Tuesday, 3 August 2021

*हळव्या भावनांना शब्द फुलाने फुलवणारा चारोळी संग्रह म्हणजे फुलोरा होय.*

*हळव्या भावनांना शब्द फुलाने फुलवणारा चारोळी संग्रह म्हणजे फुलोरा*

     वाशिम जिल्ह्याचे कवी सतीश खरात यांचा दर्जेदार चारोळी संग्रह नुकताच वाचनात आला. हळव्या मनातील भाव बंधांची शब्द गुंफण करून फुलोरा फुलविणारे कवी सतीश खरात यांचा हा पहिला चारोळी संग्रह होय. चारोळी संग्रह म्हणजे चार ओळीची आशयघन व यमक साधून केलेली रचना. या चारोळी संग्रहाचे मुखपृष्ठ जालिंदर पावसे यांनी उत्तम प्रकारे नावाला साजेसे असे रेखाटले असून प्रकाशक मेहता पब्लिकेशन हाऊस अमरावती यांनी प्रकाशित केली आहे. या चारोळी संग्रहाची प्रथमावृत्ती १५ जून २०२१ रोजी प्रकाशित झाली. या चारोळी संग्रहाला प्रस्तावना सौ निशा संजय डांगे यांची लाभली असून मूल्य केवळ ५० रूपये आहे. पण यातील सर्वच चारोळ्या पुन्हा पुन्हा मनात रुंजी घालणाऱ्या व वाचकांच्या पसंतीस पडणाऱ्या आहे.

             प्रिय आईस
        जिच्या परिसस्पर्शान
        माझं जीवन सोनं झालं 
        तिच्या अथांग प्रेरणेनं 
        शब्द रचण्याचं बळ आलं....!!

      कवी सतीश खरात यांनी पहिल्यावहिला चारोळी संग्रह आपल्या माता पित्यांना अर्पण केला आहे.पहिली चारोळी आईच्या चरणी समर्पित केली आहे.प्रत्येक मानवाच्या आयुष्याला आकार देणारी प्रथम गुरु म्हणजे आई असते. "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" या उक्तीप्रमाणे जीवनात आई वडीलाचे स्थान श्रेष्ठ दर्जाचे आहे. कवी सतीश खरात वरील चारोळी तून म्हणतात की आईच्या स्पर्शाने माझ्या जीवनाच सोनं झालं आहे. तिच्या अथांग  प्रेरणेने, आईच्या मायेनं, आईच्या वात्सल्यानं मला शब्दरचनाचं बळ माझ्या अंगी आले आहे. जगात आईची माया बाळासारखी विशाल आणि सागरासारखी अथांग असते याची प्रचिती कवी सतीश खरात आवर्जून शब्द फुलोरा यातून व्यक्त करतात.
      
        काळजात सामावलं 
         तुझं हसणं लाजणं 
         तुझा नाजुक स्पर्श 
         तुझा पवित्र स्पंदन....!!

        प्रेम किती पवित्र असतं? जगात प्रेमाला उपमा नाही पण खऱ्या प्रेमाला खरोखरच तोड नाही. निस्वार्थी प्रेम सर्वांना आवडतं.प्रेम पाहिलं तर अडीच अक्षरे फक्त. पण त्याच्यावाचून मनुष्य जगू शकत नाही. माणसाने कोणावर कधी प्रेम केलं नाही असं होऊ शकत नाही. कारण प्रेम हा स्थायीभाव आहे मानवी अंतर्मनाचा. प्रेमाशिवाय माणसाचे आयुष्य फुलतच नाही. कवी प्रेमात त्याच्या प्रेयसीला म्हणतो तुझं हसणं लाजणार काळजात सामावलं आहे तुझा नाजूक स्पर्श तुझं पवित्र बंधन माझ्या काळजात कोरलेल्या मूर्ती सारखं आहे मनातले भाव कवितेच्या माध्यमातून आहेत.

           चंदना सारख्या रूपाचा
           चंद्रासारखा मुखडा आहे 
            गालावरचा तीळ मात्र 
            माझ्या काळजाचा तुकडा आहे...!!

    "जो देखे कवी तो न देखे रवि" या उक्तीप्रमाणे कवी खूप काही मोठे स्वप्न पाहू शकतो. कवी शब्दांच्या माध्यमातून कुठेही धाऊ शकतो. जिथे रवी म्हणजे पाहू शकत नाही ते कवी पाहू शकतो.त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ....कुठेही असू शकतो कवी सतीश खरात यांनी प्रेयसीचे कौतुक भारीच केला आहे चंदना सारख्या रुपाची प्रेयसीच्या चंद्रा सारखा मुखडा हे प्रेयसीचा चेहरा चंद्राचा मुखडा आहे आणि तिच्या गालावरचा तीळ मात्र माझ्या काळजाचा तुकडा आहे असे काळजाला भिडणारे शब्द कवी सतीश खरात यांनी आजच्या एकतर्फी प्रेमाने भरकटलेल्या तरुण पिढीला प्रेम म्हणजे काय असतं? हे शिकवणारे अनमोल रत्न म्हणजे फुलोरा हा चारोळी संग्रह होईल

      आपणच आपल्यासाठी 
      असं झाडांनी वागलं पाहिजे 
       दुसऱ्याच्या आधाराने जगणं 
       आता वेली नही सोडलं पाहिजे....!!

