*निरजा काव्य प्रकार*
*निष्पाप बळी*
मानवाच्या वाईट सवयी
करतात वापर
प्लॅस्टीक
कॅरीबॅगचा
आणि बळी
पडतात निष्पाप गायी....
मुक्या जनावरांना वाचवा
पशुधन खरे
धन
गायीचे
महत्त्व तुला
कधी कळेल मानवा....
कसलाच अधिकार नाही
तुम्हाला प्लॅस्टीकचा
वापर
करून
इतरांचा जीव
धोक्यात घालू नाही....
पशुपक्षी,निसर्ग,प्राणी
हेच खरे
धन
नका
करू तुम्ही
प्राण्यांना मारून हानी....
कधी कळेल तुला
बुध्दजीवी माणसां
नको
करू
-हास निसर्गाचा
होईल पश्चात्ताप तुला...
वापर प्लॅस्टीकचा टाळा..
वाचवून करा
समृद्ध
मानवी
आरोग्य जीवना
घाला प्रदुषणाला आळा...
चला संस्कृती जपूया...
प्राण्यांना वाचवूया
कमी
करून
प्लॅस्टीकचा वापर
भारत प्रदुषणमुक्त करूया....
गोमातेचे रक्षण करूया
संस्कृतीची जपूया
करून
पूजन
सर्व गोमातेला
सन्मानाने वाचवू या....
*कवयित्री:-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी*
*ता.जि.वाशिम*
No comments:
Post a Comment