या दंडाला जोडून तयार करावे उदा द्रव द्रोह द्राक्षे
(4) छ ट ठ ड ढ या अर्धा दंड असलेल्या अक्षरानंतर र आल्यास
उदा ट्राम राष्ट्र ड्रम असे लिहावे
(5) एक स्वर व एक व्यंजन या दोहोंच्या मध्ये र हे व्यंजन येते तेंव्हा र च्या मागील स्वराला जोडून उच्चार केला जात असेल तर पुढील व्यंजनावर रफार देऊन दाखवला जावा उदा सूर्य  पूर्व पर्वा
*(5)आडवी किंवा उभी जोडणी*:::::  जोडाक्षरा मध्ये एकच व्यंजन दोनदा येते तेंव्हा व्यंजनाची जोडणी उभ्या किंवा आडव्या पद्धतीने करतात
उदा सच्चा सत्ता गप्पा
उभी जोडणी::: यात व्यंजने एका खाली एक जोडणी करतात  फक्त क,ट,ठ, ड, ढ, द, ल,  या व्यंजनाची जोडणी एका खाली एक करावी  उदा पट्टा, बट्टा, खड्डा
काही अक्षरे दोन्ही प्रकारच्या जोडणीने केली जातात सल्ला  किंवा अन्न
        
     

                   *🌷संकलन*🌷
         *मीनाताई पांडुरंग नागराळे
जि.प.वरि.प्राथमिक शाळा.सुकळी.
ता.जि.वाशिम...

Friday, 24 November 2017

जनरल नाॅलेज

* जनरल नॉलेज *
*भारतातील पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*भारतातील पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*भारतातील पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (१८५४)*
*भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध?Answer- इ.स. १८५७*
*भारतातील पहिले जलविद्युत यंत्र?Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र?Answer- मुंबई (१९२७)*
*भारतातील पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)*
*भारतातील पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१*
*भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?Answer- १९५२*
*भारतातील पहिली परमाणु चाचणी?Answer- पोखरण, राजस्थान*
*भारतातील पहिले क्षेपणास्त्र?Answer- (पृथ्वी १९८८)*
*भारतातील पहिला उपग्रह?Answer- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी?Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*
*भारतातील पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?Answer- दिग्बोई (१९०१)*
*भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना?Answer- दुल्टी (१८८७)*
*भारतातील सर्वप्रथम घटना
*पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*पहिले पोस्टाचे तिकीट* *१*
*ऑक्टोबर १८५४*
*पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)*
*पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*
*पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*
*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*
*पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*
*पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*
*पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*
*पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*
*पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*
*पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*
*पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*
*भारतातील पहिले
*भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*
*पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*
*पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*
*राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*
*पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*
*पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*
*पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*
*स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*
*पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*
*भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*
*इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*
*सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*
*सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*
*सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*
*भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?Answer- कांचनगंगा*
*भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)*
*भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*
*सर्वात उंचवृक्षकोणते ?Answer- देवदार*
*भारतातील सर्वात मोठेसरोवर?Answer वुलर सरोवर (काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा जिल्हा?Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?Ans
wer- राजस्थान*
*भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?Answer- उत्तर प्रदेश*
*भारतातील सर्वात मोठे धरण?Answer- भाक्रा (७४० फूट)*
*भारतातील सर्वात मोठा धबधबा?Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*
*भारतातील सर्वात मोठे वाळवंट?Answer- थर (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?Answer- खरगपूर (प. बंगाल)*
*भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*
*भारतातील सर्वात मोठी मस्जिद?Answer- जामा मशीद*
*भारतातील सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?Answer- मध्य प्रदेश*
*भारतातील सर्वात उंच दरवाजा?Answer- बुलंद दरवाजा*
*भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*
*भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?*
*Answer- मावसिनराम (मेघालयं)
संकलन:- *मीनाताई पांडुरंग नागराळे*
जि.प.वरि.प्राथमिक शाळा.सुकळी
ता.जि.वाशिम

Wednesday, 22 November 2017

महाराष्ट्राची माहिती....