      वरील चारोळीमध्ये खूप आशयघन अर्थ लपला आहे. झाडांची परोपकारीता दिसून येते.झाड इतरांना फक्त देतच राहतात फळ,फूल, सावली, डिंक ,औषध ,लाकूड इत्यादी देतच असतात झाडांना फक्त द्यायचं माहीत असतं ,पण माणूस खूप स्वार्थी आहे मनुष्य सर्व घेतच असतो झाडे जंगले तोडून तिथे तिथे सिमेंट काँक्रेटच्या बिल्डिंग तयार करत असतो अनेक झाडांची कत्तल करतो माणूस स्वार्था साठी काहीही करायला तयार असतो असं झाडांनाही माणसासारखं आपणच आपल्यासाठी जगलं पाहिजे त्याचबरोबर वेली झाडाच्या आधाराने जगते . तसं माणसांनाही दुसऱ्याच्या आधारावर जगणं सोडून दिले पाहिजे असा मौलिक, वैचारिक संदेश वरील चारोळी मधून कवी सतीश खरात यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे

     चार भिंतीच्या देऊळ तरी 
      माणूस म्हणून जपून धरतं 
     दोन दिवसांच आयुष्य मात्र 
     जाती धर्माचा उदय करतो...!!

     परमेश्वराला सर्व लेकरं सारखीच कोणत्याही देवळात देव माणूस कोणत्या धर्माचा आहे हे पाहत नाही. ईश्वराला सर्वजण सारखेच. मंदिराच्या ठिकाणी भेदभाव देवाने कधीच निर्माण केला नाही भेदभाव निर्माण करणारा माणूसच फक्त दोन दिवसाच्या आयुष्यात मनुष्य किती भेदभाव करतो ,? उचनिच,जात, धर्म,चालीरीती इत्यादी घाण फक्त माणसाच्या डोक्यातच असते.वरील चारोळी मधून जातीविरुद्ध विद्रोह कमी खरात यांनी केला आहे
     कधीकधी अख्खं पुस्तक वाचून जे समजत नाही तेवढे फक्त चार ओळींतून समजतं इतकी ताकद शब्दांची आहे शब्दात खूप मोठे सामर्थ्य आहे एका शब्दाने एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते अशा दर्जेदार स्वरूपाच्या चारोळ्या सतीश खरात लिखित फुलोरा या चार ओळी संग्रहातून वाचायला मिळतील. एखाद्या सुगंधी झाडाचे फुल जसे सर्वांना आकर्षित करते तसंच फुलोरा चारोळी संग्रह हातात वाचायला घेतल्यावर शेवट कधी होतोते कळतच नाही बरेच जण चारोळी म्हणलं की फक्त प्रेमावरच करतात. कवी खरात यांचा तसं नाही, कवी  सतीश खरात यांच्या चारोळ्या आम्हाला मनाला भिडणार्‍या,आई-वडिलांना समर्पित असणाऱ्या,विद्रोह करणार्‍या ,निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या झाडांची उदारता शिकवण्याचा हक्क आणि कर्तव्य सांगणाऱ्या आयुष्याचं सत्य मांडणाऱ्या माणुसकीवर प्रकाश टाकणाऱ्या सहज सरळ सोप्या भाषेत असल्याने वाचक त्यांच्या अंतर्मनाला खिळवून ठेवत, प्रेमभाव निर्माण करणाऱ्या आहेत सर्व वाचकांनी आवर्जून वाचावा असाच चारोळी संग्रह म्हणजे फुलोरा होय...!!

    कवी सतीश खरात वाशिम यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Monday, 2 August 2021

सेतू चाचणी क्रमांक २

 सेतू चाचणी क्रमांक २

इयत्ता दुसरी


सेतू चाचणी क्र.२ 

इयत्ता तिसरी


@ सेतू चाचणी क्रमांक २

इयत्ता चौथी

                                                        



Thursday, 29 July 2021

ओ चे शब्द

 ओ चे शब्द




सेतू अभ्यासक्रम 45 दिवस

 सेतू अभ्यासक्रम 45 दिवस 

इयत्ता दुसरी




सेतू अभ्यासक्रम 45 दिवस 

इयत्ता 3 री





सेतू अभ्यासक्रम 45 दिवस 

इयत्ता 4 थी










Wednesday, 28 July 2021

meenakshinagraleblogspot.com: ऐ चे शब्द

meenakshinagraleblogspot.com: ऐ चे शब्द:  ऐ चे शब्द