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४
महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५
महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००
महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%
महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )
सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )
सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी
सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर
क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर
जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे
कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%
महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु
महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )
सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )
सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा
सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट
सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी
सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड
सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा
सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती
सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा
सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ
लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे
सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )
सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड
सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन
सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी
सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन
सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला
सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया
सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर
सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल
सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )
सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फक्त स्वत : चेच नॉलेज वाढवु नका, दुसरयाचे सुद्धा नॉलेज वाढवा. धन्यवाद.
👏👏👏👏👏👏👏👏
संकलन:-मिनाताई नागराळे
जि.प.वरि.प्राथमिक शाळा.सुकळी...
वाशिम

Saturday, 9 September 2017

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द

अभिनेता -नट
उदर -पोट
एकता -एकी, ऐक्य
अंचल -स्थिर, शांत, पर्वत
अनर्थ -अरिष्ट, संकट
कट -कारस्थान
आज्ञा -आदेश, हुकूम
आरसा -दर्पण
अपराध -गुन्हा
उणीव -कमतरता,न्यून, न्यूनता
अंगार -निखारा
चाड -आवड, गरज, गोडी
अविरत- सतत, अखंड
औक्षण -ओवाळणे
मनोरंजन -मनोरंजन
आसक्ती- लाभ, हव्यास
गवई -गायक
ग्रंथ -पुस्तक
किमया -जादू, चमत्कार
अवर्षण -दुष्काळ (पाऊस न पडणे)
कृपण -कंजूष, चिकट
कृश -हडकुळा, बारीक
खडक- दगड, पाषाण
खटाटोप- प्रयत्न, मेहनत, धडपड
गनीम- शत्रु, अरी
गरुड -खगेंद्र, व्दिजराज, वैनतेय
गाणे -गीत
गाय -धेनू, गो, गोमाता
चौफेर- भोवताली, सर्वत्र
ठेकेदार -मक्तेदार, कंत्राटदार
छंद- आवड, नाद
जयघोष -जयजयकार
गौरव -सत्कार
तृष्णा -तहान, लालसा
छिद्र -भोक
दुजा -दुसरा
नजराणा -भेट, उपहार
नवनीत -लोणी
तारू -जहाज, गलबत
तरुण -जवान, युवक
थवा -समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव
टंचाई -कमतरता
झोका- हिंदोळा
नारळ -श्रीफळ, जारियल
निर्जन -ओसाड
नौदल -आरमार
पंक्ती -ओळ, पतंग, रांग
मत्सर- व्देष, असूया
मुलामा -लेप
ब्रीद -बाणा, प्रतिज्ञा
प्राप्त:काळ -उषा, सकाळ, पहाट
मकरंद -मध
मलूल- निस्तेज
रुक्ष नीरज, कोरडे
बैल- वृषभ, खोंड,
मोहिनी -भुरळ
प्रपंच -संसार
शिकस्त- पराकाष्ठा
शव- प्रेत,मुडदा
विषण्ण -कष्टी
स्वेद -घाम, धर्म
क्षुधा -भूक
सुरेल- गोड
विनय -नम्रता
विवंचना -चिंता, काळजी
क्षीण- अशक्त
शेज -शय्या, बिछाना, अंथरूण
शिक्षक -मास्तर, गुरु, गुरुजी
*संकलन* मीनाताई पांडुरंग  नागराळे
जि.प.व. प्राथमिक  शाळा  सुकळी

Sunday, 3 September 2017

अष्टविनायक गणपती संपूर्ण माहिती

[01/09, 11:17 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 महड 🍀*

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 मोरगांव 🍀*

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 थेऊर 🍀*

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)
*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 रांजणगाव 🍀*

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 सिद्धटेक 🍀*

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला होड्या असतात. (हल्ली पूल झाला आहे, असे समजते.)
*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 ओझर 🍀*

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 लेण्याद्री 🍀*

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 पाली 🍀*

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
संकलन: -मिनाताई नागराळे. वाशिम